शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

जीवनसत्त्व, खनिजांचं महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 01:25 IST

सध्या बाजारात सगळ्या जीवनसत्त्व आणि खनिजे यांच्या गोळ्या मिळतात.. उत्तम आहे ... पण त्या केव्हा आणि कुणी घ्याव्यात यांचे काही ठोकताळे आहेत...

- डॉ. कांचन खैराटकरनमस्कार. मला नेहमी रुग्ण प्रश्न विचारतात की, अहो ..जीवनसत्त्व .. खनिजे यांना आहारात किती महत्त्व आहे? ... माझे उत्तर नेहमीच ठरलेले असते, अहो जेवण तेल.. तिखट... मिठाशिवाय जसे अपूर्ण ना तसेच जीवनसत्त्व.. खनिजद्रव्याशिवाय अपूर्णच बरं का! आपण खाल्लेल्या आहाराचे उत्तम पचन यांच्यामुळे तर होतेच आणि शरीराचे पोषणही होते... चला यांच्याविषयी आज जाणून घेऊयात का !सध्या बाजारात सगळ्या जीवनसत्त्व आणि खनिजे यांच्या गोळ्या मिळतात.. उत्तम आहे ... पण त्या केव्हा आणि कुणी घ्याव्यात यांचे काही ठोकताळे आहेत... स्वस्थ राहण्यासाठी आहारात या जीवनसत्त्व आणि खनिजे यांचा समावेश करणे अत्यावश्यक आहे. दूध घेऊन जे समाधान मिळेल... लिंबू सरबताने जी तृप्ती मिळेल अथवा गाजराच्या हलव्याने ते तोंडाला पाणी सुटेल ते कोणत्याही गोळ्यांनी मिळेल का ?सर्वप्रथम हे मान्य करायला हवे की पावभाजीचा सुवास आजही सर्वांना खेचून घेतो... गरमागरम वाफाळलेली इडली पाहूनच तोंडाला पाणी सुटते... आणि आल्याचा चहा तर परमप्रियच! म्हणूनच पेल्यातून वाटीत फिरणारा... अगदी रस्त्यावरील चहाची चव सर्वांना आपलीशी वाटते... का बरे! कारण या भारतीय भावना आहेत... आपल्या भावना आहेत.. आणि त्यांचा विचार करून आपल्याकडे पारंपरिक आहाराची बांधणी झाली... मग तो शाकाहार असो अथवा मांसाहार... त्यातील प्रत्येक घटकाने शरीराचे आणि मनाचे पोषण व्हायला हवे...असे हे तृप्तीचे... आणि पोषणाचे कामही जीवनसत्त्व आणि खनिजे करतात बरं का! चला बघूयात आजचे पहिले जीवनसत्त्व.आज आपण अ जीवनसत्त्व जाणून घेऊ.. आज एका सेकंदात मोबाईलमध्ये याची माहिती मिळेल पण मग १० जणांत ९ जणांना चष्मा... ताण असह्य होणे... असे का व्हावे ? कारण कुठेतरी पोषण कमी पडते आहे.ढोबळमानाने दूध... हिरव्या पालेभाज्या... गाजर ... नारंगी किवा पिवळ्या रंगाच्या भाज्या यामध्ये अ जीवनसत्त्व मिळते... पूर्वी रानातील माळव म्हणजे भाजी हो! आणि रवाळ घट्ट दूध ... तरीही कसदार शरीर आणि पिळदार बांधा ... आणि चातकाची नजर होती...असो ... पण आता काही बदल करून बघूयात की! गाजरहलवा... गाजराचे लोणचे... पुलाव ... पुऱ्या... पराठे.... खीस... असे किती पदार्थ होतील ना ! जेवताना चार तुकडे गाजर खाणे किंवा एखादी संत्र्याची फोड म्हणजे चौरस आहार का? हा प्रश्न स्वत:ला विचारा म्हणजे खरेखुरे उत्तर मिळेल... रसरशीत, आवडीने आणि श्रद्धापूर्वक खाणे महत्त्वाचे आहे.खूप तणाव असतील... व्यायाम खूप केला असेल... विमानाचा प्रवास... दगदगीचा व्यवसाय असेल तर अ जीवनसत्त्व अत्यावश्यक आहे... यालाच कॅरोटीन म्हटले तरीही चालेल.. त्यामुळे दृष्टी उत्तम राहते... प्रजननसंस्था उत्तम राहते... कॅन्सरला प्रतिबंध होतो आणि चेहरा सतेज होतो... पारंपरिक आहार सर्वसमावेशक आहे... त्याचा सन्मान आणि स्वीकार नक्कीच आरोग्यदायी आहे(लेखिका आयुर्वेदतज्ज्ञ आहेत)

टॅग्स :vegetableभाज्याHealthआरोग्य