शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

महिलांमध्ये वाढतेय पाठीचे दुखणे, सर्वेक्षणातील अहवाल : गंभीर होण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 07:17 IST

रात्रंदिवस घर आणि नोकरीचा तोल सांभाळून राबणाºया महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्यात पाठदुखीचे प्रमाण वाढल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे. महिलांना होणाºया पाठदुखीकडे त्या कायम दुर्लक्ष करत असतात, त्यामुळे पाठीचे आणि पाठीच्या मणक्याचे दुखणे गंभीर वळणावर आल्यावर उपचार सुरू केल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.

मुंबई : रात्रंदिवस घर आणि नोकरीचा तोल सांभाळून राबणाºया महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्यात पाठदुखीचे प्रमाण वाढल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे. महिलांना होणाºया पाठदुखीकडे त्या कायम दुर्लक्ष करत असतात, त्यामुळे पाठीचे आणि पाठीच्या मणक्याचे दुखणे गंभीर वळणावर आल्यावर उपचार सुरू केल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.मुंबईतील एका सुप्रसिद्ध रुग्णालयातील आॅर्थोपेडिक डॉक्टरांनी हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार, सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळे महिला पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात दुखण्याकडे लक्ष न देता शस्त्रक्रियेची वेळ येईपर्यंत लांबवितात. तर पुरुष दुखणे कमी प्रमाणात सहन करतात, ९० टक्के पुरुष ५ वर्षांपेक्षा कमी काळ त्रास सहन करतात. महिलांच्या तुलनेत पुरुषांना पाठीची दुखणी उशिरा सुरू होतात. प्रसूती झाल्यावर किंवा गर्भारपणात सर्वात जास्त ताण हा पाठीवर येतो. पाठीच्या मणक्यात बहुतेक वेळेस चमक किंवा अचानकच पाठीत जोरात दुखू लागते. अतिरिक्त कामाचा ताण, प्रत्येक गोष्टीत धावपळ यामुळे दुखणे बळावते. सतत काम करत राहिल्यामुळे, वाकल्यामुळे किंवा जास्त वेळ बसल्यामुळे पाठीची हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे उठायचा, वाकायचा त्रास उद्भवतो. त्यामुळे प्राथमिक दुखणे असताना महिलांना उपचार घेणे जरुरीचे असल्याचे दिसून आले आहे.महिलांवर जबाबदाºयांचे जास्त ओझे असल्याने अनेकदा समतोल राखताना त्यांना आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. बºयाचदा महिला छोट्या-छोट्या आरोग्य तक्रारींकडे लक्ष देत नाहीत. मात्र याच तक्रारी भविष्यात मोठ्या आजारांना निमंत्रण देतात, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. पाठीच्या कण्याचा त्रास, डी जीवनसत्वाचा अभाव, कॅल्शियमचा अभाव, खाण्याच्या चुकीच्या सवयी, काळजी न घेणे आणि व्यायाम न करणे या सवयी घातक आहेत. म्हणून महिलांनी वेळीच उपचार करून घेणे अत्यावश्यक आहे.- डॉ. विशाल पेशट्टीवावरपाठदुखीची कारणेखुर्चीत बसताना शरीराचे वजन पाठीवर येते. कंबरेत वाकून बसण्याची सवय असल्यास किंवा खुर्ची योग्य नसल्यास पाठदुखी नक्की होते.दुचाकी चालवताना पाठीला कोणताही आधार नसतो. रोज लांबचा प्रवास करणाºया तसेच खड्डे असलेल्या रस्त्यांवरून गाडी हाकणाºयांना हमखास पाठदुखी सतावते.वाकून उभे राहण्याची सवय पाठदुखीला निमंत्रण देते.अयोग्यपणे जड वस्तू उचलल्याने, ढोपरात न वाकता वस्तू उचलल्यामुळे, पाठीवर भार आल्याने.अयोग्य गादीवर आखडलेल्या स्थितीत झोपल्याने पाठदुखी होते.उपायवस्तू उचलताना गुडघ्यात वाका, पाठ सरळ ठेवा व वस्तू शरीराजवळून उचला.एकाच स्थितीत बराच वेळ बसू नका. नियमित वेळाने बसण्याची स्थिती बदला, पाठ सरळ करा किंवा फिरून या.टेबलावर कोपर ९० अंशांमध्ये टेकतील, अशा प्रकारे खुर्चीची उंची ठेवा, गाडी चालवताना पाठीला आधार मिळेल याप्रकारे सीट ठेवा.झोपताना पाठीला आधार मिळेल अशा टणक पृष्ठभागावर झोपा.आखडलेल्या स्थितीत झोपू नका. कुशीवर झोपताना कंबरेलाआधार मिळेल, अशा पद्धतीने पातळ उशीचा उपयोग करा, पाठदुखी असेल तर उंच टाचांच्या चपला टाळा.सर्वेक्षणानुसार, सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळे महिला पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात दुखण्याकडे लक्ष न देता शस्त्रक्रियेची वेळ येईपर्यंत लांबवितात. तर पुरुष दुखणे कमी प्रमाणात सहन करतात, ९० टक्के पुरुष ५ वर्षांपेक्षा कमी काळ त्रास सहन करतात. महिलांच्या तुलनेत पुरुषांना पाठीची दुखणी उशिरा सुरू होतात.