शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ काळजी घ्या : सर्दी, खोकल्यासह पोटाच्या विकारांमध्ये वाढ

By admin | Updated: August 1, 2016 23:58 IST

जळगाव : पावसाळी वातावरणामुळे गारवा वाढण्यासह ठिकठिकाणी पाणी साचल्याने डास व माशांचीही संख्या वाढून विविध आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या सोबतच दूषित पाणी व उघड्यावरील अन्न खाल्याने पोटाचेही विकार वाढत आहे.

जळगाव : पावसाळी वातावरणामुळे गारवा वाढण्यासह ठिकठिकाणी पाणी साचल्याने डास व माशांचीही संख्या वाढून विविध आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या सोबतच दूषित पाणी व उघड्यावरील अन्न खाल्याने पोटाचेही विकार वाढत आहे.
पावसाळा सुरू झाला की, विविध आजारही वाढू लागतात. सध्या कधी जोरदार, तर कधी रिपरिप पडणार्‍या पावसामुळे शहरातील विविध भागांमधील दवाखाने फुल्ल असल्याचे दिसून येत आहे. काळजी न घेता पावसामध्ये भिजल्याने सर्दी, खोकला मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्दीमुळे थंडी, तापाचीही लागण होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यामध्ये लहान मुलांची संख्या प्रचंड आहे. यामुळे लहान मुलांच्या दवाखान्यासह सर्वच दवाखान्यात सर्दी, खोकला, थंडी-तापाचे रुग्ण वाढले आहे. सर्दीच्या रुग्णाच्या संपर्कात इतर कोणी आले तर त्यालाही सर्दीची लागण होत असल्याने रुग्णांची ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
डास व माशांमुळे इतरही आजार...
पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचल्याने तसेच जागोजागी पडलेला कचरा कुजल्यामुळे डास व माशांची संंख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे हे डास चावून मलेरिया सारखे आजार होत आहे. उघड्यावरील खाद्य पदार्थांवर माशा बसून ते अन्न खाण्यात आल्याने कॉलरी, पटकी या सारखे आजार वाढत आहे. त्यात गोड पदार्थांवर या माशा जास्त बसतात, ते खाल्याने अधिक त्रास वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

पोटाचे विकार वाढले...
दूषित पाणी पिण्यात आल्याने त्यामुळे पोटाचे विकार अधिक होत आहे. यामध्ये डायरिया, जुलाब तसेच कावीळचेही रुग्ण आढळून येत आहे. यासाठी पाणी उकळून पिण्याचे आवाहन केेले जात आहे.

दवाखाने फुल्ल....
रुग्ण वाढल्याने सध्या दवाखाने फुल्ल असल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या आजाराच्या रुग्णांची संख्या २० ते २५ टक्क्याने वाढली आहे.

अशी घ्या काळजी
-पावसात रेनकोट, छत्री वापरुन भिजणे टाळा
- गारवा वाढल्यास उबदार कपडे घाला
- उघडे व शिळे अन्न खाऊ नका
-भाजीपाला, फळे धूऊन घ्या
-पचनास हलके असणारेच पदार्थ खा.

----
वातावरण बदल्याने व पावसात भिजल्याने सर्दी, खोकला, थंडी-तापाचे रुग्ण वाढत आहे. सोबतच डास व माशांची संख्या वाढल्याने तसेच दूषित पाणी प्यायल्याने मलेरिया, डायरिया, जुलाब या सारखे आजारही वाढत आहे. यासाठी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
-डॉ. डी.आर. जयकर.