शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

मनात किती कचरा साठून आहे?...आणि का? त्याने मला साधा चहाही विचारला नव्हता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 08:27 IST

हे प्रसंग कधीच संपून गेलेत, ती परिस्थितीही कधीच बदलली आहे.

‘मी त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा त्याने मला साधा चहाही विचारला नव्हता. ’ – ही तीन वर्षांपूर्वीची गोष्ट!‘मला अमुक ठिकाणी जायचं होतं, बाबांना सांगितलं, समजावून सांगितलं पण त्यांनी मला त्यासाठी पैसे दिले नाहीत.’ – ही अडतीस वर्षांपूर्वीची गोष्ट!‘रुखवतात ही भांडी आहेत, पण ही भांडी नाहीत, असं तुमच्या घरच्यांनी आमच्या घरच्यांना बोलून दाखवलं होतं. -’ पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट!- या  गोष्टी  म्हटलं तर खूप छोट्या, क्षुल्लक ; तरीही लक्षात राहतात... का ? कशासाठी? हे प्रसंग कधीच संपून गेलेत, ती परिस्थितीही कधीच बदलली आहे.

‘त्या’च्या घरी चहा न पिणाऱ्याने नंतर किती तरी वेळा चहा प्यायला असेल. अडतीस वर्षांपूर्वी बाबांनी पैसे दिले नाहीत म्हणणारा माणूस आज नीट कमावतो आहे. एवढंच नाही तर ज्या ठिकाणी त्याला जायचं होतं, तिथे तो अनेकदा जाऊनही आलेला आहे. पण तरी बाबांनी तेव्हा पैसे दिले नाहीत, हे शल्य मनात आहेच. रुखवताची भांडी घरातून कधीच विसरली गेली आहेत, पण मनात त्या प्रसंगाची बोच अजूनही आहेच!

अशा प्रकारच्या किती घटना अजूनही मनातली जागा अडवून बसल्या आहेत. या अशा वाक्यांमुळे मनातली ऊर्जा आजपर्यंत किती वेळा घटली आहे? नवीन कल्पना सुचायला, रोजची कामं चांगल्या पद्धतीने पार पाडायला, सकारात्मक विचार करायला, राग – चिंता अशा नकारात्मक भावनांना बळी न पडता सकारात्मक विचार करायला लागायला, आयुष्यात चांगले बदल करायला खूप कष्ट लागतात. आपण सर्वच जण विविध पद्धतीने आयुष्य घडवण्याचा, सजवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी उत्साह गोळा करत असतो. ऊर्जा निर्माण करत असतो. आसपासची आव्हानात्मक परिस्थिती, वेगळ्या वृत्तीच्या व्यक्ती आणि त्यांच्याशी घडलेले अप्रिय संवाद, अचानक समोर आलेले पेचप्रसंग आणि संकटं, उद्याच्या भविष्याच्या योजना – यात आपण कायमच व्यग्र असतो. असा सगळा विचार करण्यासाठी आपल्याला मानसिक – भावनिक ऊर्जेची गरज असते. अशा वेळी ऊर्जा घटवणाऱ्या अडगळीतल्या आठवणी जपून ठेवण्याची खरंच गरज आहे का?

- डॉ. श्रुती पानसे, मेंदू आणि शिक्षण अभ्यासक shruti.akrodcourses@gmail.com

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य