शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पावसाळ्यात निरोगी राहायचंय? मग 'या' गोष्टी खाणं टाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 15:47 IST

पावसाळ्यात निरोगी राहायचंय असेल तर खाण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेऊया. 

पावसाळ्यातलं धुंद वातावरण सर्वांनाच आवडतं. मात्र याच वातावरणात अनेकदा आजारी पडण्याचा धोका हा अधिक असतो. खाण्याच्या काही चुकीच्या सवयी या आजारपणाला आमंत्रण देत असतात. त्यामुळेच पावसाळ्यात निरोगी राहायचंय असेल तर खाण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेऊया. 

- पावसाळ्यात अनेकदा वाफाळलेल्या चहासोबत भजीचा बेत आखला जातो. मात्र मोकळ्या वातावरणात उघड्यावर तळले गेलेले अन्नपदार्थ खाणं शक्यतो टाळा. कारण हवेतील जंतू हे त्या पदार्थावर बसतात त्यामुळे पोटाचे अनेक विकार होण्याचा धोका संभवतो. 

- हिरव्या पालेभाज्या या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असतात. तसेच डॉक्टरही त्या खाण्याचा सल्ला देतात. मात्र पावसाळ्यात शेतात किडे-जंतू असतात. ते पालेभाज्यांना चिकटतात. त्यामुळेच अशा भाज्यांचं सेवन शक्यतो टाळा.

- बाजारात उघड्यावर विकले जाणाऱे सरबत पिणं टाळा. बऱ्याचदा सरबत तयार करण्यासाठी वापरलेलं  पाणी अशुद्ध असते. त्यामुळे पावसाळ्यात घरी फळं आणून त्याचा रस पिणे फायदेशीर ठरेल. 

- पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे माशाचे सेवन करणं शक्यतो टाळा.

- पावसाळ्यात शिळे अन्नपदार्थ खाऊ नका. अनेकदा रात्रीचे अन्न वाया जाऊ नये यासाठी ते सकाळी खाल्ले जाते. मात्र पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे ते खराब होण्याची शक्यता असते.  

टॅग्स :foodअन्नRainपाऊस