शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

जळगावात उष्णतेची लाट सर्वोच्च ४७ अंश तापमानाची नोंद : उन्हाचे अक्षरश: चटके, दुपारी रस्ते निर्मनुष्य

By admin | Updated: May 19, 2016 00:42 IST

जळगाव : गेल्या आठवड्यापासून वाढत जाणार्‍या उन्हामुळे सुवर्णनगरी होरपळून निघाली आहे. बुधवारी या मोसमातील सर्वोच्च ४७ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. शनिवारपासून ४६ अंशावर गेलेला पारा कमी होत नसल्याचे चित्र आहे. या उष्णतेच्या लाटीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून दुपारी रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र शहरात होते.

जळगाव : गेल्या आठवड्यापासून वाढत जाणार्‍या उन्हामुळे सुवर्णनगरी होरपळून निघाली आहे. बुधवारी या मोसमातील सर्वोच्च ४७ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. शनिवारपासून ४६ अंशावर गेलेला पारा कमी होत नसल्याचे चित्र आहे. या उष्णतेच्या लाटीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून दुपारी रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र शहरात होते.
बुधवारी सकाळपासूनच सूर्य आग ओकत होता. दुपार होताच शरीराला अस‘ चटके बसत होते. त्यामुळे दुपारी शहरातील बहुसंख्य रस्ते निर्मनुष्य झाले होते. कामानिमित्त बाहेर निघणार्‍यांनी डोक्यात टोपी, तोंडावर रुमाल व डोळ्यावर चष्मा घातला होता. तळहातावर पोट असलेल्यांना रखरखत्या उन्हात आपला व्यवसाय करावा लागला.
या वाढत्या तापमानामुळे घरातील कुलर आणि फॅनदेखील निरुपयोगी ठरत आहे. सिमेंट, लोखंडी पत्र्यांच्या घरात सर्वाधिक उकाडा जाणवत आहे.
रात्रीपर्यंत उष्णलहर
तापमान ४७ अंश सेल्सीअसपर्यंत पोहचल्यामुळे सूर्यास्त झाल्यानंतरदेखील बुधवारी रात्रीपर्यंत उष्णतेच्या झळा बसत असल्याने नागरिक हैराण होत होते. उष्णतेचा सर्वाधिक फटका हा लहान मुले आणि वृद्धाना बसत होता. जास्त उष्णतेमुळे डोळ्यांची जळजळ होणे, डोके दुखणे, मळमळ होणे असा त्रास होत होता.
वाढत्या तापमानाचा मनुष्याला फटका बसत असताना पशुपक्षी व प्राण्यांनादेखील तडाखा बसत होता. मोकाट गायी व गुरे सावलीच्या शोधासाठी झाडाखाली बसून होते.

११ वाजेपासून रस्ते निमर्नुष्य
सकाळी ९ वाजेपासून उन्हाचा तडाखा जाणवत होता. सकाळी ११ वाजेपासून रस्त्यांवर वाहने नसल्याने रस्ते निर्मनुष्य झाले होते. दुपारी १२ वाजेनंतर तापमानात वाढ झाली. क्वचितच कामानिमित्त कोणी वाहनाने रस्त्यावरून जाताना दिसल्यानंतर तो काही अंतरावर गेल्यावर सावली व पाण्याचा शोध घेत होता.

सकाळीच कामांची धडपड
सकाळी ११ वाजेनंतर उन्हाचा तडाखा वाढत असल्याने नागरिक सकाळीच कामे आटोपण्यावर भर देत आहेत. दुपारी शहरातील रस्त्यांवर अघोषित संचारबंदी असल्यासारखी स्थिती असते.

वाढते तापमान
१४ मे- ४५
१५ मे- ४६
१६ मे- ४४.७
१७ मे- ४६
१८ मे- ४७ (ताममान अंश सेल्सीअस)

पुढील चार दिवस आणखी उष्णलहर राहू शकते. त्यामुळे शक्यतो दुपारी घराबाहेर निघू नये. सकाळीच कामे पूर्ण करावी, असा सल्ला दिला जात आहे.

-१९ मे- ४६
-२० मे- ४३.३
-२१ मे- ४२.२८
-२२ मे- ४२.२८ (ताममान अंश सेल्सीअस)