शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

अश्रू जबरदस्तीने रोखणं पडू शकतं महागात, होऊ शकतं गंभीर नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 16:12 IST

Holding tears : अनेकांना हे माहीत नसतं की, असं करणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. ते कसं हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Holding tears : वेगवेगळ्या भावना जेव्हा व्यक्तीकडून व्यक्ती होतात तेव्हा अनेकदा डोळ्यातून अश्रू येतात. डोळ्यांमधून अश्रू येणं ही एक नॅचरल प्रक्रिया आहे. काही लोकांच्या डोळ्यातून खूप अश्रू येतात तर काही लोकांना अजिबातच रडू येत नाही. तर काही लोक डोळ्यातील अश्रू रडताना रोखून धरतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, असं करणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. ते कसं हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

अश्रू रोखण्याचे नुकसान

जेव्हा आपण अश्रू रोखून ठेवतो, त्यांना वाट मोकळी करून देत नाही तेव्हा आपलं शरीर मानसिक आणि शारीरिक तणावात येतं. अश्रू निघाल्याने शरीराला आराम मिळतो आणि भावनांचं संतुलन कायम राहतं. पण जर अश्रू जबरदस्तीने रोखले तर यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. ज्यामुळे डिप्रेशन किंवा चिंता अशा गंभीर समस्या होऊ शकतात.

होऊ शकतो गंभीर आजार

अश्रू रोखल्याने केवळ मानसिक आरोग्यावर प्रभाव पडतो असं नाही तर शारीरिक आरोग्याचं देखील नुकसान होतं. काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, अश्रू जबरदस्तीने रोखल्याने हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर आणि इतरही गंभीर समस्या होऊ शकतात.

अश्रू येऊ देणं गरजेचं

जर तुमची रडायची ईच्छा असेल तर अश्रू येऊ द्या. याने तुमचं मानसिक आणि सोबतच शारीरिक आरोग्यही चांगलं राहील. अश्रू ढाळल्याने भावनात्मक तणाव कमी होतो, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि तुमचं मन हलकं होतं. 

रडणं म्हणजे कमजोर असणं नाही

रडले म्हणजे तुम्ही कमजोर आहात असं नाही, उलट ही एक नॅचरल प्रोसेस आहे जे आपल्या भावनांना मार्ग मोकळा करण्याचं माध्यम आहे. जेव्हा आपण रडतो तेव्हा आपलं शरीर तणाव आणि भावनात्मक ओझ्यातून मुक्त होतं. रडणं हे दाखवतं की, आपण मनुष्य आहोत. ज्यांना भावना आहेत आणि त्या जिवंत आहेत. रडल्याने आपण शारीरिक आणि मानसिक दृष्टीने मजबूत होतो. कारण याने तणाव कमी होतो आणि मन हलकं होतं. त्यामुळे रडण्यासाठी लाजू नका किंवा कुणी काय म्हणेल याचा विचार करू नका. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य