शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

मनात किती कचरा साठून आहे?...आणि का? त्याने मला साधा चहाही विचारला नव्हता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 08:27 IST

हे प्रसंग कधीच संपून गेलेत, ती परिस्थितीही कधीच बदलली आहे.

‘मी त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा त्याने मला साधा चहाही विचारला नव्हता. ’ – ही तीन वर्षांपूर्वीची गोष्ट!‘मला अमुक ठिकाणी जायचं होतं, बाबांना सांगितलं, समजावून सांगितलं पण त्यांनी मला त्यासाठी पैसे दिले नाहीत.’ – ही अडतीस वर्षांपूर्वीची गोष्ट!‘रुखवतात ही भांडी आहेत, पण ही भांडी नाहीत, असं तुमच्या घरच्यांनी आमच्या घरच्यांना बोलून दाखवलं होतं. -’ पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट!- या  गोष्टी  म्हटलं तर खूप छोट्या, क्षुल्लक ; तरीही लक्षात राहतात... का ? कशासाठी? हे प्रसंग कधीच संपून गेलेत, ती परिस्थितीही कधीच बदलली आहे.

‘त्या’च्या घरी चहा न पिणाऱ्याने नंतर किती तरी वेळा चहा प्यायला असेल. अडतीस वर्षांपूर्वी बाबांनी पैसे दिले नाहीत म्हणणारा माणूस आज नीट कमावतो आहे. एवढंच नाही तर ज्या ठिकाणी त्याला जायचं होतं, तिथे तो अनेकदा जाऊनही आलेला आहे. पण तरी बाबांनी तेव्हा पैसे दिले नाहीत, हे शल्य मनात आहेच. रुखवताची भांडी घरातून कधीच विसरली गेली आहेत, पण मनात त्या प्रसंगाची बोच अजूनही आहेच!

अशा प्रकारच्या किती घटना अजूनही मनातली जागा अडवून बसल्या आहेत. या अशा वाक्यांमुळे मनातली ऊर्जा आजपर्यंत किती वेळा घटली आहे? नवीन कल्पना सुचायला, रोजची कामं चांगल्या पद्धतीने पार पाडायला, सकारात्मक विचार करायला, राग – चिंता अशा नकारात्मक भावनांना बळी न पडता सकारात्मक विचार करायला लागायला, आयुष्यात चांगले बदल करायला खूप कष्ट लागतात. आपण सर्वच जण विविध पद्धतीने आयुष्य घडवण्याचा, सजवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी उत्साह गोळा करत असतो. ऊर्जा निर्माण करत असतो. आसपासची आव्हानात्मक परिस्थिती, वेगळ्या वृत्तीच्या व्यक्ती आणि त्यांच्याशी घडलेले अप्रिय संवाद, अचानक समोर आलेले पेचप्रसंग आणि संकटं, उद्याच्या भविष्याच्या योजना – यात आपण कायमच व्यग्र असतो. असा सगळा विचार करण्यासाठी आपल्याला मानसिक – भावनिक ऊर्जेची गरज असते. अशा वेळी ऊर्जा घटवणाऱ्या अडगळीतल्या आठवणी जपून ठेवण्याची खरंच गरज आहे का?

- डॉ. श्रुती पानसे, मेंदू आणि शिक्षण अभ्यासक shruti.akrodcourses@gmail.com

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य