शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

रात्री उशिरापर्यंत जागे राहता? असं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 14:46 IST

अनेक लोकांचा असा समज असतो की, कमी खाल्याने आणि व्यायाम केल्याने वजन कमी होतं. किंवा काही लोकांना असं वाटतं की, दिवसभरामध्ये जितकी धावपळ करतो तेवढंच वजन कमी होतं.

अनेक लोकांचा असा समज असतो की, कमी खाल्याने आणि व्यायाम केल्याने वजन कमी होतं. किंवा काही लोकांना असं वाटतं की, दिवसभरामध्ये जितकी धावपळ करतो तेवढंच वजन कमी होतं. पण हा समज चुकीचा आहे. 

यूनिवर्सिटी ऑफ पिट्सबर्गचे फिजिकल अॅक्टिव्हीटी अॅन्ड वेट मॅनेजमेंट रिसर्च सेंटरच्या अभ्यासकांनी सांगितल्यानुसार, ज्या व्यक्ती रात्री व्यवस्थित झोपत नाहीत, त्यांच्यामध्ये लठ्ठपणा येण्याची शक्यता इतर व्यक्तिंच्या तुलनेत अधिक असते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, व्यवस्थित झोप न घेतल्याने शरीरामध्ये काही हार्मोन बदल होतात आणि त्यामुळे वजन वाढते. 

संशोधक Jakicic यांच्या म्हणण्यानुसार, जर एखादी व्यक्ती रात्री उशीरापर्यंत जागत असेल तर त्या काहीना काही खात राहतात. ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते. 2013मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात सिद्ध झाल्यानुसार, ज्या व्यक्तींना रात्री शांत झोप लागत नाही, त्यांनाच जास्त भूक लागते. कारण जागं राहण्यासाठी शरीराला एक्सट्रा एनर्जीची आवश्यकता असते. 

हेल्थ एक्सपर्ट्सनी सांगितल्यानुसार, लेप्टिन आणि ग्रेहलीन यांसारखे हार्मोन्स भूक लागण्यासाठी जबाबदार असतात. आपण ज्यावेळी झोपतो त्यावेळी आपल्या शरीरात हे हार्मोन्स तयार होत असतात. त्यामुळे झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीराचं संपूर्ण चक्र बिघडतं. 

संशोधकांच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती झोपते त्यावेळी शरीरातील मांसपेशीं रिपेअर होत असतात. त्यामुळे तुम्ही पूर्ण झोप घेतली नाही तर तुमच्या मांसपेशी व्यवस्थित रिपेअर होत नाहीत. कमी झोपल्याने मेटाबॉलिज्म कमी होतं आणि शरीरातील कॅलरी बर्न होत नाहीत. परिणामी वजन वाढते. परंतु जर तुम्ही व्यवस्थित डाएट आणि झोप घेतली तर तुम्ही सहज वजन कमी करू शकता.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य