शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

राज्यात स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ, सर्वाधिक रुग्ण मुंबईत

By स्नेहा मोरे | Published: September 14, 2022 7:56 PM

राज्यातील ६० टक्के रूग्ण केवळ ५ जिल्ह्यांमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असून यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईत नोंदविले  जात आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये २,२७८ अशी नोंदविण्यात आलेल्या रुग्णात आता या वर्षी आतापर्यंत ३,३२२ एवढे रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. आता गणपती उत्सवानंतर स्वाईन फ्लूच्या रुग्णात वाढ होण्याची शक्यता आरोग्य अधिकाऱ्याने वर्तविली आहे.

यंदा १२ सप्टेंबरपर्यंत राज्यातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या साथीच्या आजारापूर्वी २०१९ मध्ये नोंदवलेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत ४४ टक्यांनी वाढली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये २,२७८ एच१एन१ रुग्ण होते. यंदा मात्र १२ सप्टेंबरपर्यंत ३,३२२ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत तर २०१९ यावर्षात याच कालावधीत २४६ मृत्यूंच्या तुलनेत मात्र यंदा १४७ मृत्यू अशी कमी नोंद झाली असल्याची दिलासादायी बाब आहे. दरम्यान यातील ६० टक्क्यांहून अधिक रुग्ण पाच जिल्ह्यांतील असून यात ८७० रुग्ण नोंदवून पुणे प्रथम क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या  क्रमांकावर मुंबई (३४५), ठाणे (३२७), नागपूर (१९८), नाशिक (१९७) आणि कोल्हापूर (१५५) असे रुग्ण नोंदविण्यात आले आहेत.

राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये  सर्वाधिक स्वाइन फ्लू नोंदवला जात असून स्वाइन फ्लूच्या अधिक चाचण्या करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आधीच्या  संसर्गापासून अस्तित्वात असलेली प्रतिकारशक्ती पूर्वीच्या स्ट्रेनच्या संपर्कात आल्याने तयार झालेल्या प्रतिपिंडांना जुमानत नसल्याचा अंदाज त्या अधिकाऱ्याने व्यक्त केला.

दरम्यान, यावर बोलताना राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्या मते सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर उच्च जोखमीच्या रुग्णांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणे टाळावीत. उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींनी सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहताना कोविडचे योग्य वर्तन पाळावे. इन्फ्लूएंझा सारख्या आजारांनी वेळीच वैद्यकीय सल्ला घेण्याचे सुचविले आहे.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य