शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 06:36 IST

महामुंबईत आढळले सर्वाधिक रुग्ण, सध्या दुसऱ्या, तिमाहीतील गरोदर मातांसोबत मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना, आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. 

मुंबई - गेल्या वर्षभरात राज्यात ‘इन्फ्लुएंझा-ए’चे रुग्ण वाढले असून, एकूण ५७ रुग्णांचा या आजराने मृत्यू झाला आहे. राज्यात २,३२५ रुग्ण आढळले असून, सर्वाधिक ७७९ रुग्ण मुंबईत असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. 

आरोग्य विभागाने  १ जानेवारी ते २१ नोव्हेंबर पर्यंतची ‘इन्फ्लुएंझा’ची आकडेवारी जाहीर केली. त्यामध्ये  महामुंबई परिसरात रुग्ण आढळून आले. आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग उपयोजना करत आहेत. अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या दुसऱ्या, तिमाहीतील गरोदर मातांसोबत मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना, आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. 

यांनी काळजी घ्यावी...या लक्षणांसोबतच तीव्र घसादुखीचा त्रास होत असेल, घशाला सूज आली असेल आणि ताप ९८ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर अशा अतिजोखमीच्या रुग्णांची  (गरोदर माता, उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीचे विकार, कर्करोग, दमा असे विकार असणाऱ्या व्यक्ती)  तपासणी आवश्यक आहे. 

इन्फ्लुएंझावर उपाय काय?नागरिकांनी आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे गरजेचे आहे.संतुलित आहार करणे गजरेचे असून, त्यासोबत व्यायाम करावा. आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. भरपूर पाणी प्यावे आणि वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा. या आजाराची लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

‘इन्फ्लुएंझा’ची लक्षणे काय आहेत ?

कोरोनाच्या आजराप्रमाणेच स्वाइन फ्लूची लक्षणे आहेत. यामध्ये सौम्य आणि गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून येतात. या आजारात ताप, खोकला, घसा दुखी, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या या लक्षणांचा समावेश आहे.

‘इन्फ्लुएंझा’चे जिल्हानिहाय रुग्ण 

  •     मुंबई     ७७९ 
  •     ठाणे     २५० 
  •     मीरा-भाईंदर     १३ 
  •     नवी मुंबई     ६ 
  •     ठाणे ग्रामीण     ५
  •     कल्याण     २
  •     रायगड     १

 

 

टॅग्स :Healthआरोग्य