शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

2024 मध्ये भारताला मिळू शकते टीबीची प्रभावी लस; ICMR करतंय 2 चाचण्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 11:50 IST

Tuberculosis : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून (ICMR) देशात टीबीच्या दोन लसींची चाचणीही सुरू आहे. ही चाचणी 6 राज्यांमध्ये केली जात आहे.

नवी दिल्ली : प्राणघातक क्षयरोग किंवा टीबीवरील (Tuberculosis) सध्याचा उपचार अद्याप लांब आहे. अशा परिस्थितीत आता भारतातील शास्त्रज्ञांनी टीबीवर प्रभावी लस विकसित करण्याचा दावा केला आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून (ICMR) देशात टीबीच्या दोन लसींची चाचणीही सुरू आहे. ही चाचणी 6 राज्यांमध्ये केली जात आहे. दरम्यान, जर सर्व काही ठीक झाले तर 2024 पर्यंत भारताला टीबीची प्रभावी लस मिळू शकेल, असे मानले जात आहे. 

एएनआय वृत्तसंस्थेनुसार, पुणे येथील नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट (NARI) येथील शास्त्रज्ञ ई डॉ सुचित कांबळे म्हणाले की, "आम्हाला पूर्ण विश्वास आहे की भारताला चांगली लस मिळेल आणि त्यानंतर भारतात टीबीचा प्रसार रोखण्यात मदत मिळू शकेल"

याचबरोबर, आयसीएमआर देशातील 6 राज्यांमध्ये 18 ठिकाणी फेज 3 डबल ब्‍लाइंड प्‍लासीबो कंट्रोल ट्रायल घेत आहे. महाराष्ट्रातही ते 2 ठिकाणी केले जात आहे. ज्या सहा राज्यांमध्ये या चाचण्या घेतल्या जात आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे, असे अशी माहिती देण्यात आली आहे. 

आयसीएमआर ज्या दोन टीबी लसींची चाचणी घेत आहे, ते व्हीपीएम 1002 आणि इम्यूवॅक आहेत. डॉ. कांबळे म्हणाले की, आमच्या साइटवर शेवटची नोंदणी 2024 मध्ये होईल. आम्ही सर्व गोष्टी पूर्ण केल्यानंतर आम्ही रुग्णांची आकडेवारी जाहीर करू. त्यानंतर विश्लेषण केले जाईल आणि त्याचा अंतिम निकाल मिळेल. या चाचणीत 6 वर्षांवरील लोकांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य