शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Nipah Virus : चिंताजनक! निपाह व्हायरस किती धोकादायक?; 'ही' आहेत लक्षणं, 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 15:00 IST

Nipah Virus : केरळच्या कोझिकोडमध्ये तापाने दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर निपाह व्हायरस कारणीभूत असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

केरळमध्ये दोन जणांच्या मृत्यूनंतर निपाह व्हायरसचा प्रसार होण्याची भीती पुन्हा एकदा वाढली आहे. केरळच्या कोझिकोडमध्ये तापाने दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर निपाह व्हायरस कारणीभूत असण्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्यानंतर संपूर्ण राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. एका मृताच्या नातेवाईकाला डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवलं आहे. याची माहिती मिळताच राज्य सरकारने तातडीने कारवाई केली असून आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. 

2018 मध्ये निपाह व्हायरसची 23 प्रकरणे आढळून आली होती आणि त्यामुळे 17 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. निपाह व्हायरस हा एक जेनेटिक व्हायरस आहे जो प्राण्यांपासून माणसांमध्ये प्रवेश करतो आणि नंतर माणसांमध्ये पसरतो. या व्हायरसचे नाव मलेशियातील एका गावाच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे, जिथे पहिल्यांदा याची नोंद झाली होती. फ्लाइंग फॉक्स नावाच्या वटवाघळामुळे त्याचा प्रसार होतो. व्हायरसची लागण झालेल्या वटवाघळांमुळे हा संसर्ग माणसांमध्ये पसरतो. 

जेव्हा ते प्राणी किंवा त्यांच्या लाळेच्या किंवा शरीरातील इतर द्रव्यांच्या संपर्कात येतात तेव्हा त्याचा प्रसार होण्याचा मोठा धोका असतो. एवढेच नाही तर कधी कधी त्यांनी खाल्लेली फळे खाल्ल्याने संसर्ग होण्याचा धोकाही निर्माण होतो. याची लागण झालेली व्यक्ती हा संसर्ग इतरांपर्यंत पसरवते. ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे आणि उलट्या होणे ही याची लक्षणं आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, निपाह संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मृत्यू दर 40 ते 75 टक्के आहे.

WHO च्या म्हणण्यानुसार, निपाहसाठी सध्या कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नाही. जागतिक आरोग्य संस्था यावर जोर देते की लोकांमध्ये निपाह संसर्ग कमी करण्याचा किंवा रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जागरूकता पसरवणे. हे सार्वजनिक शिक्षणाद्वारे हे केलं जाऊ शकतं जसं की लोकांना खाण्यापूर्वी फळं पूर्णपणे धुण्यास सांगणे आणि संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानंतर खबरदारीचं पालन करणं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स