शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

सोबत कुणी असेल तर जास्त जेवण करतात लोक, हे आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 13:12 IST

मॉडर्न रिसर्चनुसार एकत्र बसून जेवल्यास जास्त जेवण धकतं. इतकेच नाहीतर एकत्र जेवायला बसल्यास आपण असेही पदार्थ खातो जे कधी खाल्ले नाहीत. 

(Image Credit: www.medimanage.com)

घरातील वयोवृद्ध लोक हे नेहमी सांगतात की, जेवण नेहमी सर्वांनी एकत्र केलं पाहिजे. एकट्याने जेवण करणं चांगलं मानलं जात नाही. त्यामुळे कुणीही जेवायला बसलं असेल आणि अशात कुणी आलं तर त्यालाही जेवायला बोलवण्याची एक अलिखीत प्रथा आहे. जुने लोक सांगतात की, एकत्र बसून जेवणं चांगलं असतं. तर मॉडर्न रिसर्चनुसार एकत्र बसून जेवल्यास जास्त जेवण केलं जातं. इतकेच नाहीतर एकत्र जेवायला बसल्यास आपण असेही पदार्थ खातो जे कधी खाल्ले नाहीत. 

तशी घरातील सर्वांनी एकत्र बसून जेवण्याची प्रथा वर्षांनुवर्षे सुरु आहे. जेव्हा मनुष्य शिकार करुन पोट भरत होते तेव्हाही ते एकत्र जेवण करत होते. एका रिसर्चमध्ये तर हेही सांगण्यात आले आहे की, एकटे जेवल्याने माणसाला डिप्रेशन आणि तणावाचा सामना करावा लागतो.

मासनिक आरोग्याचे तज्ञ जॉन दी कास्त्रो यांनी 1994 मध्ये 500 लोकांवर एक रिसर्च केला होता. यात एकत्र जेवणारे आणि एकटे जेवणारे काही लोक होते. यांचा अभ्यास करुन असा निष्कर्ष काढण्यात आला की, ग्रुपमध्ये जेवण करणारे लोक जास्त जेवण करतात. 

आणखी एका रिसर्चच्या निष्कर्षातून असे समोर आले आहे की, ग्रुपमध्ये जेवण करणारे लोक हे 40 टक्के जास्त आइस्क्रीम किंवा इतर पदार्थ खातात. तेच जेव्हा लोक एकटे जेवण करतात तेव्हा अशा गोष्टींना ते हातही लावत नाहीत. 

काय आहे कारण? 

कास्त्रो यांच्यानुसार जेव्हा लोक एकत्र जेवण करतात तेव्हा त्यांच्यात जेवता जेवता गप्पाही होतात. आणि अनेकदा बोलता बोलता हातही थांबतो. यामुळे जेवणाचा वेळ वाढतो. मोठ्या समूहात जेवण करणारे लोक अधिक जास्त बोलतात आणि त्यामुळे त्यांचं जेवणाकडे लक्ष नसतं. आपल्याला केवळ पोट भरायचं आहे हे त्यांच्या लक्षता येत नाही. तेच जर लोक कमी लोकांमध्ये जेवण करत असतील किंवा एकटे जेवण करत असतील तर जास्त लवकर जेवण संपवतात. त्यामुळे ते जास्त खात नाहीत.  

काही रिसर्चचा वेगळा अभ्यास

दुसरीकडे काही रिसर्च असं सांगतात की, लोक एकत्र जेवायला बसले की जास्त खात नाहीत. एका रिसर्चमध्ये असे सांगण्यात आले आहे की, जेव्हा आपण एकटे जेवण करतो किंवा अशा एखाद्या व्यक्तीसोबत करतो ज्याच्या सवयी आपल्याला माहीत आहेत. त्यावेळी आपण बिनधास्त होऊन खातो. पण जेव्हा आपण ग्रुपमध्ये जेवतो तेव्हा त्यांच्या सवयी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे सगळेच संकोच करतात. कुठे ना कुठे डोक्यात हे सुरु असतं की, आपल्या जेवण्याच्या सवयीमुळे समोरचा व्यक्ती काय विचार करेल. 

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य