शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

दाढदुखीच्या वेदना सहन होत नाही? जाणून घ्या कारणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 18:36 IST

अक्कल दाढ आल्यानंतर लोकांना अक्कल येते, असं म्हणतात. त्यामागे कारण आहे. कारण अनेकजणांना ही  दाढ  १७ ते २१ वयात येते.

(Image credit-drakefamilydds.com)

अक्कल दाढ आल्यानंतर लोकांना अक्कल येते, असं म्हणतात. त्यामागे कारण आहे. कारण अनेकजणांना ही  दाढ  १७ ते २१ वयात येते. तर काही लोकांना २१ वय झाल्यानंतर येते. अक्कल दाढ ही तोंडाच्या मागच्या भागात येते. हिरड्यामधून अक्कल दाढ वर येते. जर तुम्ही सुध्दा अक्कल दाढीमुळे होणाऱ्या वेदनेमुळे त्रस्त आहात  तर आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला अक्कल दाढ येताना जो त्रास होतो. त्यामागचं कारण कळेल.

सगळ्यांनाच अक्कल दाढ त्रासदायक ठरेल असं नाही. पण भरपूर लोकांना अक्कल दाढा अखेरीस त्रास देऊ लागतात. व काढाव्या लागतात. अक्कल दाढ किडून खूप दुखत असल्यास ती काढून टाकावी. अक्कल दाढेभोवती असलेली हिरडी वारंवार जेवण अडकल्यामुळे सुजत असल्यास ती काढणे योग्य ठरतं. अक्कल दाढेमुळे बाहेरच्या भागावर सूज असल्यासही ती काढून टाकावी. अक्कल दाढ तोंडात संपूर्णपणे बाहेर आलेली नसेल, ती वाकडी असेल व शेजारच्या दाताला त्रास देत असेल तर तिचा संसर्ग शेजारच्या दाताला होऊन तो किडत असेल तर ती काढून टाकावी. दात काढलेल्या ठिकाणी काही वेळ रक्तस्राव होतो. दुसर्‍या दिवशी तोंडाला सूज येऊन किंचित त्रास होऊ शकतो. 

(Image credit- grove dental)

तोंडाला दुर्गंधी येण्याच्या समस्या वाढतात. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास इन्फेक्शन अधिक गंभीर होण्याची शक्यता असते.काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये पसमध्येच ट्युमर तयार होतो. अशावेळेस शस्त्रक्रिया करणे भाग असते. काहीवेळा अक्कल दाढेजवळ वाढणारा ट्युमर पाहता सर्जिकल एक्सट्राक्शन करणे गरजेचे असते.अक्कल दाढीमुळे होणाऱ्या तोंडाच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी काही घरगुती पदार्थांचा वापर केल्यास आराम मिळेल.

(Image credit- forestwooddental)

दातदुखीवर मीठ ही उपयुक्‍त ठरतं. हिरड्यांची जळजळ कमी करण्यास मदत करते. त्याशिवाय मिठाचा वापर केल्याने संसर्गाचा धोकाही कमी होतो. कांदा आणि लसून दाढीसाठी फायदेशीर ठरतात. लसणामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबायोटिक, अँटी इन्फ्लमेटरी गुण आहेत. तसेच इतरही औषधी गुण आहेत. त्यामुळे अक्‍कलदाढ येतानाच्या वेदना कमी होतात.  कांद्यामध्ये जीवाणूप्रतिबंधात्मक आणि इतरही काही गुण असतात. त्यामुळे दाताच्या वेदनेत आराम मिळू शकतो. तसेच हिरड्यांच्या संसर्गापासूनही सुरक्षा मिळते. दातदुखीमध्ये पेरूची पाने आणि लवंग औषधांसारखे काम करतात. त्यात वेदना कमी करणारी आणि अँटीमायक्रोबियल गुण असतात. त्यामुळे दातदुखी कमी होते. 

टॅग्स :Healthआरोग्य