शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

नागीण आजार जीवावर बेतू शकतो का?; जाणून घ्या, कशी घ्यावी खबरदारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 18:55 IST

लहानपणी कधीतरी कांजण्या उठलेल्या असतात. ते विषाणू शरीरात राहून जातात.

ठळक मुद्देनागिणीबद्दल गैरसमज आणि अंधश्रद्धाच जास्त.हा एक विषाणुंनी होणारा रोग आहे. मज्जातंतूच्या इजेमुळे दुखणे, खाजवणे जास्त होते. पण जीवाला काहीही धोका नाही.

>> डॉ. सतीश उदारे

हा दिवसांपूर्वीची गोष्ट. समोर एक वयस्कर गृहस्थ, सोबत त्यांची पत्नी, मुलगा आणि सून. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड काळेपणा, डाव्या हातावर लालसर पुरळ उठलेलं. 'अति प्रचंड दुखतयं. हात हलवला तरी दुखतयं आणि नाही हलवला तरीही दुखतयं. डॉक्टर काय आहे?', मी जरा नीट बघितलं 'कधीपासून आहे?', त्यांनी सांगितलं, 'दोन दिवस झालेत पणं दुखतयं चार दिवसांपासून. 'तोपर्यंत काकांच्या हातावरच पुरळ सांगून गेलं 'नागीण' हर्पिस झोस्टर.

'काय नागीण!', म्हणजे कुठेतरी सांगितलेले, वाचलेले आठवले मुलाला. तो म्हणाला, 'म्हणजे आता किती दिवस?'

'काही नाही हो! हा एक विषाणुंनी होणारा रोग आहे. लहानपणी कधीतरी कांजण्या उठलेल्या असतात. ते विषाणू शरीरात राहून जातात. हळूहळू त्याच्या विरुद्धची प्रतिकार शक्ती कमी होत जाते. एक दिवस काहीतरी शारीरिक किंवा मानसिक ताणामुळे एका मज्जातंतूमधून ते बाहेर पडतात. त्वचेवर पुरळ उठतात आणि निघूनही जातात. कधीकधी त्या मज्जातंतूच्या इजेमुळे दुखणे, खाजवणे जास्त होते. पण जीवाला काहीही धोका नाही.'

'काय सांगताय! म्हणजे अगदी साधा रोग आहे. मी तर ऐकल होतं की, ही नागीण जर तोंड जुळवले तर रुग्णाच्या जीवाला धोका असतो. आमची आजी तर असचं म्हणायची.'

बरोबर आहे. कदाचित त्यांच परीक्षण बरोबर असेल. पण नागिणमुळे रुग्ण मरत नाही. पण जास्त प्रमाणात यायचं कारण म्हणजे इतर रोग. उदाहरणार्थ क्षय रोग! काही प्रकारचे कर्करोग किंवा हल्ली अनेकांमध्ये प्रतिकार शक्तीची कमतरता असणे. तसेच एड्स किंवा एचआयव्ही. रूग्ण अशा आजारांनी दगावतो. नागिणीमुळे रूग्ण दगावत नाही, पण औषध बरोबर आणि वेळेवर घेणे गरजेचे आहे. आठवड्याभरात काका उड्या मारत परत येतील.

त्या नागिणीबद्दल गैरसमज आणि अंधश्रद्धाच जास्त. परवा तर कहरच. पेशंटला सांगितल्यावर निवांत वाटलं खरं, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी रुग्ण आणि दोन जण आले, काय तर म्हणे 'डॉक्टर यावर तुमची औषध काम नाही करणार?', म्हटलं का? तर म्हणे, 'शेजारच्याने करणी केल्यामुळे यांना हा रोग झालाय!' आत खरंच मी काय करणार?

थोडक्यात हा रोग 'बॅरिसेल्सा' नावाच्या विषाणुंमुळे होतो. सध्या तर हे विषाणू मारायला चांगली औषधं आहेत. ५ ते ७ दिवस गोळ्या खाल्ल्यावर रोग चटकन बरा होतो. जखमा भरायला थोडासा वेळ लागतो. पहिले दोन दिवस पुरळ यायच्या आधी जिथे पुरळ येणार तिथे खूप दुखतं. अगदी छातीवर आला तर हार्ट अ‍ॅटॅकप्रमाणे किंवा पोटावर अ‍ॅपेंडीसच्या इन्फेक्शनप्रमाणे. पाणी भरलेले छोटे छोटे पुरळ अगदी एका रेषेत येतात आणि पसरतात अगदी नागिणीप्रमाणे. काही जणांना थोडीशी वेदना होते, तर काहींना खूपच. जेवढं प्रमाण वाढतं, तेवढ्या वेदनाही वाढतात. ही वेदना काही जणांच्या बाबतीत पुरळ बरं झालं, तरी जास्त दिवस राहू शकते. कारण ते मज्जातंतू बरे व्हायला वेळ लागतो. काही जणांना तर अगदी रडवेलं होईपर्यंत दुखू शकतं. पण त्यावरही औषधं आहेत आणि हळूहळू हा प्रकार कमी होतो.

हा कुणालाही होऊ शकतो, पण लहान मुलांमध्ये क्वचित. कारण पहिल्यांदा कांजिण्या येतात हे आपण पाहिलं. तसा हा रोग संसर्गजन्य आहे. ज्यांना कांजिण्या झाल्या आहेत किंवा ज्यांनी त्याची लस टोचून घेतली आहे त्यांना काहीच त्रास नाही. नागिणीच्या रूग्णाकडून दुसऱ्यांना नागीण नाही होऊ शकत, पण कांजिण्या मात्र होऊ शकतात.

कधी त्रास जास्त असेल तर स्रायूंच्या संवेदना नष्ट होऊ शकतात. क्वचित एड्ससारख्या रूग्णांमध्ये हा पसरून मेंदूपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. डोळ्यांच्या भोवती जर आला तर नेत्रतज्ज्ञाची मदत जरूर घ्यावी. कधी कानात आला तरीही त्रास होऊ शकतो. चेहऱ्यावरील कोणत्याही भागाची विशेष काळजी घ्यावी. थोडक्यात काय तर नागीण या आजाराबद्दल बऱ्याच अंधश्रद्धा आहेत. पण त्या टाळून लवकर आणि योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. 

(लेखक हे ज्येष्ठ त्वचारोगतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स