शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

शरीरात रक्ताची कमतरता जाणवू लागल्यास वेळीच व्हा सावध, जाणून घ्या लक्षणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 17:20 IST

काही कारणांमुळे जर रक्तातील हे लोह अथवा हिमोग्लोबिन कमी झाले तर त्या व्यक्तीला अ‍ॅनिमिया अथवा अशक्तपणा येण्याची शक्यता असते. यावर काय उपाय करता येतील हे जाणून घेऊया...

अ‍ॅनिमिया म्हणजे शरीरातील रक्त कमी होणं अथवा रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणं. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी संतुलित राहण्यासाठी शरीराला लोहाची गरज असते. रक्तातील लाल रक्तकणांमध्ये हिमोग्लोबिन असते. ज्यामुळे शरीराला रक्तावाटे ऑक्सिजनचा पूरवठा केला जातो. रक्तावाटे शरीराला ऑक्सिजनचा पूरवठा झाल्यामुळे सर्व शारीरिक क्रिया व्यसस्थित पार पाडल्या जातात. यासाठीच शरीरात पुरेसे हिमोग्लोबिन असणं गरजेचं आहे. मात्र काही कारणांमुळे जर रक्तातील हे लोह अथवा हिमोग्लोबिन कमी झाले तर त्या व्यक्तीला अ‍ॅनिमिया अथवा अशक्तपणा येण्याची शक्यता असते. यावर काय उपाय करता येतील हे जाणून घेऊया...

चक्कर येणेशरीरातील रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित असणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही जे अन्न खाता त्याचे रूपांतर रक्तात होते. शरीरात रक्त आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य प्रमाणात नसेल तर तुमच्या शरीराचे योग्य पोषण होत नाही. ज्याचा परिणाम तुमच्या शारीरिक हालचालींवर होतो. ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा येऊन चक्कर येते.

ह्रदयाची ठोके वाढणेशरीराला रक्ताचा पूरवठा कमी होतो. ह्रदयाला रक्तपूरवठा कमी झाल्यामुळे शारीरिक क्रियांवर त्याचा वाईट परिणाम होतो. ज्यामुळे ह्रदयाचे ठोके कमी होतात.

डोकेदुखीमेंदूला रक्ताचा पूरवठा कमी झाल्यास तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास जाणवत असतो. यासाठी जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर वेळीच ब्लड टेस्ट करा. 

हाडे, छाती, पोट आणि सांधेदुखी जाणवणेशरीरातील रक्ताचा पूरवठा कमी झाल्यामुळे याचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर जाणवू लागतो. ज्यामुळे तुमच्या छातीत, पोटात वेदना होतात. त्याचप्रमाणे सांधे आणि हाडे दुखू लागतात.

धाप लागतेह्रदयाला रक्तपूरवठा न झाल्यास ह्रदयाचे ठोके वाढतात आणि सतत धाप लागण्याचा त्रास जाणवू लागतो.

त्वचा पांढरट आणि पिवळसर दिसू लागतेशरीरातील हिमोग्लोबिन आणि रक्तकणांच्या लाल रंगामुळे आपल्या त्वचेला रंग प्राप्त होत असतो. मात्र शरीरातील रक्त आणि हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे तुमची त्वचा पांढरट दिसू लागते.

हात पाय थंड पडणेजर तुमच्या शरीरातील रक्ताचे कार्य बिघडले तर त्याचा परिणाम तुमच्या इतर शारीरिक क्रियांवर होतो. शरीराला रक्ताचा पूरवठा कमी झाल्यामुळे हात पाय थंड पडतात.

थकवा आणि अशक्तपणारक्तात तुम्ही  खाल्लेल्या अन्नातील पोषक घटक असतात. जेव्हा तुमच्या शरीरातील रक्त कमी होते तेव्हा ते पोषक घटक न मिळाल्यामुळे तुम्हाला अशक्तपणा  येतो.

या आजारावरील उपायपालकचा आहारात समावेश कराआहारात पालक, इतर हिरव्या आणि पालेभाज्यांचे प्रमाण वाढवल्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. पालकमध्ये भरपूर प्रमाणात आयरन असते. तुम्ही पालकाची भाजी किंवा साग खाऊ शकता.

काळ्या मनुका आणि खजूरया दोन्ही सुकामेव्यांमध्ये लोह आणि व्हिटॅमिन सीचे उत्तम कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे दररोज एक खजूर आणि चार-पाच मनुका खाणे शरीरासाठी फायद्याचे ठरेल. तुम्ही सकाळी उठल्यावर अथवा जेवणाच्या मधल्यावेळेत हा सुकामेवा खाऊ शकता.

टॉमेटोचा आहारात समावेश कराशरीरातील रक्ताची कमी भरुन काढण्यासाठी टॉमेटोचा भरपूर फायदा होतो. टॉमेटो तुम्ही दरररोज खाल्ला पाहिजे. तुम्ही सॅलड म्हणून सुप करून किंवा भाजी बनवून टॉमेटो खाऊ शकता.

बीटाचे सेवनरोज बीट खाणे शरीरातील रक्ताचा स्तर वाढवण्यासाठी फायद्याचे ठरु शकते. बीट आणि डाळिंबाचा ज्युस एकत्र करून पिण्याचेही बरेच फायदे आहेत. दोघांचाही ज्युस बनवून प्यायल्याने शरीरात रक्ताची मात्रा वाढवता येते.

(टिप - वरील माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून कोणताही दावा केलेला नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स