शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

जळगावात उष्णतेची लाट सर्वोच्च ४७ अंश तापमानाची नोंद : उन्हाचे अक्षरश: चटके, दुपारी रस्ते निर्मनुष्य

By admin | Updated: May 19, 2016 00:42 IST

जळगाव : गेल्या आठवड्यापासून वाढत जाणार्‍या उन्हामुळे सुवर्णनगरी होरपळून निघाली आहे. बुधवारी या मोसमातील सर्वोच्च ४७ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. शनिवारपासून ४६ अंशावर गेलेला पारा कमी होत नसल्याचे चित्र आहे. या उष्णतेच्या लाटीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून दुपारी रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र शहरात होते.

जळगाव : गेल्या आठवड्यापासून वाढत जाणार्‍या उन्हामुळे सुवर्णनगरी होरपळून निघाली आहे. बुधवारी या मोसमातील सर्वोच्च ४७ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. शनिवारपासून ४६ अंशावर गेलेला पारा कमी होत नसल्याचे चित्र आहे. या उष्णतेच्या लाटीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून दुपारी रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र शहरात होते.
बुधवारी सकाळपासूनच सूर्य आग ओकत होता. दुपार होताच शरीराला अस‘ चटके बसत होते. त्यामुळे दुपारी शहरातील बहुसंख्य रस्ते निर्मनुष्य झाले होते. कामानिमित्त बाहेर निघणार्‍यांनी डोक्यात टोपी, तोंडावर रुमाल व डोळ्यावर चष्मा घातला होता. तळहातावर पोट असलेल्यांना रखरखत्या उन्हात आपला व्यवसाय करावा लागला.
या वाढत्या तापमानामुळे घरातील कुलर आणि फॅनदेखील निरुपयोगी ठरत आहे. सिमेंट, लोखंडी पत्र्यांच्या घरात सर्वाधिक उकाडा जाणवत आहे.
रात्रीपर्यंत उष्णलहर
तापमान ४७ अंश सेल्सीअसपर्यंत पोहचल्यामुळे सूर्यास्त झाल्यानंतरदेखील बुधवारी रात्रीपर्यंत उष्णतेच्या झळा बसत असल्याने नागरिक हैराण होत होते. उष्णतेचा सर्वाधिक फटका हा लहान मुले आणि वृद्धाना बसत होता. जास्त उष्णतेमुळे डोळ्यांची जळजळ होणे, डोके दुखणे, मळमळ होणे असा त्रास होत होता.
वाढत्या तापमानाचा मनुष्याला फटका बसत असताना पशुपक्षी व प्राण्यांनादेखील तडाखा बसत होता. मोकाट गायी व गुरे सावलीच्या शोधासाठी झाडाखाली बसून होते.

११ वाजेपासून रस्ते निमर्नुष्य
सकाळी ९ वाजेपासून उन्हाचा तडाखा जाणवत होता. सकाळी ११ वाजेपासून रस्त्यांवर वाहने नसल्याने रस्ते निर्मनुष्य झाले होते. दुपारी १२ वाजेनंतर तापमानात वाढ झाली. क्वचितच कामानिमित्त कोणी वाहनाने रस्त्यावरून जाताना दिसल्यानंतर तो काही अंतरावर गेल्यावर सावली व पाण्याचा शोध घेत होता.

सकाळीच कामांची धडपड
सकाळी ११ वाजेनंतर उन्हाचा तडाखा वाढत असल्याने नागरिक सकाळीच कामे आटोपण्यावर भर देत आहेत. दुपारी शहरातील रस्त्यांवर अघोषित संचारबंदी असल्यासारखी स्थिती असते.

वाढते तापमान
१४ मे- ४५
१५ मे- ४६
१६ मे- ४४.७
१७ मे- ४६
१८ मे- ४७ (ताममान अंश सेल्सीअस)

पुढील चार दिवस आणखी उष्णलहर राहू शकते. त्यामुळे शक्यतो दुपारी घराबाहेर निघू नये. सकाळीच कामे पूर्ण करावी, असा सल्ला दिला जात आहे.

-१९ मे- ४६
-२० मे- ४३.३
-२१ मे- ४२.२८
-२२ मे- ४२.२८ (ताममान अंश सेल्सीअस)