शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर
4
"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट
5
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
6
Crime: प्रेयसीनं संबंध तोडल्यानं भडकला प्रियकर, घरात घुसून तिच्यावर झाडल्या गोळ्या!
7
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
8
शुक्र गोचर २०२५: वर्षाखेरिस 'या' ५ राशींना मिळणार धन, संपत्ती करिअरबाबत मोठी भेट
9
सफला एकादशी २०२५: सफला एकादशीचा गुप्त उपाय! कागदावर ३ इच्छा लिहा, २०२६ ला इच्छापूर्तीचा अनुभव घ्या!
10
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
11
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
12
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
13
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
14
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
15
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
16
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
17
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
18
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
19
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
20
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दाढदुखीच्या वेदना सहन होत नाही? जाणून घ्या कारणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 18:36 IST

अक्कल दाढ आल्यानंतर लोकांना अक्कल येते, असं म्हणतात. त्यामागे कारण आहे. कारण अनेकजणांना ही  दाढ  १७ ते २१ वयात येते.

(Image credit-drakefamilydds.com)

अक्कल दाढ आल्यानंतर लोकांना अक्कल येते, असं म्हणतात. त्यामागे कारण आहे. कारण अनेकजणांना ही  दाढ  १७ ते २१ वयात येते. तर काही लोकांना २१ वय झाल्यानंतर येते. अक्कल दाढ ही तोंडाच्या मागच्या भागात येते. हिरड्यामधून अक्कल दाढ वर येते. जर तुम्ही सुध्दा अक्कल दाढीमुळे होणाऱ्या वेदनेमुळे त्रस्त आहात  तर आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला अक्कल दाढ येताना जो त्रास होतो. त्यामागचं कारण कळेल.

सगळ्यांनाच अक्कल दाढ त्रासदायक ठरेल असं नाही. पण भरपूर लोकांना अक्कल दाढा अखेरीस त्रास देऊ लागतात. व काढाव्या लागतात. अक्कल दाढ किडून खूप दुखत असल्यास ती काढून टाकावी. अक्कल दाढेभोवती असलेली हिरडी वारंवार जेवण अडकल्यामुळे सुजत असल्यास ती काढणे योग्य ठरतं. अक्कल दाढेमुळे बाहेरच्या भागावर सूज असल्यासही ती काढून टाकावी. अक्कल दाढ तोंडात संपूर्णपणे बाहेर आलेली नसेल, ती वाकडी असेल व शेजारच्या दाताला त्रास देत असेल तर तिचा संसर्ग शेजारच्या दाताला होऊन तो किडत असेल तर ती काढून टाकावी. दात काढलेल्या ठिकाणी काही वेळ रक्तस्राव होतो. दुसर्‍या दिवशी तोंडाला सूज येऊन किंचित त्रास होऊ शकतो. 

(Image credit- grove dental)

तोंडाला दुर्गंधी येण्याच्या समस्या वाढतात. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास इन्फेक्शन अधिक गंभीर होण्याची शक्यता असते.काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये पसमध्येच ट्युमर तयार होतो. अशावेळेस शस्त्रक्रिया करणे भाग असते. काहीवेळा अक्कल दाढेजवळ वाढणारा ट्युमर पाहता सर्जिकल एक्सट्राक्शन करणे गरजेचे असते.अक्कल दाढीमुळे होणाऱ्या तोंडाच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी काही घरगुती पदार्थांचा वापर केल्यास आराम मिळेल.

(Image credit- forestwooddental)

दातदुखीवर मीठ ही उपयुक्‍त ठरतं. हिरड्यांची जळजळ कमी करण्यास मदत करते. त्याशिवाय मिठाचा वापर केल्याने संसर्गाचा धोकाही कमी होतो. कांदा आणि लसून दाढीसाठी फायदेशीर ठरतात. लसणामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबायोटिक, अँटी इन्फ्लमेटरी गुण आहेत. तसेच इतरही औषधी गुण आहेत. त्यामुळे अक्‍कलदाढ येतानाच्या वेदना कमी होतात.  कांद्यामध्ये जीवाणूप्रतिबंधात्मक आणि इतरही काही गुण असतात. त्यामुळे दाताच्या वेदनेत आराम मिळू शकतो. तसेच हिरड्यांच्या संसर्गापासूनही सुरक्षा मिळते. दातदुखीमध्ये पेरूची पाने आणि लवंग औषधांसारखे काम करतात. त्यात वेदना कमी करणारी आणि अँटीमायक्रोबियल गुण असतात. त्यामुळे दातदुखी कमी होते. 

टॅग्स :Healthआरोग्य