शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

ती पुन्हा सावरली त्याची गोष्ट..! स्ट्रेस रिस्पॉन्स सिण्ड्रोमची लक्षणं कशी ओळखायची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 06:01 IST

आयुष्यात आकस्मिक आघात होत असतात. अशा परिस्थितीत न डगमगता समोर उभे ठाकलेले आव्हान स्वीकारावे लागते; पण त्यातून सावरण्याची शक्ती आपल्यात निर्माण होऊ शकते, याची खात्री असायला हवी.

डॉ. विद्याधर बापट मानसोपचार तज्ज्ञ

आदित्यचा तरुण वयात अपघाती मृत्यू झाला. त्याच्या अचानक जाण्याने पदरी दोन मुले असलेल्या श्वेतावर आकाश कोसळले. तिच्या आणि आदित्यच्या मित्र-मैत्रिणींनी, नातेवाइकांनी तिला भरपूर आधार दिला. आदित्यच्या ऑफिसने नियमाप्रमाणे श्वेताला नोकरीही दिली; मात्र श्वेता खचून गेली होती.  श्वेताला महिनाभरात आदित्यच्या ऑफिसमध्ये रुजू व्हायचे होते. धीर एकवटून ती दु:खातून सावरू पाहत होती. तिने आदित्यच्या ऑफिसमध्ये जाण्यास सुरुवात केली. मात्र, मुख्य अडचण तर पुढेच होती. तिला ऑफिसच्या नवीन वातावरणाशी जुळवून घेता येईना. ऑफिसची इमारत दिसली तरी श्वेता अस्वस्थ व्हायला लागली. दिवसभर ती कशीबशी ऑफिसमध्ये थांबायची. काम शिकण्याचा मनापासून प्रयत्न करायची. साहेबांनी बोलावले तरी तिला दडपण यायचे. कामात लक्ष लागायचे नाही. 

सुरुवातीला नवीन असल्याने होत असेल असे म्हणून तिला सगळ्यांनी समजावले. कसेबसे दोन महिने गेले आणि श्वेताला शारीरिक-मानसिक अस्वस्थता विलक्षण वाढल्याचे लक्षात आले. ऑफिसला गेले की मळमळायला लागणे, डोकेदुखी वाढणे, हातपाय थरथर कापणे, असे त्रास होऊ लागले. सर्व शारीरिक तपासण्या केल्या; मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. आदित्यच्या अकाली जाण्याने नैराश्याबरोबरच ॲडजेस्टमेंट डिसऑर्डर किंवा स्ट्रेस रिस्पॉन्स सिण्ड्रोमची ही लक्षणे होती.  ॲडजेस्टमेंट डिसऑर्डरची लक्षणे घटना घडून गेल्यानंतर किंवा विपरित स्थिती निर्माण झाल्यावर साधारणत: तीन-चार महिन्यांत दिसू लागतात. ही लक्षणे आठ-दहा महिन्यांपर्यंत टिकतात. परिस्थिती बदलली किंवा उपचारांमुळे लक्षणे हळूहळू नाहीशी होतात. 

लक्षणे काय ? 

अस्वस्थता, चिडचिडेपणा, निराश वाटणं, असाहाय्य वाटणे, मधूनच रडू येणे, सतत पूर्वीची त्रास नसतानाची स्थिती आठवत राहणे, लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणं, ऑफिस/शाळा/कॉलेजला जाणे टाळणे, छातीत धडधडणे, घाम येणे, हात थरथरणे, अपचन तसेच डोकं दुखणे. 

उपचार काय?

डायलेक्टिकल बिहेव्हियर थेरपी : ही थेरपी, कॉग्निटिव्ह बिहेव्हरल थेरपी (सीबीटी) या दोन्ही पद्धतींमध्ये तुमचे विचार, भावना आणि वर्तन व त्यांचा एकमेकांवर होणारा परिणाम तपासला जातो. 

विशेषतः, चुकीची विचार करण्याची पद्धत ही अंतिमतः वागणुकीवर, तिच्या विपरीत परिणामांवर आणि मन:स्वास्थ्यावर कशी परिणाम करते, हे लक्षात आणून दिले जाते. वेगवेगळ्या युक्त्या वापरून विचार, भावना आणि वर्तन सुधारण्याची कौशल्ये शिकवली जातात.  विपरीत किंवा बदललेल्या परिस्थितीचा स्वीकार करायला शिकवले जाते. घडलेल्या घटनेचा विनाअट स्वीकार करायला शिकवले जाते. मग मन:स्वास्थ्य सुधारायला लागते. आज श्वेता नोकरीत छान स्थिरावली आहे. तिने दु:ख स्वीकारायची, त्याच्याकडे साक्षीभावाने पाहायची आणि नव्याने आव्हान पेलण्याची शक्ती स्वत:मध्ये निर्माण केली आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स