शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

नंतर पस्तावण्याऐवजी आत्ताच शिकून घ्या फळं खाण्याची योग्य पद्धत, होतील भरपूर फायदे..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 17:38 IST

आपल्याला फळे खाण्याचा योग्य मार्ग माहित नसेल, तर हे आपल्या आरोग्यासाठी बर्‍याच समस्या निर्माण करू शकते. चला तर, फळे खाण्याच्या योग्य पद्धती आणि त्या संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया…

फळ ही एक अशी गोष्ट आहे, ज्यामध्ये बरीच खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात, जी सर्वसाधारणपणे मानवी शरीरासाठी आवश्यक असतात, या बद्दल आपल्याला बहुदा माहितीच नसते. जर एखादी व्यक्ती अन्न सोडून केवळ फळे खात असेल, तर तो आपले संपूर्ण आयुष्य सहजपणे जगू शकेल. एकाच फळाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीस जीवनसत्त्वांसह भरपूर प्रमाणात पाणी, कार्बोहायड्रेट, फॅटी अॅसिडस्, अमीनो अॅसिडस् मिळतात 

याशिवाय फळे अगदी सहज पचतात, कारण त्यात 80 ते 90 टक्के पाणी असते. पौष्टिक घटकांनी समृद्ध फळे आपल्या संपूर्ण आहारात महत्त्वाचे कार्य करते, म्हणून ते खाण्याचा योग्य मार्ग जाणून घेणे फार महत्वाचे आहे. कारण जर आपल्याला फळ खाण्याचा योग्य मार्ग माहित नसेल, तर हे आपल्या आरोग्यासाठी बर्‍याच समस्या निर्माण करू शकते. चला तर, फळे खाण्याच्या योग्य पद्धती आणि त्या संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया…

‘अशा’ प्रकारे फळे खाल्ल्यास होते नुकसान

आपल्यापैकी बहुतेकजण फळे खाताना काही सामान्य चुका करतात. जसे की आपण आंबा किंवा इतर कोणतेही फळ जेवल्यानंतर खातो, किंवा एखाद्या फंक्शनमध्ये असताना प्रथम फ्रुटचाट भरभरून खातो आणि नंतर जेवतो. अशा परिस्थितीत फळ आपल्या शरीराला लाभदायी ठरण्याऐवजी हानिकारक ठरतात आणि आम्लपित्त, पोट फुगणे, आंबट ढेकर, गॅस यासारख्या समस्या उद्भवू लागतात. अशावेळी आपण खाण्याला दोष देऊन मोकळे होतो.

‘या’ हानीमागचे कारण जाणून घ्या!

वरील परिस्थिती आपल्याला शरीराला झालेला तोटा हा अन्नामुळे नव्हे, तर फळांमुळे आहे. कारण, फळ स्वतःच एक संपूर्ण आहार आहे. त्यासोबत आणखी काही खाण्याची गरज नाही. याशिवाय फळाला स्वतःची नैसर्गिक साखर असते. साखर कोणत्याही गोष्टीमध्ये किण्वन सुरू करते. म्हणून फळांसोबत खाल्लेले अन्न किंवा फळ खाल्ल्यानंतर लगेच खाल्लेले अन्न, त्या फळात असलेल्या साखरेमुळे सडण्यास सुरुवात होते आणि आपल्याला पचनासंबंधित समस्या उद्भवू लागतात.

फळे खाण्याची ‘ही’ आहे योग्य पद्धत

खरं तर, फळ खाण्याचा योग्य मार्ग म्हणजे फळाचे सेवन केल्यानंतर किमान 45 मिनिटे ते तासाभर काहीही खाऊ नये. याशिवाय जेव्हा जेव्हा फळ खाता तेव्हा लक्षात ठेवा की, आपले पोट त्यावेळी रिक्त असले पाहिजे. यामुळे आपल्या शरीराला संपूर्ण पोषण मिळेल आणि ते सहज पचतील. लक्षात ठेवा की, फळांना इतर कशाचीही आवश्यकता नसते, ते स्वतःमध्ये एक परिपूर्ण आहार आहेत. हेच कारण आहे की, जुन्या काळातही ऋषी मुनि केवळ फळे खाऊन आपले जीवन जगत असत. म्हणून भरपूर फळे खा आणि निरोगी राहा.

म्हणे एलियन्स येणार पृथ्वीवर, करणार युद्ध

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स