शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

उन्हाळ्यात एखाद्या निरोगी व्यक्तीने किती पाणी प्यावे? जाणून घ्या योग्य पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 12:37 IST

वातावरणातील गरमी वाढल्याने पाणी अधिक पिणं गरजेचं असतं. चला जाणून घेऊ एका व्यक्तीने किती पाणी पिणं गरजेचं असतं. 

फेब्रुवारी महिना संपताच वातावरणात उष्णता जास्त जाणवू लागते. उन्हही वाढतं आणि वाराही गरम लागतो. या वातावरणात आरोग्याची योग्य काळजी घ्यावी लागते. असं केलं नाही तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. उन्हाळ्यात सगळ्यात महत्वाचं काम असतं शरीर हायड्रेट ठेवणं. वातावरणातील गरमी वाढल्याने पाणी अधिक पिणं गरजेचं असतं. चला जाणून घेऊ एका व्यक्तीने किती पाणी पिणं गरजेचं असतं. 

लाइफ लाइन आहे पाणी

चांगला आहार आणि स्वच्छ हवेसोबतच शरीरासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. शुद्ध, स्वच्छ पाणी हे शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया योग्यपणे चालण्यासाठी गरजेचं असतं. पाण्याने केवळ आपली तहानच भागते असं नाही तर हे संपूर्ण शरीरासाठी महत्त्वाचं असतं. अशात हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे की, आपल्याला कधी आणि किती पाणी प्यायला हवे. 

झोपेतून उठल्यावर

सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पिणे चांगल्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. झोपेतून उठल्यावर एक ग्लास साधं पाणी किंवा कोमट पाणी प्यायल्याने आतड्यांना फायदा होतो. याने शरीराच विषारी तत्व बाहेर पडण्यास मदत मिळते. तसेच रात्रभर पाण्याचं कमी झालेलं प्रमाणही याने नियंत्रित होतं. 

जेवणाआधी किती?

जेवण करण्याआधी पाणी प्यायल्याने तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल. याचा अर्थ तुम्हाला जेवण कमी करण्याची शक्यता राहणार नाही. जेव्हा तुम्ही हायड्रेट असता तेव्हा पोटही जेवणासाठी तयार झालेलं असतं. पाणी चवीच्या पेशींना जागं करतो आणि पोटालाही मॉइश्चराइज करतो. एक ग्लास पाणी प्यायल्याने जेवताना तुम्हाला फार पाणी पिण्याची गरज पडणार नाही. 

वर्कआउट करण्याआधी

तापमान आणि तुमच्या शरीरातील द्रव्य स्तराच्या आधारावर तुम्हाला वर्कआउट दरम्यान आणि नंतर डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी एक ग्लास पाणी पिण्याची गरज असते. याने तुमचा स्ट्रोकच्या समस्येपासूनही बचाव होऊ शकतो. 

वर्कआउटनंतर

वर्कआउटनंतर तुम्हाला घाम आणि लघवीच्या माध्यमातून खर्ची केलेल्या तरल पदार्थांची गरज असते. त्यासाठी तुम्हाला पाणी पिणे गरजेचं असतं. तुम्ही कोणत्याही वातावरणात व्यायाम करा, पण पाणी आवर्जून प्यावं.

बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यावर

जर तुम्ही आजारी लोकांच्या संपर्कात असाल तर वायरस आणि बॅक्टेरिया दूर ठेवण्यासाठी तुम्हाला सामान्यापेक्षा थोडं जास्त पाणी प्यावं लागेल. याने शरीर बॅक्टेरिया मुक्त होईल. याने तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल. 

आजारी असताना

जेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताप असतो, कफ किंवा सर्दीची समस्या असते तेव्हा शरीरात पाणी कमी होतं. याने तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. अनेक तज्ज्ञ सांगतात की, अशा स्थितीत जर भरपूर पाणी सेवन केलं तर आजार लवकर दूर पळतो. 

थकवा येतो तेव्हा

थकवा हा डिहायड्रेशनच्या लक्षणांपैकी एक असल्याचं तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते तेव्हा थकवा जाणवतो. तुम्हाला ऑफिसमध्ये काम करताना थकवा जाणवत असेल तर एक ग्लास पाणी घ्या, तुमचा थकवा दूर होईल.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य