शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

सावधान! उष्णतेच्या लाटेपासून राहा अलर्ट अन्यथा पडाल आजारी; आतापासून घ्या ‘ही’ खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 16:58 IST

उन्हाळ्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका आहे. साधारणपणे उष्णतेची लाट चालू असताना उष्माघाताचा धोका जास्त असतो.

उन्हाळा सुरू झाला आहे. वातावरणात उष्णता वाढू लागली आहे. अशा स्थितीत उन्हाळ्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका आहे. साधारणपणे उष्णतेची लाट चालू असताना उष्माघाताचा धोका जास्त असतो. बर्‍याच वेळा लोकांना स्ट्रोक येतो, त्यामुळे मळमळ, डोकेदुखी, उलट्या, जुलाब अशा तक्रारी दिसतात. उष्णतेच्या लाटेमुळे लहान असो वा मोठे... कोणालाही त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत उष्णतेची लाट कशी टाळायची हे जाणून घेण्याची गरज आहे. 

आहारात नारळ पाण्याचा समावेश करा

येत्या काही दिवसांत उष्ण वारे वाहू लागतील. थोडासा निष्काळजीपणा महागात होऊ शकतो. अशा परिस्थितीत नारळ पाण्याचा आहारात समावेश करावा. मुले सहसा कमी पाणी पितात. नारळाच्या पाण्याने त्यांना फायदा होऊ शकतो. नारळाच्या पाण्यात अनेक आवश्यक जीवनसत्त्वे असतात. याचा त्यांना फायदा होऊ शकतो.

पाणी प्या

प्रत्येक नागरिकाने दररोजच्या पाणी पिण्याच्या प्रमाणात वाढ करणे आवश्यक आहे. लिंबू-सरबत, कोकम सरबत, कैरी पन्हे, ताक असे पाण्याचे प्रमाण अधिकाधिक असणारे द्रव पदार्थ घ्यावेत.

काकडी खावी

उष्णता टाळायची असेल तर शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. हे टाळण्यासाठी अशा खाद्यपदार्थांचा वापर करावा, ज्यामुळे शरीरात पाण्याचा पुरवठा होत राहतो. काकडी हा एक चांगला पर्याय असू शकतो. काकडीत व्हिटॅमिन ए, बी, के आणि फायबर जास्त प्रमाणात उपलब्ध असतात. ते खाल्ल्याने उष्माघात टाळण्यास मदत होते.

पाय पाण्यात बुडवून ठेवा

पायाचे तळवे खूप गरम होतात. त्यातून निघणारी उष्णता थेट डोक्यावर येते. हे टाळण्यासाठी तुमचे पाय बादलीत किंवा थंड पाण्याच्या टबमध्ये बुडवून ठेवा. चेहऱ्यावर थंड पाण्याचा शिडकावा करत राहा.

काय काळजी घ्याल?

अंगात सैलसर आणि फिकट रंगाचे कॉटनचे कपडे घालावे. डोक्याला पांढरा रुमाल बांधूनच बाहेर पडावे. उन्हातून आल्यावर फ्रीजचे पाणी पिऊ नये, दिवसभरात जास्तीत जास्त द्रवपदार्थ सेवन करावेत, उन्हात बाहेर पडताना डोळ्यांवर गॉगल लावावा, फळांचं जास्तीत जास्त सेवन करावं. नारळपाणी, विविध फळांचे रस, काकडीचे प्रमाण वाढवावे.

असा घ्या आहार

पचायला हलका व पाण्याचा घटक अधिक असलेला आहार घ्यावा. मुगाची खिचडी किंवा वरण तसेच सर्व पालेभाज्यांचं प्रमाण आहारात वाढवावे. टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, सीताफळ, काकडी, द्राक्षे इत्यादी फळांचे सेवन वाढवावे. तुपाचाही आहारात समावेश करावा. नारळपाणी, उसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा. जेवणानंतर ताकही अवश्य प्यावं. उन्हाळ्याच्या दिवसांत मांसाहार शक्यतो टाळावा.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स