शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

नंतर पस्तावण्याऐवजी आत्ताच शिकून घ्या फळं खाण्याची योग्य पद्धत, होतील भरपूर फायदे..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 17:38 IST

आपल्याला फळे खाण्याचा योग्य मार्ग माहित नसेल, तर हे आपल्या आरोग्यासाठी बर्‍याच समस्या निर्माण करू शकते. चला तर, फळे खाण्याच्या योग्य पद्धती आणि त्या संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया…

फळ ही एक अशी गोष्ट आहे, ज्यामध्ये बरीच खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात, जी सर्वसाधारणपणे मानवी शरीरासाठी आवश्यक असतात, या बद्दल आपल्याला बहुदा माहितीच नसते. जर एखादी व्यक्ती अन्न सोडून केवळ फळे खात असेल, तर तो आपले संपूर्ण आयुष्य सहजपणे जगू शकेल. एकाच फळाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीस जीवनसत्त्वांसह भरपूर प्रमाणात पाणी, कार्बोहायड्रेट, फॅटी अॅसिडस्, अमीनो अॅसिडस् मिळतात 

याशिवाय फळे अगदी सहज पचतात, कारण त्यात 80 ते 90 टक्के पाणी असते. पौष्टिक घटकांनी समृद्ध फळे आपल्या संपूर्ण आहारात महत्त्वाचे कार्य करते, म्हणून ते खाण्याचा योग्य मार्ग जाणून घेणे फार महत्वाचे आहे. कारण जर आपल्याला फळ खाण्याचा योग्य मार्ग माहित नसेल, तर हे आपल्या आरोग्यासाठी बर्‍याच समस्या निर्माण करू शकते. चला तर, फळे खाण्याच्या योग्य पद्धती आणि त्या संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया…

‘अशा’ प्रकारे फळे खाल्ल्यास होते नुकसान

आपल्यापैकी बहुतेकजण फळे खाताना काही सामान्य चुका करतात. जसे की आपण आंबा किंवा इतर कोणतेही फळ जेवल्यानंतर खातो, किंवा एखाद्या फंक्शनमध्ये असताना प्रथम फ्रुटचाट भरभरून खातो आणि नंतर जेवतो. अशा परिस्थितीत फळ आपल्या शरीराला लाभदायी ठरण्याऐवजी हानिकारक ठरतात आणि आम्लपित्त, पोट फुगणे, आंबट ढेकर, गॅस यासारख्या समस्या उद्भवू लागतात. अशावेळी आपण खाण्याला दोष देऊन मोकळे होतो.

‘या’ हानीमागचे कारण जाणून घ्या!

वरील परिस्थिती आपल्याला शरीराला झालेला तोटा हा अन्नामुळे नव्हे, तर फळांमुळे आहे. कारण, फळ स्वतःच एक संपूर्ण आहार आहे. त्यासोबत आणखी काही खाण्याची गरज नाही. याशिवाय फळाला स्वतःची नैसर्गिक साखर असते. साखर कोणत्याही गोष्टीमध्ये किण्वन सुरू करते. म्हणून फळांसोबत खाल्लेले अन्न किंवा फळ खाल्ल्यानंतर लगेच खाल्लेले अन्न, त्या फळात असलेल्या साखरेमुळे सडण्यास सुरुवात होते आणि आपल्याला पचनासंबंधित समस्या उद्भवू लागतात.

फळे खाण्याची ‘ही’ आहे योग्य पद्धत

खरं तर, फळ खाण्याचा योग्य मार्ग म्हणजे फळाचे सेवन केल्यानंतर किमान 45 मिनिटे ते तासाभर काहीही खाऊ नये. याशिवाय जेव्हा जेव्हा फळ खाता तेव्हा लक्षात ठेवा की, आपले पोट त्यावेळी रिक्त असले पाहिजे. यामुळे आपल्या शरीराला संपूर्ण पोषण मिळेल आणि ते सहज पचतील. लक्षात ठेवा की, फळांना इतर कशाचीही आवश्यकता नसते, ते स्वतःमध्ये एक परिपूर्ण आहार आहेत. हेच कारण आहे की, जुन्या काळातही ऋषी मुनि केवळ फळे खाऊन आपले जीवन जगत असत. म्हणून भरपूर फळे खा आणि निरोगी राहा.

म्हणे एलियन्स येणार पृथ्वीवर, करणार युद्ध

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स