शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

रजोनिवृत्तीचा काळ आणि आहारात बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 16:35 IST

रजोनिवृत्ती हा काळ स्त्री जीवनात सगळ्यात मोठा बदल घडवणारा असतो. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे शरीरात बदल होत राहतात, संप्रेरके जसे की इस्ट्रोजन व प्रोजेस्टोरन याचे स्रावाचे प्रमाण कमी होते व त्यामुळे विविध प्रकारच्या आजाराची सुरुवात होत असते.

(Image Credit : health.harvard.edu)

-प्रिया गुरव

रजोनिवृत्ती हा काळ स्त्री जीवनात सगळ्यात मोठा बदल घडवणारा असतो. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे शरीरात बदल होत राहतात, संप्रेरके जसे की इस्ट्रोजन व प्रोजेस्टोरन याचे स्रावाचे प्रमाण कमी होते व त्यामुळे विविध प्रकारच्या आजाराची सुरु वात होत असते. या कालवधीतील आहार हा पौष्टिक असला पाहिजे, त्यासाठी आहारात बदल केले, तर रजोनिवृत्ती टाळू शकत नाही. पण त्यामुळे होणारे दीर्घकालीन आजार रोखू शकतो. तसेच रजोनिवृत्तीच्या कालखंडात होणाऱ्या विविध प्रकारच्या त्रासाची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते.

इस्ट्रोजन व प्रोजेस्टोरन या संप्रेरकाचे स्रावाचे प्रमाण कमी होत जाते व त्यामुळे चयापचय क्रिया मंदावते. ज्यामुळे वजन वाढ होते. इस्ट्रोजनचा कमी प्रमाणातील स्त्राव हाडांची घनता कमी होणे, हाडांची बळकटी कमी होणे याला कारणीभूत ठरतात. तसेच या दोन संप्रेरकांच्या कमतरतेमुळे स्त्रीला भावभावनांमध्ये चढ उतार जाणवणे, शरीरात गरम पट्टे जाणवणे असे बदल होऊ शकतात. या बदलाची तीव्रता आहार व व्यायाम, प्राणायाम यातून आपण कमी करू शकतो. आहारामध्ये उत्तम दर्जाचे प्रथिने, ओमेगा ३फॅटी अ‍ॅसिड, फायटोइस्ट्रोजन, कॅल्शियम आणि लोहयुक्त आहार याचा समावेश केला तर रजोनिवृत्तीचे लक्षण व त्रास याची तीव्रता कमी होते.

फायटोइस्ट्रोजन : फायटोइस्ट्रोजन हे वनस्पतीजन्य पोषणमूल्य आहे, जे आपल्याला सोयाबीन व सोयाबीनची विविध उत्पादने जसे की, सोया मिल्क, टोफू(सोया पनीर), सोया भाजी, कडधान्य, गडद हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, संत्री यातून मिळू शकते. फायटोइस्ट्रोजन हे शरीरातील असंतुलित संप्रेरकांच इस्ट्रोजन आहे. याचे नियमीत स्त्राव करून रजोनिवृत्तीच्या बदलांना कमी त्रासदायक करतो. यादरम्यान पोषणमूल्य शरीरास नियमितपणे आहारातून उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरून नैसर्गिकपणे वजन नियंत्रण, भावभावनांचे उतारचढाव यात मदत करतात.

उत्तम दर्जाचे प्रथिने : दूध व दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, दही, ताक, चीज, लोणी हे फॉफ्सरस, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन डी ही जीवनसत्त्वे शरीरास उपलब्ध होऊन त्यामुळे हाडांची घनता टिकवणे, शांतपणे झोप लागणे यासाठी फायदा होतो.

ओमेगा ३फॅटी अ‍ॅसिड : विविध प्रकारच्या बिया जसे की, आळशी, चिया आणि मगज किंवा भोपळ्याच्या बिया, अक्रोड सोयाबीन तेल, विविध तेल ,कॉड लिव्हर तेल, कडधान्यं हे ओमेगा ३फॅटी अ‍ॅसिडचे उत्तम स्त्रोत असून याचा आहारात नियमितपणे वापर केल्यास त्रास होत नाही. तसेच रजोनिवृत्तीचे अनुषंगिक विकार पुन्हा उद्भवत नाहीत.

तसेच या काळात कुठल्याही प्रकारचे पोषणमूल्याचा अभाव असलेले पदार्थ आहारात घेऊ नयेत. जसे की तेलकट, मसालेदार, मैद्याचे पदार्थ, अतिप्रकिया केलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, शीतपेय आहारात टाळावेत. त्याऐवजी धान्ययुक्त आहार, भाकरी, पोळी, कमी पॉलिशचा तांदूळ, वेगवेगळ्या डाळी, मोड आलेली कडधान्ये, विविध रंगाच्या पालेभाज्या, फळभाज्या, पिवळ्या केशरी रंगाची फळ याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास मधुमेह, कर्करोग, अनियंत्रित वजन वाढ असे आजार टाळले जाऊ शकतात. तसेच या त्रासाची तीव्रता कमी करण्यासाठी योगासन,व्यायाम, प्राणायाम, ध्यानधारणा मदत करू शकतात. नियमित वैद्यकीय तपासणी केल्यास मोठ्या आजाराचा धोका टळू शकतो किंवा वेळीच उपचार घेता येऊ शकतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWomenमहिलाMenstrual Hygiene Dayमासिक पाळीचा दिवस