शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

तुम्हीही वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिता का? जाणून घ्या यात किती आहे तथ्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 14:21 IST

Lemon Water Weight Loss : खरंच लिंबू पाण्याने वजन कमी होतं का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

Lemon Water Weight Loss : वजन वाढवण्यासाठी जास्तीत जास्त लोक लिंबू पाण्याचं सेवन करतात. अनेकांना असं वाटतं की, लिंबू पाण्याचं सेवन केल्याने शरीरातील चरबी कमी होते आणि मग वजन कमी होतं. पण खरंच लिंबू पाण्याने वजन कमी होतं का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

लिंबू पाणी प्यायल्याने काय होतं?

कॅलरी कमी होतात

लिंबू पाणी थंड प्याल तर त्यात कॅलरी फार कमी असतात. पाण्यात झीरो कॅलरी असतात आणि एका लिंबूमध्ये केवळ 17 कॅलरी असतात. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान थंड लिंबू पाण्याचं सेवन करणं एक चांगला पर्याय मानला जातो.

मेटाबॉलिज्म मजबूत होतं

लिंबू पाण्यामुळे मेटाबॉलिज्म मजबूत होतं, जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. जर शरीर हायड्रेट राहिलं तर याने तुमच्या मायटोकॉन्ड्रियाला योग्यप्रकारे काम करण्यास मदत मिळते. 

भूक कमी लागते

लिंबू पाण्याचं सेवन केल्याने तुमची चुकीचे पदार्थ खाण्याची सवय कमी होते. वजन कमी करण्यासाठी जेवणादरम्यान लिंबू पाण्याचं सेवन करा, जेणेकरून भूक नियंत्रित केली जावी. याचं कारण म्हणजे लिंबू पाण्यात कॅलरीचं प्रमाण कमी असतं.

विषारी पदार्थ बाहेर निघतात

थंड लिंबू पाण्याचं सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर निघतात आणि याने शरीर क्लिंज होतं. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

किती लिंबू पाणी प्यावं?

ज्या लोकांचं वजन 68 किलो आहे, त्यांनी 8 ते 12 मिली थंड लिंबू पाण्याचं सेवन करावं आणि ज्या लोकांचं वजन 68 किलोपेक्षा अधिक आहे. त्यांनी रोज 2 वेळा लिंबू पाण्याचं सेवन करावं.

लिंबू पाणी जास्त पिण्याचे नुकसान

लिंबात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन सी वाढलं तर याचा प्रभाव अनेक अवयवांवर पडतो. त्यामुळे अनेक डॉक्टर याचं कमी प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला देतात.

पोटदुखी

व्हिटॅमिन सी जास्त वाढल्याने पोटात अ‍ॅसिडीक सिक्रीशन वाढण्याची भीती असते. कारण याने अ‍ॅसिडची शक्यता जास्त वाढते. हे समस्या इथेच थांबत नाही, उलट जास्त लिंबू पाणी प्यायल्याने उलटी, जुलाब आणि मळमळ होण्याची समस्याही होऊ शकते. अनेक लोक गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्सने पीडित असतात त्यांनी लिंबू पाणी कमी प्यायला हवं.

तोंडात फोडं

लिंबाच्या मदतीने अनेकदा तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि दातांची स्वच्छताही केली जाते. पण जर लिंबू पाणी प्रमाणापेक्षा जास्त सेवन कराल तर यातील सायट्रिक अ‍ॅसिड ओरल टिश्यूजमध्ये सूज निर्माण करतं.  ज्यामुळे तोंडात फोडं येतात आणि जळजळ होते.

दात कमजोर होतात

प्रयत्न करा की, लिंबू पाणी पित असाल तर स्ट्रॉ चा वापर नक्की करा. कारण याने लिंबाच्या रसाचा संपर्क दातांशी येणार नाही. असं केल्याने दात कमजोर होणार नाहीत. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स