शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

आयुर्वेदिक काढा प्यायल्याने यकृतावर वाईट परिणाम होतो?; आयुष मंत्रालयाने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 15:22 IST

Ayurvedic Kadha : आयुर्वेदिक काढ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं म्हटलं जातं. मात्र सध्या आयुर्वेदिक काढ्याबाबत अनेकांच्या मनात नानाविध शंका निर्माण झाल्या आहेत. 

नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 67,57,132 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,04,555 लोकांना जीव गमवावा लागला आहे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी विविध घरगुती उपाय केले जात आहेत. प्रामुख्याने अनेक जण आयुर्वेदिक काढा घेत आहेत. काढ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं म्हटलं जातं. मात्र सध्या आयुर्वेदिक काढ्याबाबत अनेकांच्या मनात नानाविध शंका निर्माण झाल्या आहेत. 

आयुर्वेदिक काढा दीर्घकाळ घेतल्यानंतर यकृताला नुकसान होतं का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र आयुष मंत्रालयाने या दाव्याचं खंडन केलं आहे. आयुर्वेदिक काढा घेतल्याने यकृताला नुकसान पोहोचतं ही धारणा चुकीची असल्याचं आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे. कारण काढा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तू घरात जेवण बनवताना वापरल्या जातात असं आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे. दालचीन, तुळस आणि काळीमिरीचा उपयोग काढा बनवण्यासाठी केला जातो आणि त्याचा श्वसनयंत्रणेवर चांगला परिणाम होतो अशी माहिती आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी दिली आहे. 

काढा दिवसातून दोन वेळा घेणं आरोग्यासाठी उपयुक्त

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी काढ्याचे सेवन करण्याचा सल्ला आयुष मंत्रालयाने दिला आहे. मंत्रालयाने अन्य पदार्थांसोबत तुळस, दालचीन, काळीमिरी, सुंठ यांचा उपयोग करून काढा बनवण्याचा सल्ला दिला आहे. हा काढा दिवसातून दोन वेळा घेणं आरोग्यासाठी उपयुक्त आहे असं मंत्रालयाने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आयुष विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना सगळ्या प्रकारच्या रुग्णांना एलोपॅथी रुग्णालयात दाखल केलं जात आहे. एलोपॅथी डॉक्टर आयुष औषधं लोकांना देत आहेत. अजूनही सगळ्या रुग्णांपर्यंत ही औषध पोहोचलेली नाहीत. तज्ज्ञांनी सांगितले की, याचा लाभ सगळ्याच रुग्णांना मिळायला हवा. त्यासाठी नियमांमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे.

जाणून घ्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईन्स 

कमीत कमी 30 मिनिटांपर्यंत योगा किंवा ध्यान करणं आवश्यक आहे. 

जेवण बनवत असताना हळद,  जीरं, धणे यांचा जास्तीत जास्त वापर करा. 

डायबिटीस असलेल्या रुग्णांनी साखर नसलेल्या च्यवनप्राशचे सेवन करावे.

दिवसातून दोनवेळा हर्बल टी, तुळशी,  दालचीनी, कालीमीरी, सुकलेल्या आल्याच्या काढ्याचे सेवन करा. 

हळदीचे दूध प्या

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यAyurvedic Home Remediesघरगुती उपायIndiaभारत