शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

रजोनिवृत्तीचा काळ आणि आहारात बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 16:35 IST

रजोनिवृत्ती हा काळ स्त्री जीवनात सगळ्यात मोठा बदल घडवणारा असतो. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे शरीरात बदल होत राहतात, संप्रेरके जसे की इस्ट्रोजन व प्रोजेस्टोरन याचे स्रावाचे प्रमाण कमी होते व त्यामुळे विविध प्रकारच्या आजाराची सुरुवात होत असते.

(Image Credit : health.harvard.edu)

-प्रिया गुरव

रजोनिवृत्ती हा काळ स्त्री जीवनात सगळ्यात मोठा बदल घडवणारा असतो. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे शरीरात बदल होत राहतात, संप्रेरके जसे की इस्ट्रोजन व प्रोजेस्टोरन याचे स्रावाचे प्रमाण कमी होते व त्यामुळे विविध प्रकारच्या आजाराची सुरु वात होत असते. या कालवधीतील आहार हा पौष्टिक असला पाहिजे, त्यासाठी आहारात बदल केले, तर रजोनिवृत्ती टाळू शकत नाही. पण त्यामुळे होणारे दीर्घकालीन आजार रोखू शकतो. तसेच रजोनिवृत्तीच्या कालखंडात होणाऱ्या विविध प्रकारच्या त्रासाची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते.

इस्ट्रोजन व प्रोजेस्टोरन या संप्रेरकाचे स्रावाचे प्रमाण कमी होत जाते व त्यामुळे चयापचय क्रिया मंदावते. ज्यामुळे वजन वाढ होते. इस्ट्रोजनचा कमी प्रमाणातील स्त्राव हाडांची घनता कमी होणे, हाडांची बळकटी कमी होणे याला कारणीभूत ठरतात. तसेच या दोन संप्रेरकांच्या कमतरतेमुळे स्त्रीला भावभावनांमध्ये चढ उतार जाणवणे, शरीरात गरम पट्टे जाणवणे असे बदल होऊ शकतात. या बदलाची तीव्रता आहार व व्यायाम, प्राणायाम यातून आपण कमी करू शकतो. आहारामध्ये उत्तम दर्जाचे प्रथिने, ओमेगा ३फॅटी अ‍ॅसिड, फायटोइस्ट्रोजन, कॅल्शियम आणि लोहयुक्त आहार याचा समावेश केला तर रजोनिवृत्तीचे लक्षण व त्रास याची तीव्रता कमी होते.

फायटोइस्ट्रोजन : फायटोइस्ट्रोजन हे वनस्पतीजन्य पोषणमूल्य आहे, जे आपल्याला सोयाबीन व सोयाबीनची विविध उत्पादने जसे की, सोया मिल्क, टोफू(सोया पनीर), सोया भाजी, कडधान्य, गडद हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, संत्री यातून मिळू शकते. फायटोइस्ट्रोजन हे शरीरातील असंतुलित संप्रेरकांच इस्ट्रोजन आहे. याचे नियमीत स्त्राव करून रजोनिवृत्तीच्या बदलांना कमी त्रासदायक करतो. यादरम्यान पोषणमूल्य शरीरास नियमितपणे आहारातून उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरून नैसर्गिकपणे वजन नियंत्रण, भावभावनांचे उतारचढाव यात मदत करतात.

उत्तम दर्जाचे प्रथिने : दूध व दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, दही, ताक, चीज, लोणी हे फॉफ्सरस, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन डी ही जीवनसत्त्वे शरीरास उपलब्ध होऊन त्यामुळे हाडांची घनता टिकवणे, शांतपणे झोप लागणे यासाठी फायदा होतो.

ओमेगा ३फॅटी अ‍ॅसिड : विविध प्रकारच्या बिया जसे की, आळशी, चिया आणि मगज किंवा भोपळ्याच्या बिया, अक्रोड सोयाबीन तेल, विविध तेल ,कॉड लिव्हर तेल, कडधान्यं हे ओमेगा ३फॅटी अ‍ॅसिडचे उत्तम स्त्रोत असून याचा आहारात नियमितपणे वापर केल्यास त्रास होत नाही. तसेच रजोनिवृत्तीचे अनुषंगिक विकार पुन्हा उद्भवत नाहीत.

तसेच या काळात कुठल्याही प्रकारचे पोषणमूल्याचा अभाव असलेले पदार्थ आहारात घेऊ नयेत. जसे की तेलकट, मसालेदार, मैद्याचे पदार्थ, अतिप्रकिया केलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, शीतपेय आहारात टाळावेत. त्याऐवजी धान्ययुक्त आहार, भाकरी, पोळी, कमी पॉलिशचा तांदूळ, वेगवेगळ्या डाळी, मोड आलेली कडधान्ये, विविध रंगाच्या पालेभाज्या, फळभाज्या, पिवळ्या केशरी रंगाची फळ याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास मधुमेह, कर्करोग, अनियंत्रित वजन वाढ असे आजार टाळले जाऊ शकतात. तसेच या त्रासाची तीव्रता कमी करण्यासाठी योगासन,व्यायाम, प्राणायाम, ध्यानधारणा मदत करू शकतात. नियमित वैद्यकीय तपासणी केल्यास मोठ्या आजाराचा धोका टळू शकतो किंवा वेळीच उपचार घेता येऊ शकतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWomenमहिलाMenstrual Hygiene Dayमासिक पाळीचा दिवस