शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

सावधान! उष्णतेच्या लाटेपासून राहा अलर्ट अन्यथा पडाल आजारी; आतापासून घ्या ‘ही’ खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 16:58 IST

उन्हाळ्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका आहे. साधारणपणे उष्णतेची लाट चालू असताना उष्माघाताचा धोका जास्त असतो.

उन्हाळा सुरू झाला आहे. वातावरणात उष्णता वाढू लागली आहे. अशा स्थितीत उन्हाळ्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका आहे. साधारणपणे उष्णतेची लाट चालू असताना उष्माघाताचा धोका जास्त असतो. बर्‍याच वेळा लोकांना स्ट्रोक येतो, त्यामुळे मळमळ, डोकेदुखी, उलट्या, जुलाब अशा तक्रारी दिसतात. उष्णतेच्या लाटेमुळे लहान असो वा मोठे... कोणालाही त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत उष्णतेची लाट कशी टाळायची हे जाणून घेण्याची गरज आहे. 

आहारात नारळ पाण्याचा समावेश करा

येत्या काही दिवसांत उष्ण वारे वाहू लागतील. थोडासा निष्काळजीपणा महागात होऊ शकतो. अशा परिस्थितीत नारळ पाण्याचा आहारात समावेश करावा. मुले सहसा कमी पाणी पितात. नारळाच्या पाण्याने त्यांना फायदा होऊ शकतो. नारळाच्या पाण्यात अनेक आवश्यक जीवनसत्त्वे असतात. याचा त्यांना फायदा होऊ शकतो.

पाणी प्या

प्रत्येक नागरिकाने दररोजच्या पाणी पिण्याच्या प्रमाणात वाढ करणे आवश्यक आहे. लिंबू-सरबत, कोकम सरबत, कैरी पन्हे, ताक असे पाण्याचे प्रमाण अधिकाधिक असणारे द्रव पदार्थ घ्यावेत.

काकडी खावी

उष्णता टाळायची असेल तर शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. हे टाळण्यासाठी अशा खाद्यपदार्थांचा वापर करावा, ज्यामुळे शरीरात पाण्याचा पुरवठा होत राहतो. काकडी हा एक चांगला पर्याय असू शकतो. काकडीत व्हिटॅमिन ए, बी, के आणि फायबर जास्त प्रमाणात उपलब्ध असतात. ते खाल्ल्याने उष्माघात टाळण्यास मदत होते.

पाय पाण्यात बुडवून ठेवा

पायाचे तळवे खूप गरम होतात. त्यातून निघणारी उष्णता थेट डोक्यावर येते. हे टाळण्यासाठी तुमचे पाय बादलीत किंवा थंड पाण्याच्या टबमध्ये बुडवून ठेवा. चेहऱ्यावर थंड पाण्याचा शिडकावा करत राहा.

काय काळजी घ्याल?

अंगात सैलसर आणि फिकट रंगाचे कॉटनचे कपडे घालावे. डोक्याला पांढरा रुमाल बांधूनच बाहेर पडावे. उन्हातून आल्यावर फ्रीजचे पाणी पिऊ नये, दिवसभरात जास्तीत जास्त द्रवपदार्थ सेवन करावेत, उन्हात बाहेर पडताना डोळ्यांवर गॉगल लावावा, फळांचं जास्तीत जास्त सेवन करावं. नारळपाणी, विविध फळांचे रस, काकडीचे प्रमाण वाढवावे.

असा घ्या आहार

पचायला हलका व पाण्याचा घटक अधिक असलेला आहार घ्यावा. मुगाची खिचडी किंवा वरण तसेच सर्व पालेभाज्यांचं प्रमाण आहारात वाढवावे. टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, सीताफळ, काकडी, द्राक्षे इत्यादी फळांचे सेवन वाढवावे. तुपाचाही आहारात समावेश करावा. नारळपाणी, उसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा. जेवणानंतर ताकही अवश्य प्यावं. उन्हाळ्याच्या दिवसांत मांसाहार शक्यतो टाळावा.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स