शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ काळजी घ्या : सर्दी, खोकल्यासह पोटाच्या विकारांमध्ये वाढ

By admin | Updated: August 1, 2016 23:58 IST

जळगाव : पावसाळी वातावरणामुळे गारवा वाढण्यासह ठिकठिकाणी पाणी साचल्याने डास व माशांचीही संख्या वाढून विविध आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या सोबतच दूषित पाणी व उघड्यावरील अन्न खाल्याने पोटाचेही विकार वाढत आहे.

जळगाव : पावसाळी वातावरणामुळे गारवा वाढण्यासह ठिकठिकाणी पाणी साचल्याने डास व माशांचीही संख्या वाढून विविध आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या सोबतच दूषित पाणी व उघड्यावरील अन्न खाल्याने पोटाचेही विकार वाढत आहे.
पावसाळा सुरू झाला की, विविध आजारही वाढू लागतात. सध्या कधी जोरदार, तर कधी रिपरिप पडणार्‍या पावसामुळे शहरातील विविध भागांमधील दवाखाने फुल्ल असल्याचे दिसून येत आहे. काळजी न घेता पावसामध्ये भिजल्याने सर्दी, खोकला मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्दीमुळे थंडी, तापाचीही लागण होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यामध्ये लहान मुलांची संख्या प्रचंड आहे. यामुळे लहान मुलांच्या दवाखान्यासह सर्वच दवाखान्यात सर्दी, खोकला, थंडी-तापाचे रुग्ण वाढले आहे. सर्दीच्या रुग्णाच्या संपर्कात इतर कोणी आले तर त्यालाही सर्दीची लागण होत असल्याने रुग्णांची ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
डास व माशांमुळे इतरही आजार...
पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचल्याने तसेच जागोजागी पडलेला कचरा कुजल्यामुळे डास व माशांची संंख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे हे डास चावून मलेरिया सारखे आजार होत आहे. उघड्यावरील खाद्य पदार्थांवर माशा बसून ते अन्न खाण्यात आल्याने कॉलरी, पटकी या सारखे आजार वाढत आहे. त्यात गोड पदार्थांवर या माशा जास्त बसतात, ते खाल्याने अधिक त्रास वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

पोटाचे विकार वाढले...
दूषित पाणी पिण्यात आल्याने त्यामुळे पोटाचे विकार अधिक होत आहे. यामध्ये डायरिया, जुलाब तसेच कावीळचेही रुग्ण आढळून येत आहे. यासाठी पाणी उकळून पिण्याचे आवाहन केेले जात आहे.

दवाखाने फुल्ल....
रुग्ण वाढल्याने सध्या दवाखाने फुल्ल असल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या आजाराच्या रुग्णांची संख्या २० ते २५ टक्क्याने वाढली आहे.

अशी घ्या काळजी
-पावसात रेनकोट, छत्री वापरुन भिजणे टाळा
- गारवा वाढल्यास उबदार कपडे घाला
- उघडे व शिळे अन्न खाऊ नका
-भाजीपाला, फळे धूऊन घ्या
-पचनास हलके असणारेच पदार्थ खा.

----
वातावरण बदल्याने व पावसात भिजल्याने सर्दी, खोकला, थंडी-तापाचे रुग्ण वाढत आहे. सोबतच डास व माशांची संख्या वाढल्याने तसेच दूषित पाणी प्यायल्याने मलेरिया, डायरिया, जुलाब या सारखे आजारही वाढत आहे. यासाठी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
-डॉ. डी.आर. जयकर.