शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी राहण्यासाठी रोज किती चालायला हवं? जाणून घ्या ५ ते ६० वर्ष वयोगटाचा प्रभावी 'वॉक प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 19:17 IST

अनेकजण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. विशेष म्हणजे इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा.

दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी नेहमी व्यायाम करणं किंवा चालणं महत्वाचं असतं. सतत आजारी पडायचं नसेल तर तुम्ही रोज चालून आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकता. पण त्यासाठी किती चालायला  किंवा चालण्यची योग्य पद्धत माहीत असणंही तितकंच महत्वाचं आहे.  अनेकजण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. विशेष म्हणजे इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा. त्यासाठी वेगळे असे काही करावे लागत नाही. रोज जर तुम्ही ३० मिनिटे चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही नाही. चला तर मग जाणून घेऊया चालण्याचे फायदे काय काय  आहेत. 

दररोज चालल्यानं  हृद्यासंबंधी आजारांचा धोका टळतो. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.रोज चालायची सवय असेल तर मेंदूसाठी फायदेशीर ठरतं. चालण्यामुळे  ताणतणाव कमी होतो. मुडही फ्रेश राहतो. डिमेंशिया आणि अल्झायमर असे आजार चालण्यामुळे उद्भवत नाहीत. 

चालण्यामुळे फुफ्फुसांपर्यंत मोकळी हवा पोहोचते. परिमाणी ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो. फुफ्फुसांच्या आजारांपासून लांब राहता येतं. नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते. याशिवाय चालल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. तसेच, तुमच्या सृजनशीलतेला चालना मिळते. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो. पचनक्रिया चांगली राहते.

दररोज किती चालायला हवं?

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी दररोज कमीतकमी अर्धा तास चालायला हवं. १०००० पावलं म्हणजेच ६ ते ७ किलोमीटर चालणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. चालण्यामुळे शरीराला उर्जा प्राप्त होते. प्रमाणापेक्षा जास्त चालण्याची आवश्यकता नाही. कारण गरजेपेक्षा जास्त चालल्यानं थकवा जाणवू शकतो. 

कोणत्या वयोगटातील व्यक्तीनं किती चालायला हवं

६ ते १७ वर्ष वयोगटातील लोकांनी १५००० पावलं चालायला हवं. १२०० पावलंही चालू शकता. १८ ते ४० वर्ष वयोगटातील लोकांनी  १२००० पावलं चालणं उत्तम ठरेल. ५० वर्ष वय असलेल्या लोकांनी १०००० पावलं चालायला हवं. ६० वर्ष वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्यांनी ८००० पावलं चालायला हवं. 

हे पण वाचा-

खुशखबर! भारतात सर्वाधिक लोकांच्या शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी एंटीबॉडी तयार

कोरोनाचं ३ तिसरं लक्षणं आहे अंगदुखी आणि मासपेशींतील वेदना; 'या' उपायांनी मिळवा आराम

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य