शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

रजोनिवृत्तीचा काळ आणि आहारात बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 16:35 IST

रजोनिवृत्ती हा काळ स्त्री जीवनात सगळ्यात मोठा बदल घडवणारा असतो. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे शरीरात बदल होत राहतात, संप्रेरके जसे की इस्ट्रोजन व प्रोजेस्टोरन याचे स्रावाचे प्रमाण कमी होते व त्यामुळे विविध प्रकारच्या आजाराची सुरुवात होत असते.

(Image Credit : health.harvard.edu)

-प्रिया गुरव

रजोनिवृत्ती हा काळ स्त्री जीवनात सगळ्यात मोठा बदल घडवणारा असतो. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे शरीरात बदल होत राहतात, संप्रेरके जसे की इस्ट्रोजन व प्रोजेस्टोरन याचे स्रावाचे प्रमाण कमी होते व त्यामुळे विविध प्रकारच्या आजाराची सुरु वात होत असते. या कालवधीतील आहार हा पौष्टिक असला पाहिजे, त्यासाठी आहारात बदल केले, तर रजोनिवृत्ती टाळू शकत नाही. पण त्यामुळे होणारे दीर्घकालीन आजार रोखू शकतो. तसेच रजोनिवृत्तीच्या कालखंडात होणाऱ्या विविध प्रकारच्या त्रासाची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते.

इस्ट्रोजन व प्रोजेस्टोरन या संप्रेरकाचे स्रावाचे प्रमाण कमी होत जाते व त्यामुळे चयापचय क्रिया मंदावते. ज्यामुळे वजन वाढ होते. इस्ट्रोजनचा कमी प्रमाणातील स्त्राव हाडांची घनता कमी होणे, हाडांची बळकटी कमी होणे याला कारणीभूत ठरतात. तसेच या दोन संप्रेरकांच्या कमतरतेमुळे स्त्रीला भावभावनांमध्ये चढ उतार जाणवणे, शरीरात गरम पट्टे जाणवणे असे बदल होऊ शकतात. या बदलाची तीव्रता आहार व व्यायाम, प्राणायाम यातून आपण कमी करू शकतो. आहारामध्ये उत्तम दर्जाचे प्रथिने, ओमेगा ३फॅटी अ‍ॅसिड, फायटोइस्ट्रोजन, कॅल्शियम आणि लोहयुक्त आहार याचा समावेश केला तर रजोनिवृत्तीचे लक्षण व त्रास याची तीव्रता कमी होते.

फायटोइस्ट्रोजन : फायटोइस्ट्रोजन हे वनस्पतीजन्य पोषणमूल्य आहे, जे आपल्याला सोयाबीन व सोयाबीनची विविध उत्पादने जसे की, सोया मिल्क, टोफू(सोया पनीर), सोया भाजी, कडधान्य, गडद हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, संत्री यातून मिळू शकते. फायटोइस्ट्रोजन हे शरीरातील असंतुलित संप्रेरकांच इस्ट्रोजन आहे. याचे नियमीत स्त्राव करून रजोनिवृत्तीच्या बदलांना कमी त्रासदायक करतो. यादरम्यान पोषणमूल्य शरीरास नियमितपणे आहारातून उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरून नैसर्गिकपणे वजन नियंत्रण, भावभावनांचे उतारचढाव यात मदत करतात.

उत्तम दर्जाचे प्रथिने : दूध व दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, दही, ताक, चीज, लोणी हे फॉफ्सरस, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन डी ही जीवनसत्त्वे शरीरास उपलब्ध होऊन त्यामुळे हाडांची घनता टिकवणे, शांतपणे झोप लागणे यासाठी फायदा होतो.

ओमेगा ३फॅटी अ‍ॅसिड : विविध प्रकारच्या बिया जसे की, आळशी, चिया आणि मगज किंवा भोपळ्याच्या बिया, अक्रोड सोयाबीन तेल, विविध तेल ,कॉड लिव्हर तेल, कडधान्यं हे ओमेगा ३फॅटी अ‍ॅसिडचे उत्तम स्त्रोत असून याचा आहारात नियमितपणे वापर केल्यास त्रास होत नाही. तसेच रजोनिवृत्तीचे अनुषंगिक विकार पुन्हा उद्भवत नाहीत.

तसेच या काळात कुठल्याही प्रकारचे पोषणमूल्याचा अभाव असलेले पदार्थ आहारात घेऊ नयेत. जसे की तेलकट, मसालेदार, मैद्याचे पदार्थ, अतिप्रकिया केलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, शीतपेय आहारात टाळावेत. त्याऐवजी धान्ययुक्त आहार, भाकरी, पोळी, कमी पॉलिशचा तांदूळ, वेगवेगळ्या डाळी, मोड आलेली कडधान्ये, विविध रंगाच्या पालेभाज्या, फळभाज्या, पिवळ्या केशरी रंगाची फळ याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास मधुमेह, कर्करोग, अनियंत्रित वजन वाढ असे आजार टाळले जाऊ शकतात. तसेच या त्रासाची तीव्रता कमी करण्यासाठी योगासन,व्यायाम, प्राणायाम, ध्यानधारणा मदत करू शकतात. नियमित वैद्यकीय तपासणी केल्यास मोठ्या आजाराचा धोका टळू शकतो किंवा वेळीच उपचार घेता येऊ शकतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWomenमहिलाMenstrual Hygiene Dayमासिक पाळीचा दिवस