शहरं
Join us  
Trending Stories
1
महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
3
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
4
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
5
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
6
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
7
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
8
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
9
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
10
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
11
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
12
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
13
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
14
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
15
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
16
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
17
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
18
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
19
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
20
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य जगण्याचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 17:51 IST

माझ्या कार्य शाळेत मी बरेचदा एक प्रश्न विचारते ..  तुमच्या मते जीवन म्हणजे काय ? या प्रश्नावर विविध उत्तरे मिळतात ….     कोणी म्हणतो  जीवन एक संघर्ष आहे       कोणाला जीवन एक प्रवास वाटतो. 

- डाॅ.अरुणा तिजारे 

माझ्या कार्य शाळेत मी बरेचदा एक प्रश्न विचारते .. तुमच्या मते जीवन म्हणजे काय ?या प्रश्नावर विविध उत्तरे मिळतात ….    कोणी म्हणतो  जीवन एक संघर्ष आहे      कोणाला जीवन एक प्रवास वाटतो. तर कोणाला ते एक न  सुटणारं कोडं वाटतं       खरंच जीवनाची अशी एखादी व्याख्या आहे का? चार आंधळ्यांनी केलेल्या हत्तीच्या वर्णनासारख्याच आपल्या ह्या कल्पना आहेत . आणि आपण प्रत्येक जण आपापापल्या कल्पने प्रमाणे जगत  असतो . मला जीवन एका महासागरासारखे वाटते . आणि या महासागरातून सुखरूप  आपल्या  ध्येयापर्यंत पोहचायला कौशल्याची गरज आहे .कौशल्य - सतत समतोल राखण्याचं!कसं जगणं तोलाचं ? .... यशाचं का शांतीचं ?कसं जगणं मोलाचं ?.... धनाचं का समाधानाचं ?कसं  जगणं सुखाचं ?.... ध्येयाचं का मुक्तीचं ?कसं जगणं युक्तीचं ?.... महात्वाकांक्षेमागे धावण्याचं का आंतरिक गाभा मिळवण्याचं ? प्रश्न! प्रश्न !! प्रश्न !!! अनंत प्रश्न आणि अनंत उत्तरं !एका  तागडीत या जगातील यश, समृद्धी तर दुसऱ्या तागडीत आनंद, समाधान, शांती. कसं जगणं तेलाचं ? आणि तोलणार  कोण? या दोन्हीचा समतोल शक्य आहे का? आपण सगळेच सतत हा समतोल साधायची कसरत करत असतो पण हे कौशल्य मात्र काही जणांनाच जमतं .दाही दिशांनी वेगवेगळ्या अपेक्षा आपल्याला ओढत असतात . एकीकडे कुटुंबियांच्या अपेक्षा, नातेसंबंधांची भावनिक गुंतागुंत , दुसरीकडे आपल्या स्वतः कडून असलेल्या अपेक्षा, आणि ह्या अपेक्षा ज्या समाजात पूर्ण करायच्या आहेत त्या समाजाच्या अपेक्षा . एकीकडे समाजातील जीवघेणी स्पर्धा - मुलांचं मार्कांसाठी धावणं , नोकरी करणाऱ्यांची बढतीसाठी शर्यत आणि धडपड, गृहिणींची घर, मुलं, नवरा सांभाळतांना उडणारी तारांबळ. ह्या सगळ्यात भर म्हणून मानसिक गोंधळ - पैश्याच्या मागे लागणं वाईट पण पैसा तर मिळवायलाच हवा - मग तो अगदी न आवडणारी नोकरी करून मिळवावा लागला तरी महत्वाकांक्षा जास्त ठेवली तर नातेसंबंध नाराज होतात . एक जीव करणार तरी काय काय?... त्यात हा तोल सांभाळतांना येणारा ताणतणाव जर नियंत्रित नाही केला तर शारीरिक आणि मानसिक आजारपणांना आमंत्रण . मानसोपचार तज्ञ म्हणतात ,९०% आजारपणं ताणामुळे उद्भवतात . वोट्सअप वर सुविचार, ज्ञानाचे पाठ पुढे ढकलणं,  फॉरवर्ड करणं सोपं आहे हो, पण प्रत्यक्षात आचारायला  केव्ह्ढ्या तरी अडचणी !!!मग या कोषातून बाहेर पडण्याचा मार्गच नाही कां ? यश, संपत्ती बरोबरच आनंद, समाधान, शांती शक्य आहे का? हो आहे ! तेच तर कौशल्य, कसरत आहे . हे कौशल्य कोणालाही  शिकता  येतं आणि सरावाने त्यात प्रावीण्य सुद्धा मिळवता येतंया कोषातून बाहेर पडण्यासाठी 'मी ' च ज्ञान घेणं आवश्यक आहे. आपला समाज असतो मी म्हणजे मला आरश्यात दिसते तेव्हडीच मी- माझे गुण , अवगुण ,इच्छा आकांक्षा !!! आणि मग याच मी कडून आपण सगळीकडे पुरे पडण्याचा प्रयत्न करतो . पण खऱ्या अर्थानी मी हा थ्री डिमेंशनल आहे . माझं शरीर, माझं मन , आणि माझा आत्मा . मन आणि आत्मा दिसत नसले तरी ते दोन मिळून ९९% व्यक्तिमत्व घडत असतं आणि जोपर्यंत आपण ह्या तिन्हींची सतत समप्रमाणात प्रगती ( डेव्हलपमेंट ) करत नाही तोपर्यंत यश, समृद्धी + आनंद , समाधान याच गणित काही सुटत नाही . या तिन्हींची सतत प्रगती म्हणजे काय आणि ती कशी करायची? शरीराची (निगा) प्रगती -योग्य आहार, योग्य व्यायाम, आणि योग्य आराम यांनी होते तर मनाची प्रगती- नवीन ज्ञान मिळवुन , वाचन, मनन, चिंतनानी होते आत्मिक प्रगतीसाठी -ध्यान , धारणा, स्वः जागरूकता ( सेल्फ अवेरनेस ), सतत जाणीव पूर्वक जगण्या मुळे होते. या तिन्हींचा कुठेही समतोल ढळला तरी त्याचे परिणाम जीवनात आजारपण, अपयश, निराशा ह्या रूपात दिसतात . तेव्हा आजच ठरवून टाका कि ह्या थ्री डिमेन्शनल मी ची प्रगती मी जीवनावर न सोपवता  माझ्या हातात घेणार .