शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

वजन कमी करण्यासाठी कसा फायदेशीर आहे ब्रेकफास्ट, जाणून घ्या ब्रेकफास्ट करण्याचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 15:17 IST

बऱ्याच जणांना असा गैरसमज असतो की वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळीची न्याहारी घेऊ नये. त्यामुळे ते ब्रेकफास्ट करणे टाळतात. उलट ब्रेकफास्ट न केल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढतं.

सकाळचा नाश्ता म्हणजेच ब्रेकफास्ट (Breakfast) हा आपल्या रोजच्या जीवनशैलाी मधील महत्वाचा घटक आहे. सकाळी ब्रेकफास्ट केल्याने अनेक फायदे होतात. ब्रेकफास्ट आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. बऱ्याच जणांना असा गैरसमज असतो की वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळीची न्याहारी घेऊ नये. त्यामुळे ते ब्रेकफास्ट करणे टाळतात. उलट ब्रेकफास्ट न केल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढतं. 

चयापचय सुरळीत करतेरात्री आपल्या शरीरातील सर्व क्रिया रात्रीच्यावेळी संथ गतीने सुरु असतात. त्यामुळे चयापचय संथ असते. सकाळी ब्रेकफास्ट न केल्यास हे चयापचय वेगाने होत नाही. तसेच त्यामुळे आपली फॅट बर्निंग प्रक्रियाही मंद होते. म्हणूनच सकाळी जागे झाल्यानंतर तासाभरात काहीतरी खाणे महत्वाचे आहे. चयापचय दर वाढवण्यासाठी, दररोज सकाळी न्याहारी करा. या ब्रेकफास्टमध्ये आपण ओट्स, उपमा, इडली इत्यादी पौष्टिक पदार्थ खाणे उत्तम.

‘नाईट क्रेविंग’ कमी करतेपौष्टिक आणि फायबरने भरपूर नाश्ता केल्याने रात्रीची भूक कमी होते. जे लोक सकाळी पुरेसा नाश्ता करत नाहीत त्यांना दिवसभर कार्ब खाण्याची तीव्र इच्छा होत असते. न्याहरीत उच्च कार्बोहायड्रेट आहार खाणे आवश्यक आहे, यामुळे साखरेची पातळी संतुलित राखली जाते आणि क्रेविंगही देखील कमी होते. तथापि, जे लोक सकाळच्या नाश्त्यात कमी कार्ब खातात, ते संध्याकाळी अधिक कार्ब सेवन करतात.

पोट बराच काळ भरलेले राहतेसकाळी फायबर समृद्ध पदार्थ खाल्ल्याने तुमचे पोट बर्‍याच वेळेस पूर्ण दिवस भरलेले राहते. यामुळे, अरबट-चरबट आणि चटपटीत तेलकट पदार्थ खाणे टाळले जाते. असे पदार्थ खाल्ल्याने तुमचे वजन झपाट्याने वाढू लागते. जेव्हा, आपण आपला सकाळचा नाश्ता वगळता, तेव्हा आपण आपली क्रेविंग वाढवण्याचे काम करता आणि आपले वजन वाढते.

प्रथिनांची कमतरता भरुन काढतेसकाळी नाश्ता न केल्याने प्रथिनांची शरीरातील कमतरता तशीच राहते. जर आपल्याला दीर्घकाळापर्यंत वजन नियंत्रित किंवा कमी करायचे असेल, तर आहारात पुरेशी प्रथिने सेवन करणे गरजेचे आहे. प्रथिने आपल्या रक्त पेशी आणि स्नायूंच्या दुरुस्तीचे कार्य करते. न्याहारी खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात आणि परिणामी वजन कमी होण्यास मदत होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न