शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

पावसाळ्यात निरोगी राहायचंय? मग 'या' गोष्टी खाणं टाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 15:47 IST

पावसाळ्यात निरोगी राहायचंय असेल तर खाण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेऊया. 

पावसाळ्यातलं धुंद वातावरण सर्वांनाच आवडतं. मात्र याच वातावरणात अनेकदा आजारी पडण्याचा धोका हा अधिक असतो. खाण्याच्या काही चुकीच्या सवयी या आजारपणाला आमंत्रण देत असतात. त्यामुळेच पावसाळ्यात निरोगी राहायचंय असेल तर खाण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेऊया. 

- पावसाळ्यात अनेकदा वाफाळलेल्या चहासोबत भजीचा बेत आखला जातो. मात्र मोकळ्या वातावरणात उघड्यावर तळले गेलेले अन्नपदार्थ खाणं शक्यतो टाळा. कारण हवेतील जंतू हे त्या पदार्थावर बसतात त्यामुळे पोटाचे अनेक विकार होण्याचा धोका संभवतो. 

- हिरव्या पालेभाज्या या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असतात. तसेच डॉक्टरही त्या खाण्याचा सल्ला देतात. मात्र पावसाळ्यात शेतात किडे-जंतू असतात. ते पालेभाज्यांना चिकटतात. त्यामुळेच अशा भाज्यांचं सेवन शक्यतो टाळा.

- बाजारात उघड्यावर विकले जाणाऱे सरबत पिणं टाळा. बऱ्याचदा सरबत तयार करण्यासाठी वापरलेलं  पाणी अशुद्ध असते. त्यामुळे पावसाळ्यात घरी फळं आणून त्याचा रस पिणे फायदेशीर ठरेल. 

- पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे माशाचे सेवन करणं शक्यतो टाळा.

- पावसाळ्यात शिळे अन्नपदार्थ खाऊ नका. अनेकदा रात्रीचे अन्न वाया जाऊ नये यासाठी ते सकाळी खाल्ले जाते. मात्र पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे ते खराब होण्याची शक्यता असते.  

टॅग्स :foodअन्नRainपाऊस