शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

नागीण आजार जीवावर बेतू शकतो का?; जाणून घ्या, कशी घ्यावी खबरदारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 18:55 IST

लहानपणी कधीतरी कांजण्या उठलेल्या असतात. ते विषाणू शरीरात राहून जातात.

ठळक मुद्देनागिणीबद्दल गैरसमज आणि अंधश्रद्धाच जास्त.हा एक विषाणुंनी होणारा रोग आहे. मज्जातंतूच्या इजेमुळे दुखणे, खाजवणे जास्त होते. पण जीवाला काहीही धोका नाही.

>> डॉ. सतीश उदारे

हा दिवसांपूर्वीची गोष्ट. समोर एक वयस्कर गृहस्थ, सोबत त्यांची पत्नी, मुलगा आणि सून. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड काळेपणा, डाव्या हातावर लालसर पुरळ उठलेलं. 'अति प्रचंड दुखतयं. हात हलवला तरी दुखतयं आणि नाही हलवला तरीही दुखतयं. डॉक्टर काय आहे?', मी जरा नीट बघितलं 'कधीपासून आहे?', त्यांनी सांगितलं, 'दोन दिवस झालेत पणं दुखतयं चार दिवसांपासून. 'तोपर्यंत काकांच्या हातावरच पुरळ सांगून गेलं 'नागीण' हर्पिस झोस्टर.

'काय नागीण!', म्हणजे कुठेतरी सांगितलेले, वाचलेले आठवले मुलाला. तो म्हणाला, 'म्हणजे आता किती दिवस?'

'काही नाही हो! हा एक विषाणुंनी होणारा रोग आहे. लहानपणी कधीतरी कांजण्या उठलेल्या असतात. ते विषाणू शरीरात राहून जातात. हळूहळू त्याच्या विरुद्धची प्रतिकार शक्ती कमी होत जाते. एक दिवस काहीतरी शारीरिक किंवा मानसिक ताणामुळे एका मज्जातंतूमधून ते बाहेर पडतात. त्वचेवर पुरळ उठतात आणि निघूनही जातात. कधीकधी त्या मज्जातंतूच्या इजेमुळे दुखणे, खाजवणे जास्त होते. पण जीवाला काहीही धोका नाही.'

'काय सांगताय! म्हणजे अगदी साधा रोग आहे. मी तर ऐकल होतं की, ही नागीण जर तोंड जुळवले तर रुग्णाच्या जीवाला धोका असतो. आमची आजी तर असचं म्हणायची.'

बरोबर आहे. कदाचित त्यांच परीक्षण बरोबर असेल. पण नागिणमुळे रुग्ण मरत नाही. पण जास्त प्रमाणात यायचं कारण म्हणजे इतर रोग. उदाहरणार्थ क्षय रोग! काही प्रकारचे कर्करोग किंवा हल्ली अनेकांमध्ये प्रतिकार शक्तीची कमतरता असणे. तसेच एड्स किंवा एचआयव्ही. रूग्ण अशा आजारांनी दगावतो. नागिणीमुळे रूग्ण दगावत नाही, पण औषध बरोबर आणि वेळेवर घेणे गरजेचे आहे. आठवड्याभरात काका उड्या मारत परत येतील.

त्या नागिणीबद्दल गैरसमज आणि अंधश्रद्धाच जास्त. परवा तर कहरच. पेशंटला सांगितल्यावर निवांत वाटलं खरं, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी रुग्ण आणि दोन जण आले, काय तर म्हणे 'डॉक्टर यावर तुमची औषध काम नाही करणार?', म्हटलं का? तर म्हणे, 'शेजारच्याने करणी केल्यामुळे यांना हा रोग झालाय!' आत खरंच मी काय करणार?

थोडक्यात हा रोग 'बॅरिसेल्सा' नावाच्या विषाणुंमुळे होतो. सध्या तर हे विषाणू मारायला चांगली औषधं आहेत. ५ ते ७ दिवस गोळ्या खाल्ल्यावर रोग चटकन बरा होतो. जखमा भरायला थोडासा वेळ लागतो. पहिले दोन दिवस पुरळ यायच्या आधी जिथे पुरळ येणार तिथे खूप दुखतं. अगदी छातीवर आला तर हार्ट अ‍ॅटॅकप्रमाणे किंवा पोटावर अ‍ॅपेंडीसच्या इन्फेक्शनप्रमाणे. पाणी भरलेले छोटे छोटे पुरळ अगदी एका रेषेत येतात आणि पसरतात अगदी नागिणीप्रमाणे. काही जणांना थोडीशी वेदना होते, तर काहींना खूपच. जेवढं प्रमाण वाढतं, तेवढ्या वेदनाही वाढतात. ही वेदना काही जणांच्या बाबतीत पुरळ बरं झालं, तरी जास्त दिवस राहू शकते. कारण ते मज्जातंतू बरे व्हायला वेळ लागतो. काही जणांना तर अगदी रडवेलं होईपर्यंत दुखू शकतं. पण त्यावरही औषधं आहेत आणि हळूहळू हा प्रकार कमी होतो.

हा कुणालाही होऊ शकतो, पण लहान मुलांमध्ये क्वचित. कारण पहिल्यांदा कांजिण्या येतात हे आपण पाहिलं. तसा हा रोग संसर्गजन्य आहे. ज्यांना कांजिण्या झाल्या आहेत किंवा ज्यांनी त्याची लस टोचून घेतली आहे त्यांना काहीच त्रास नाही. नागिणीच्या रूग्णाकडून दुसऱ्यांना नागीण नाही होऊ शकत, पण कांजिण्या मात्र होऊ शकतात.

कधी त्रास जास्त असेल तर स्रायूंच्या संवेदना नष्ट होऊ शकतात. क्वचित एड्ससारख्या रूग्णांमध्ये हा पसरून मेंदूपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. डोळ्यांच्या भोवती जर आला तर नेत्रतज्ज्ञाची मदत जरूर घ्यावी. कधी कानात आला तरीही त्रास होऊ शकतो. चेहऱ्यावरील कोणत्याही भागाची विशेष काळजी घ्यावी. थोडक्यात काय तर नागीण या आजाराबद्दल बऱ्याच अंधश्रद्धा आहेत. पण त्या टाळून लवकर आणि योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. 

(लेखक हे ज्येष्ठ त्वचारोगतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स