शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
2
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
3
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
4
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
5
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
6
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
7
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
8
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
9
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
10
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
11
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
12
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
13
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
14
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
15
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!
16
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
17
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
18
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
19
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
20
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

किडनीविकार रोखण्यासाठी असंघटीत कामगार क्षेत्रात बेल फॉर वॉटर उपक्रम राबविणे गरजेचे - अमित जैन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 16:07 IST

दगदग झाली असेल, अतिकामाचा ताण आला असेल असे वाटून या लक्षणांकडे हमखास दुर्लक्ष केले जाते. जा

ठाणे: कोरोना व्हायरसच्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर आज जागतिक किडनी दिवस साजरा होत असून आजही किडनीच्या आजारांविषयी सामान्यांना फारशी माहिती नसते. किडनीच्या आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्यातला दुसरा गुरुवार ‘जागतिक किडनी दिन’ म्हणून पाळला जातो. बहुतेक वेळा किडनीच्या आजारांची लक्षणे सुरुवातीला वेगळी ओळखू येत नाहीत. अशक्तपणा, थकवा, थोड्या कामानेही थकून जाणे, झोपेचे चक्र बिघडणे अशी लक्षणे दिसू शकतात.

दगदग झाली असेल, अतिकामाचा ताण आला असेल असे वाटून या लक्षणांकडे हमखास दुर्लक्ष केले जाते. जागतिक किडनी दिनानिमित्त मुंबईत किडनी - एक महत्वाचा अवयव"  या विषयावर डॉक्टरांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये डॉक्टर , नर्सेस तसेच डायलेसीस उपचार घेत असलेल्या रुग्णांनी सहभाग घेतला होता. याविषयी अधिक माहिती देताना 

किडनीविकारतज्ञ  डॉ अमित जैन  याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले, " आपल्या शरीरातील सर्वात दुर्लक्षित अवयव म्हणजे आपल्या दोन्ही किडन्या (मूत्रपिंडे) आहेत. सरासरी वयाच्या तिशीपर्यत अनेकांना आपल्या किडनीच्या कार्याविषयी माहिती नसते. उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, यकृताचा तीव्र आजार, मूत्रसंसर्ग, मूतखडा, संधिवात अशा आजारांच्या रुग्णांना किडनीचे आजार होण्याचा संभव अधिक असतो. त्यामुळे या रुग्णांनी त्यांच्या किडनीच्या कार्याबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे.

किडनी फेल्युअरच्या प्रमुख कारणांमध्ये ३५ टक्के वाटा हा मधुमेहाचा व १७ टक्के वाटा हा उच्च रक्तदाबाचा असून बैठी जीवनशैली याला कारणीभूत ठरत आहे. आज भारत मधुमेहाची राजधानी बनली असून गेल्या ३ ते ४ वर्षात किडनीच्या विकारांमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मूत्रपिंड हा आपल्या मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव असून साऱ्या शरीरातली दूषित द्रव्ये बाहेर काढायचे महत्त्वाचे काम निसर्गाने त्याच्याकडे सोपवलेले आहे.अनेक कारणांनी जेव्हा  कायमस्वरूपी किडन्या निकामी होतात त्यावेळी मात्र आपल्याला या दुर्लक्षित अवयवाचे महत्व कळू लागते परंतु गेल्या काही महिन्यामध्ये  भारतातील अनेक शाळांमध्ये पाणी पिण्यासाठी सुट्टी अथवा ब्रेकची नियमावली करण्यात आली असल्यामुळे लहानपणापासूनच किडनीचे आरोग्य संतुलित राहण्यास मदत होणार आहे. अशी नियमावली कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये तसेच असंघटीत कामगार क्षेत्रात करणे महत्वाचे आहे.

किडनीवरील ताण कमी करण्यासाठी व शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी प्रत्येकाने दिवसभरात ३ ते ४ लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. तुम्ही जितके अधिक पाणी पिता तितकी अधिक लघवी तुमच्या शरीरात निर्माण होते. सहाजिकच त्या लघवीसोबत शरीरातील विषद्रव्ये देखील बाहेर टाकली जातात. त्यामुळे तुमच्या किडनीवरचा भार कमी होतो व किडनी समस्या होण्याचा धोका देखील कमी होतो." 

बांधकाम तसेच छोट्या कारखान्यामध्ये व इतर असंघटीत क्षेत्रात काम करीत असलेले कामगार तसेच शेतामध्ये राबत असलेल्या विशेषतः महिलांसाठी ( ऊसतोडणी कामगार ) यांच्यासाठी  "बेल फॉर वॉटर" व"बेल फॉर युरीन"सारखे उपक्रम राबवून त्याना स्वच्छ शौचालये उपल्बध करून देणे महत्वाचे आहे, कारण या क्षेत्रातील अनेकांवर  कामाच्या व्यापामुळे व शौचालय उपल्बध नसल्यामुळे लघवी तुंबविण्याची वेळ येते व या कारणांमुळे मूत्रपिंडाला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता ४० ते ५० टक्क्यांनी वाढते. मूत्रपिंडाचा जंतूसंसर्ग (युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन) महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो आणि गरोदर स्त्रियांना या आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक असते, अशी माहिती अपेक्स हॉस्पिटल समूहाचे किडनीविकारतज्ञ  डॉ अमित जैन यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र