शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

शरीरात रक्ताची कमतरता जाणवू लागल्यास वेळीच व्हा सावध, जाणून घ्या लक्षणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 17:20 IST

काही कारणांमुळे जर रक्तातील हे लोह अथवा हिमोग्लोबिन कमी झाले तर त्या व्यक्तीला अ‍ॅनिमिया अथवा अशक्तपणा येण्याची शक्यता असते. यावर काय उपाय करता येतील हे जाणून घेऊया...

अ‍ॅनिमिया म्हणजे शरीरातील रक्त कमी होणं अथवा रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणं. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी संतुलित राहण्यासाठी शरीराला लोहाची गरज असते. रक्तातील लाल रक्तकणांमध्ये हिमोग्लोबिन असते. ज्यामुळे शरीराला रक्तावाटे ऑक्सिजनचा पूरवठा केला जातो. रक्तावाटे शरीराला ऑक्सिजनचा पूरवठा झाल्यामुळे सर्व शारीरिक क्रिया व्यसस्थित पार पाडल्या जातात. यासाठीच शरीरात पुरेसे हिमोग्लोबिन असणं गरजेचं आहे. मात्र काही कारणांमुळे जर रक्तातील हे लोह अथवा हिमोग्लोबिन कमी झाले तर त्या व्यक्तीला अ‍ॅनिमिया अथवा अशक्तपणा येण्याची शक्यता असते. यावर काय उपाय करता येतील हे जाणून घेऊया...

चक्कर येणेशरीरातील रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित असणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही जे अन्न खाता त्याचे रूपांतर रक्तात होते. शरीरात रक्त आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य प्रमाणात नसेल तर तुमच्या शरीराचे योग्य पोषण होत नाही. ज्याचा परिणाम तुमच्या शारीरिक हालचालींवर होतो. ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा येऊन चक्कर येते.

ह्रदयाची ठोके वाढणेशरीराला रक्ताचा पूरवठा कमी होतो. ह्रदयाला रक्तपूरवठा कमी झाल्यामुळे शारीरिक क्रियांवर त्याचा वाईट परिणाम होतो. ज्यामुळे ह्रदयाचे ठोके कमी होतात.

डोकेदुखीमेंदूला रक्ताचा पूरवठा कमी झाल्यास तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास जाणवत असतो. यासाठी जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर वेळीच ब्लड टेस्ट करा. 

हाडे, छाती, पोट आणि सांधेदुखी जाणवणेशरीरातील रक्ताचा पूरवठा कमी झाल्यामुळे याचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर जाणवू लागतो. ज्यामुळे तुमच्या छातीत, पोटात वेदना होतात. त्याचप्रमाणे सांधे आणि हाडे दुखू लागतात.

धाप लागतेह्रदयाला रक्तपूरवठा न झाल्यास ह्रदयाचे ठोके वाढतात आणि सतत धाप लागण्याचा त्रास जाणवू लागतो.

त्वचा पांढरट आणि पिवळसर दिसू लागतेशरीरातील हिमोग्लोबिन आणि रक्तकणांच्या लाल रंगामुळे आपल्या त्वचेला रंग प्राप्त होत असतो. मात्र शरीरातील रक्त आणि हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे तुमची त्वचा पांढरट दिसू लागते.

हात पाय थंड पडणेजर तुमच्या शरीरातील रक्ताचे कार्य बिघडले तर त्याचा परिणाम तुमच्या इतर शारीरिक क्रियांवर होतो. शरीराला रक्ताचा पूरवठा कमी झाल्यामुळे हात पाय थंड पडतात.

थकवा आणि अशक्तपणारक्तात तुम्ही  खाल्लेल्या अन्नातील पोषक घटक असतात. जेव्हा तुमच्या शरीरातील रक्त कमी होते तेव्हा ते पोषक घटक न मिळाल्यामुळे तुम्हाला अशक्तपणा  येतो.

या आजारावरील उपायपालकचा आहारात समावेश कराआहारात पालक, इतर हिरव्या आणि पालेभाज्यांचे प्रमाण वाढवल्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. पालकमध्ये भरपूर प्रमाणात आयरन असते. तुम्ही पालकाची भाजी किंवा साग खाऊ शकता.

काळ्या मनुका आणि खजूरया दोन्ही सुकामेव्यांमध्ये लोह आणि व्हिटॅमिन सीचे उत्तम कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे दररोज एक खजूर आणि चार-पाच मनुका खाणे शरीरासाठी फायद्याचे ठरेल. तुम्ही सकाळी उठल्यावर अथवा जेवणाच्या मधल्यावेळेत हा सुकामेवा खाऊ शकता.

टॉमेटोचा आहारात समावेश कराशरीरातील रक्ताची कमी भरुन काढण्यासाठी टॉमेटोचा भरपूर फायदा होतो. टॉमेटो तुम्ही दरररोज खाल्ला पाहिजे. तुम्ही सॅलड म्हणून सुप करून किंवा भाजी बनवून टॉमेटो खाऊ शकता.

बीटाचे सेवनरोज बीट खाणे शरीरातील रक्ताचा स्तर वाढवण्यासाठी फायद्याचे ठरु शकते. बीट आणि डाळिंबाचा ज्युस एकत्र करून पिण्याचेही बरेच फायदे आहेत. दोघांचाही ज्युस बनवून प्यायल्याने शरीरात रक्ताची मात्रा वाढवता येते.

(टिप - वरील माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून कोणताही दावा केलेला नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स