शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! उष्णतेच्या लाटेपासून राहा अलर्ट अन्यथा पडाल आजारी; आतापासून घ्या ‘ही’ खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 16:58 IST

उन्हाळ्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका आहे. साधारणपणे उष्णतेची लाट चालू असताना उष्माघाताचा धोका जास्त असतो.

उन्हाळा सुरू झाला आहे. वातावरणात उष्णता वाढू लागली आहे. अशा स्थितीत उन्हाळ्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका आहे. साधारणपणे उष्णतेची लाट चालू असताना उष्माघाताचा धोका जास्त असतो. बर्‍याच वेळा लोकांना स्ट्रोक येतो, त्यामुळे मळमळ, डोकेदुखी, उलट्या, जुलाब अशा तक्रारी दिसतात. उष्णतेच्या लाटेमुळे लहान असो वा मोठे... कोणालाही त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत उष्णतेची लाट कशी टाळायची हे जाणून घेण्याची गरज आहे. 

आहारात नारळ पाण्याचा समावेश करा

येत्या काही दिवसांत उष्ण वारे वाहू लागतील. थोडासा निष्काळजीपणा महागात होऊ शकतो. अशा परिस्थितीत नारळ पाण्याचा आहारात समावेश करावा. मुले सहसा कमी पाणी पितात. नारळाच्या पाण्याने त्यांना फायदा होऊ शकतो. नारळाच्या पाण्यात अनेक आवश्यक जीवनसत्त्वे असतात. याचा त्यांना फायदा होऊ शकतो.

पाणी प्या

प्रत्येक नागरिकाने दररोजच्या पाणी पिण्याच्या प्रमाणात वाढ करणे आवश्यक आहे. लिंबू-सरबत, कोकम सरबत, कैरी पन्हे, ताक असे पाण्याचे प्रमाण अधिकाधिक असणारे द्रव पदार्थ घ्यावेत.

काकडी खावी

उष्णता टाळायची असेल तर शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. हे टाळण्यासाठी अशा खाद्यपदार्थांचा वापर करावा, ज्यामुळे शरीरात पाण्याचा पुरवठा होत राहतो. काकडी हा एक चांगला पर्याय असू शकतो. काकडीत व्हिटॅमिन ए, बी, के आणि फायबर जास्त प्रमाणात उपलब्ध असतात. ते खाल्ल्याने उष्माघात टाळण्यास मदत होते.

पाय पाण्यात बुडवून ठेवा

पायाचे तळवे खूप गरम होतात. त्यातून निघणारी उष्णता थेट डोक्यावर येते. हे टाळण्यासाठी तुमचे पाय बादलीत किंवा थंड पाण्याच्या टबमध्ये बुडवून ठेवा. चेहऱ्यावर थंड पाण्याचा शिडकावा करत राहा.

काय काळजी घ्याल?

अंगात सैलसर आणि फिकट रंगाचे कॉटनचे कपडे घालावे. डोक्याला पांढरा रुमाल बांधूनच बाहेर पडावे. उन्हातून आल्यावर फ्रीजचे पाणी पिऊ नये, दिवसभरात जास्तीत जास्त द्रवपदार्थ सेवन करावेत, उन्हात बाहेर पडताना डोळ्यांवर गॉगल लावावा, फळांचं जास्तीत जास्त सेवन करावं. नारळपाणी, विविध फळांचे रस, काकडीचे प्रमाण वाढवावे.

असा घ्या आहार

पचायला हलका व पाण्याचा घटक अधिक असलेला आहार घ्यावा. मुगाची खिचडी किंवा वरण तसेच सर्व पालेभाज्यांचं प्रमाण आहारात वाढवावे. टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, सीताफळ, काकडी, द्राक्षे इत्यादी फळांचे सेवन वाढवावे. तुपाचाही आहारात समावेश करावा. नारळपाणी, उसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा. जेवणानंतर ताकही अवश्य प्यावं. उन्हाळ्याच्या दिवसांत मांसाहार शक्यतो टाळावा.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स