शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

मिरच्या खाल्ल्याने कमी होतो हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 17:43 IST

मिरची हा स्वयंपाक घरात वापरला जाणारा पदार्थ आहे. काही लोकांच्या आहारात मिरच्यांचे प्रमाण अधिक असते.

मिरची हा स्वयंपाक घरात वापरला जाणारा पदार्थ आहे. काही लोकांच्या आहारात मिरच्यांचे प्रमाण अधिक असते. तर काही लोक अगदी कमी प्रमाणात मिरची तसंच मसाल्यांचं सेवन करतात. इटलीच्या वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. त्यांचा निदर्शनास असे आले की जी लोकं आठवड्यातून चारपेक्षा जास्तवेळा मसाल्याचे पदार्थ खातात. त्यांच्यात हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्यांची संख्या ४० टक्के कमी होती. तेच मिरची न खाणाऱ्या लोकांमध्ये आजारांचे प्रमाण जास्त होते. या संदर्भातील माहिती ही अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजी या पुस्तकात नमुद करण्यात आली आहे.

या अभ्यासानुसार मागिल ८ वर्षापासून इटलीच्या पॉरज़िल्ली मध्ये न्यूरोमेड न्यूरोलॉजिकल इंस्टीट्यूट येथिल तज्ञांनी  हेल्दी आणि अन्हेल्दी आहार घेत असलेल्या लोकांचे निरीक्षण केले. ज्यात असं दिसून आलं की मिरची खाणारे लोक हे मिरची न खाणाऱ्यांच्या तुलनेत अधिक सुदृढ आहेत. तसंच हिरवी मिरची आपल्या पचन तंत्रासाठी खूप लाभदायक आहे. आपल्या अन्नामध्ये फायबर अधिक प्रमाणात आढळते. तसंच हिरव्या मिरचीमुळे त्वचा साफ राहते. त्यामुळे, पिंपल्सपासून दूर राहण्यास मदत होते. 

 तसंच हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन बी६, लोह, पॅाटेशियम, आणि कर्बोदकाचा समावेश असतो. ज्यामुळे शरीराला त्याचा फायदा होतो .मधुमेहाच्या रुग्णांसाठी मिरची खाणं गरजेचे आहे. जर तुमची शुगर लेव्हल वाढली असेल तर ती कमी करण्यास मदत होते. त्याचबरोबर शरीरातील फॅट कमी करुन मेटाबॅालिजम वाढवते. त्यामुळे मिरची शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी लाभदायक ठरते.

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य