शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

आयुर्वेदिक काढा प्यायल्याने यकृतावर वाईट परिणाम होतो?; आयुष मंत्रालयाने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 15:22 IST

Ayurvedic Kadha : आयुर्वेदिक काढ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं म्हटलं जातं. मात्र सध्या आयुर्वेदिक काढ्याबाबत अनेकांच्या मनात नानाविध शंका निर्माण झाल्या आहेत. 

नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 67,57,132 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,04,555 लोकांना जीव गमवावा लागला आहे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी विविध घरगुती उपाय केले जात आहेत. प्रामुख्याने अनेक जण आयुर्वेदिक काढा घेत आहेत. काढ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं म्हटलं जातं. मात्र सध्या आयुर्वेदिक काढ्याबाबत अनेकांच्या मनात नानाविध शंका निर्माण झाल्या आहेत. 

आयुर्वेदिक काढा दीर्घकाळ घेतल्यानंतर यकृताला नुकसान होतं का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र आयुष मंत्रालयाने या दाव्याचं खंडन केलं आहे. आयुर्वेदिक काढा घेतल्याने यकृताला नुकसान पोहोचतं ही धारणा चुकीची असल्याचं आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे. कारण काढा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तू घरात जेवण बनवताना वापरल्या जातात असं आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे. दालचीन, तुळस आणि काळीमिरीचा उपयोग काढा बनवण्यासाठी केला जातो आणि त्याचा श्वसनयंत्रणेवर चांगला परिणाम होतो अशी माहिती आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी दिली आहे. 

काढा दिवसातून दोन वेळा घेणं आरोग्यासाठी उपयुक्त

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी काढ्याचे सेवन करण्याचा सल्ला आयुष मंत्रालयाने दिला आहे. मंत्रालयाने अन्य पदार्थांसोबत तुळस, दालचीन, काळीमिरी, सुंठ यांचा उपयोग करून काढा बनवण्याचा सल्ला दिला आहे. हा काढा दिवसातून दोन वेळा घेणं आरोग्यासाठी उपयुक्त आहे असं मंत्रालयाने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आयुष विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना सगळ्या प्रकारच्या रुग्णांना एलोपॅथी रुग्णालयात दाखल केलं जात आहे. एलोपॅथी डॉक्टर आयुष औषधं लोकांना देत आहेत. अजूनही सगळ्या रुग्णांपर्यंत ही औषध पोहोचलेली नाहीत. तज्ज्ञांनी सांगितले की, याचा लाभ सगळ्याच रुग्णांना मिळायला हवा. त्यासाठी नियमांमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे.

जाणून घ्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईन्स 

कमीत कमी 30 मिनिटांपर्यंत योगा किंवा ध्यान करणं आवश्यक आहे. 

जेवण बनवत असताना हळद,  जीरं, धणे यांचा जास्तीत जास्त वापर करा. 

डायबिटीस असलेल्या रुग्णांनी साखर नसलेल्या च्यवनप्राशचे सेवन करावे.

दिवसातून दोनवेळा हर्बल टी, तुळशी,  दालचीनी, कालीमीरी, सुकलेल्या आल्याच्या काढ्याचे सेवन करा. 

हळदीचे दूध प्या

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यAyurvedic Home Remediesघरगुती उपायIndiaभारत