शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ काळजी घ्या : सर्दी, खोकल्यासह पोटाच्या विकारांमध्ये वाढ

By admin | Updated: August 1, 2016 23:58 IST

जळगाव : पावसाळी वातावरणामुळे गारवा वाढण्यासह ठिकठिकाणी पाणी साचल्याने डास व माशांचीही संख्या वाढून विविध आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या सोबतच दूषित पाणी व उघड्यावरील अन्न खाल्याने पोटाचेही विकार वाढत आहे.

जळगाव : पावसाळी वातावरणामुळे गारवा वाढण्यासह ठिकठिकाणी पाणी साचल्याने डास व माशांचीही संख्या वाढून विविध आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या सोबतच दूषित पाणी व उघड्यावरील अन्न खाल्याने पोटाचेही विकार वाढत आहे.
पावसाळा सुरू झाला की, विविध आजारही वाढू लागतात. सध्या कधी जोरदार, तर कधी रिपरिप पडणार्‍या पावसामुळे शहरातील विविध भागांमधील दवाखाने फुल्ल असल्याचे दिसून येत आहे. काळजी न घेता पावसामध्ये भिजल्याने सर्दी, खोकला मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्दीमुळे थंडी, तापाचीही लागण होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यामध्ये लहान मुलांची संख्या प्रचंड आहे. यामुळे लहान मुलांच्या दवाखान्यासह सर्वच दवाखान्यात सर्दी, खोकला, थंडी-तापाचे रुग्ण वाढले आहे. सर्दीच्या रुग्णाच्या संपर्कात इतर कोणी आले तर त्यालाही सर्दीची लागण होत असल्याने रुग्णांची ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
डास व माशांमुळे इतरही आजार...
पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचल्याने तसेच जागोजागी पडलेला कचरा कुजल्यामुळे डास व माशांची संंख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे हे डास चावून मलेरिया सारखे आजार होत आहे. उघड्यावरील खाद्य पदार्थांवर माशा बसून ते अन्न खाण्यात आल्याने कॉलरी, पटकी या सारखे आजार वाढत आहे. त्यात गोड पदार्थांवर या माशा जास्त बसतात, ते खाल्याने अधिक त्रास वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

पोटाचे विकार वाढले...
दूषित पाणी पिण्यात आल्याने त्यामुळे पोटाचे विकार अधिक होत आहे. यामध्ये डायरिया, जुलाब तसेच कावीळचेही रुग्ण आढळून येत आहे. यासाठी पाणी उकळून पिण्याचे आवाहन केेले जात आहे.

दवाखाने फुल्ल....
रुग्ण वाढल्याने सध्या दवाखाने फुल्ल असल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या आजाराच्या रुग्णांची संख्या २० ते २५ टक्क्याने वाढली आहे.

अशी घ्या काळजी
-पावसात रेनकोट, छत्री वापरुन भिजणे टाळा
- गारवा वाढल्यास उबदार कपडे घाला
- उघडे व शिळे अन्न खाऊ नका
-भाजीपाला, फळे धूऊन घ्या
-पचनास हलके असणारेच पदार्थ खा.

----
वातावरण बदल्याने व पावसात भिजल्याने सर्दी, खोकला, थंडी-तापाचे रुग्ण वाढत आहे. सोबतच डास व माशांची संख्या वाढल्याने तसेच दूषित पाणी प्यायल्याने मलेरिया, डायरिया, जुलाब या सारखे आजारही वाढत आहे. यासाठी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
-डॉ. डी.आर. जयकर.