शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

सोबत कुणी असेल तर जास्त जेवण करतात लोक, हे आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 13:12 IST

मॉडर्न रिसर्चनुसार एकत्र बसून जेवल्यास जास्त जेवण धकतं. इतकेच नाहीतर एकत्र जेवायला बसल्यास आपण असेही पदार्थ खातो जे कधी खाल्ले नाहीत. 

(Image Credit: www.medimanage.com)

घरातील वयोवृद्ध लोक हे नेहमी सांगतात की, जेवण नेहमी सर्वांनी एकत्र केलं पाहिजे. एकट्याने जेवण करणं चांगलं मानलं जात नाही. त्यामुळे कुणीही जेवायला बसलं असेल आणि अशात कुणी आलं तर त्यालाही जेवायला बोलवण्याची एक अलिखीत प्रथा आहे. जुने लोक सांगतात की, एकत्र बसून जेवणं चांगलं असतं. तर मॉडर्न रिसर्चनुसार एकत्र बसून जेवल्यास जास्त जेवण केलं जातं. इतकेच नाहीतर एकत्र जेवायला बसल्यास आपण असेही पदार्थ खातो जे कधी खाल्ले नाहीत. 

तशी घरातील सर्वांनी एकत्र बसून जेवण्याची प्रथा वर्षांनुवर्षे सुरु आहे. जेव्हा मनुष्य शिकार करुन पोट भरत होते तेव्हाही ते एकत्र जेवण करत होते. एका रिसर्चमध्ये तर हेही सांगण्यात आले आहे की, एकटे जेवल्याने माणसाला डिप्रेशन आणि तणावाचा सामना करावा लागतो.

मासनिक आरोग्याचे तज्ञ जॉन दी कास्त्रो यांनी 1994 मध्ये 500 लोकांवर एक रिसर्च केला होता. यात एकत्र जेवणारे आणि एकटे जेवणारे काही लोक होते. यांचा अभ्यास करुन असा निष्कर्ष काढण्यात आला की, ग्रुपमध्ये जेवण करणारे लोक जास्त जेवण करतात. 

आणखी एका रिसर्चच्या निष्कर्षातून असे समोर आले आहे की, ग्रुपमध्ये जेवण करणारे लोक हे 40 टक्के जास्त आइस्क्रीम किंवा इतर पदार्थ खातात. तेच जेव्हा लोक एकटे जेवण करतात तेव्हा अशा गोष्टींना ते हातही लावत नाहीत. 

काय आहे कारण? 

कास्त्रो यांच्यानुसार जेव्हा लोक एकत्र जेवण करतात तेव्हा त्यांच्यात जेवता जेवता गप्पाही होतात. आणि अनेकदा बोलता बोलता हातही थांबतो. यामुळे जेवणाचा वेळ वाढतो. मोठ्या समूहात जेवण करणारे लोक अधिक जास्त बोलतात आणि त्यामुळे त्यांचं जेवणाकडे लक्ष नसतं. आपल्याला केवळ पोट भरायचं आहे हे त्यांच्या लक्षता येत नाही. तेच जर लोक कमी लोकांमध्ये जेवण करत असतील किंवा एकटे जेवण करत असतील तर जास्त लवकर जेवण संपवतात. त्यामुळे ते जास्त खात नाहीत.  

काही रिसर्चचा वेगळा अभ्यास

दुसरीकडे काही रिसर्च असं सांगतात की, लोक एकत्र जेवायला बसले की जास्त खात नाहीत. एका रिसर्चमध्ये असे सांगण्यात आले आहे की, जेव्हा आपण एकटे जेवण करतो किंवा अशा एखाद्या व्यक्तीसोबत करतो ज्याच्या सवयी आपल्याला माहीत आहेत. त्यावेळी आपण बिनधास्त होऊन खातो. पण जेव्हा आपण ग्रुपमध्ये जेवतो तेव्हा त्यांच्या सवयी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे सगळेच संकोच करतात. कुठे ना कुठे डोक्यात हे सुरु असतं की, आपल्या जेवण्याच्या सवयीमुळे समोरचा व्यक्ती काय विचार करेल. 

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य