शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

या पावसाळ्यात आपलं मूल सारखं आजारी पडतंय?..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 16:18 IST

थोडीशी काळजी घेतली तर मुलांपासून दूर पळवता येतील आजार..

ठळक मुद्देमच्छर आणि इतर जीवजंतूंपासून मुलांची काळजी घ्या, मच्छरदाणीचा आवर्जुन वापर करा. मुलांना उकळून गार केलेले पाणी देणे केव्हाही उत्तम.पावसाळी वातावरणात मुलांना फार वेळ बाहेर आणि गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये. मुलांची वैयक्तिक स्वच्छताही या काळात खूपच महत्त्वाची.

- मयूर पठाडेपावसाळ्यातला तो सारखा पाऊस, चिकचिक, दमट वातावण.. अशा डल वातावरणात आपल्यालाही डल वाटायला लागतं, पण याच काळात आजारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. लहान मुलांनी तर दवाखाने अक्षरश: भरलेले असतात. हाच काळ असा आहे, ज्यावेळी डास, मच्छर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जीवजंतूंचीही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असते. कारण हाच काळ त्यांच्या वाढीसाठी खूपच पोषक असतो.मुलांची रोगप्रतिकारशक्ती पूर्णत: विकसित झालेली नसल्याने याच काळात हे जीवजंतू त्यांच्यावर आक्रमण करतात आणि लहान मुलं आजारांनी त्रस्त होतात.याच काळात मुलांची मोठ्या प्रमाणात काळजी घेणं गरजेचं असतं. अर्थात त्यासाठी फार काही करण्याची गरज नाही, पण काही महत्त्वाच्या आणि ठराविक गोष्टी केल्या तरी आपली मुलं या आजारांपासून दूर राहू शकतील आणि त्यांच्या आनंदी बागडण्यानं घरंही प्रफुल्लित राहू शकेल.काय काळजी घ्याल?1- पावसाळी वातावरणात मच्छरांपासून आपल्या मुलांना जपा. डासांपासून अनेक आजार पसरतात.२- या काळात अनेक आजारांनी थैमान मांडलेलं असतं. अ‍ॅलर्जिक आजार तर या काळात वाढतातच, पण कावीळ, व्हायरल फिवर, डेंग्यू, मलेरियासारखे आजारही मुलांना लगेच आपल्या कह्यात घेतात.३- मच्छरांपासून मुलांचं रक्षण करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर अवश्य केला जावा. मच्छर कोणत्याही प्रतिबंधक उपायांना दाद देण्यास फार लवकर शिकतात. त्यामुळे त्यांना अटकाव करणं फारच कठीण असतं. त्यामुळे मच्छरदाणी हा त्यातल्या त्यात सर्वोत्तम उपाय.४- या काळात पाणी दुषित झालेलं असतं. त्यामुळे डायरिया, टॉयफॉइडसारखे आजारही लगेच बळावतात. त्यासाठी मुलांना उकळून गार केलेले पाणी देणे केव्हाही उत्तम.५- शक्यतो पावसाळी वातावरणात मुलांना फार वेळ बाहेर आणि गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये. मुलांना इन्फेक्शन होण्यास वेळ लागत नाही.६- आपल्या आसपासचा परिसर तर स्वच्छ असावाच, पण मुलांची वैयक्तिक स्वच्छताही या काळात खूपच महत्त्वाची.या गोष्टींची काळजी घेतली तर आपलं मूल नक्कीच वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवील आणि त्यामुळे आपलं घरही हसतं, आनंदी राहील.