शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

हीमोग्लोबिन वाढवण्यासाठी नियमित खा हे सुपरफूड, कधीच जाणवणार नाही रक्ताची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 14:04 IST

Foods For Anemia: जर शरीरात रक्त कमी झालं तर आपल्याला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. जसे की, चक्कर येणे, शरीरात सुस्ती आणि पुन्हा पुन्हा थकवा जाणवणे.

Foods For Anemia: आजकाल चांगला आहार न घेतल्याने शरीरात रक्ताची कमतरता जाणवते आणि ही समस्या महिलांमध्ये जास्त बघायला मिळते. कारण  दर महिन्यात महिलांना मासिक पाळीचा सामना करावा लागतो. मनुष्याच्या शरीरात रक्ताचं काम तसंच असतं, जसं गाडीत पेट्रोल टाकल्यावर गाडी चालते. पेट्रोल संपलं की, गाडी थांबते. त्याचप्रमाणे शरीरात रक्तप्रवाह सुरू राहणं फार महत्वाचं आहे. जर शरीरात रक्त कमी झालं तर आपल्याला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. जसे की, चक्कर येणे, शरीरात सुस्ती आणि पुन्हा पुन्हा थकवा जाणवणे. चला जाणून घेऊन शरीरात रक्त कमी झाल्यावर काय संकेत मिळतात आणि ही समस्या कशी दूर करावी.

खजूरचं सेवन करा

रक्ताची कमतरता झाल्यावर शरीरात कमजोरी येऊ लागते आणि याचं खरं कारण शरीरात आयर्नची कमतरता आहे. ज्यामुळे चक्कर येते, डोकं चक्रावतं, हात-पाय थरथरतात. अशात तुम्ही खजूराचं सेवन केलं पाहिजे. 1 महिना रोज काही प्रमाणात खजूराचं सेवन केलं तर तुमची ही समस्या दूर होईल. तुमची शरीराची ताकद वाढेल. कारण यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात.

मनुक्याचं सेवन

मनुक्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. यात आयर्न भरपूर प्रमाणात असतात. हे अनेकदा ज्यूससोबत, सकाळी ओट्ससोबत किंवा रात्री भिजवून ठेवून सकाळी रिकाम्यापोटी याचं सेवन करता येतं. मनुक्यात साधारण 3.3 ग्रॅम फायबर असतं. ज्याच्या सेवनामुळे आतड्यांची समस्या दूर होते.

तिळाचं सेवन करा

तिळ शरीरासाठी फार फायदेशीर असतात. त्यामुळेच फार पूर्वीपासून लोक उत्सवात तिळ आणि गूळाचं सेवन करतात. यातील भरपूरपर प्रमाणात आयर्न, फ्लेवोनाइड, कॉपर आणि इतर पोषक तत्व असतात. ज्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य