शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोटातील अन्न पचन होतंय किंवा सडतंय हे कसं कळेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 11:03 IST

आपल्या शरीराचं केंद्र हे आपलं पोट असतं. पोटामुळेच संपूर्ण शरीराच्या प्रक्रिया व्यवस्थित चालतात आणि जेवणामुळे ताकद वाढते. आपण जे काही खातो ते आपल्या पोटासाठी शक्ती आहे.

(Image Credit : muniyalayurveda.in)

आपल्या शरीराचं केंद्र हे आपलं पोट असतं. पोटामुळेच संपूर्ण शरीराच्या प्रक्रिया व्यवस्थित चालतात आणि जेवणामुळे ताकद वाढते. आपण जे काही खातो ते आपल्या पोटासाठी शक्ती आहे. आपण जे काही पदार्थ खातो त्याने आपल्याला ऊर्जा मिळते आणि पोटातील ही तयार झालेली ऊर्जा पुढे ट्रान्सफर होते.

पोटातील जठर मानवी पचनसंस्थेतील एक अवयव आहे. जठरातून आम्लयुक्त (acidic) जाठररस स्त्रवतो. त्यामुळे अन्नाचे पचन होते. अन्नाचे पचन, शोषण व रोगजंतूंचा नायनाट करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे अ‍ॅसिड करत असते. ही एक असी पिशवी आहे ज्यात आपण खाल्लेलं सगळं जातं. यात जास्तीत जास्त ३५० ग्रॅम जेवण बसू शकतं. 

आता जठरात काय होतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जठरात जेव्हा अन्न पोहोचतं. तेव्हा नैसर्गिकपणे यात आग पेटते. याला जठराग्नी म्हणतात. जसेही तुम्ही तोंडात पहिला घास घेता, जठरात अग्नी पेटते. अन्न पचन होईपर्यंत ही अग्नी पेटलेली असते. यामुळे अन्न पचण्यास मदत होते. 

पण जेव्हा तुम्ही जेवताना किंवा जेवणानंतर लगेच भरपूर पाणी पिता तेव्हा ही अग्नी विझते. अर्थातच ही अग्नी विझली तर तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचणार नाही. तुमची पचनक्रियाच थांबते. हे नेहमी लक्षात ठेवा की, अन्न पचताना आपल्या पोटात दोनच क्रिया होतात. एक म्हणजे Digation आणि दुसरी आहे fermentation. fermentation चा अर्थ सडणे असा होतो.

आयुर्वेदानुसार, अग्नीमुळेच अन्न पचन होणार, तेव्हाच त्याचा रस तयार होईल. या रसामुळेच मांस, मज्जा, रक्त, वीर्य, हाडे, मल-मूत्र तयार होतील. सर्वात शेवटी तयार होईल विष्ठा. हे तेव्हाच होईल जेव्हा अन्न पचेल. तसं नाही झालं तर वेगवेगळ्या समस्या होतील. जेवणानंतर जर लगेच पाणी प्यायलात तर जठराग्नी पेटणार नाही आणि पोटतील अन्न तसंच सडणार. सडल्यानंतर त्या विषारी पदार्थ तयार होतील.

अन्न पोटात सडल्यावर सर्वात आधी तयार होणारा विषारी पदार्थ म्हणजे यूरिक अॅसिड. अनेकदा तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन सांगता की, मला गुडघेदुखीचा त्रास होतोय, माझे खंदे-कंबर दुखत आहे. तेव्हा डॉक्टरही हेच सांगतात की, युरिक अॅसिड वाढलंय. युरिक अॅसिड जर वेळीच कंट्रोल केलं नाही तर तुम्ही एक पाऊलही चालू शकणार नाही. त्यामुळे पचनक्रिया चांगली व्हावी यासाठी तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य