शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

रात्रभर झोपूनही सकाळी अंथरुणातून उठावसं वाटत नाही? तर तुम्हाला आहे 'ही' गंभीर समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 13:57 IST

सततचा आळस येणं ही चांगली गोष्ट नाही. अधूनमधून असं घडत असेल तर ठीक आहे, पण हे सर्व वेळच होऊ लागलं तर सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे.

दिवसभर फक्त पडून राहावं असं वाटत असेल, कोणतंही काम करावसं वाटत नाही... अधूनमधून असं घडत असेल तर ठीक आहे, पण हे सर्व वेळच होऊ लागलं तर सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. सततचा आळस येणं ही चांगली गोष्ट नाही. आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. जर तुम्ही खूप जंक, प्रोसेस्ड फूड, अनहेल्दी फॅट खाल्ले तर तुम्हाला सुस्ती येईल आणि थकवा जाणवेल.

लोकांनी आपल्या आहारात हेल्दी फॅट, बॅलेन्स डाएट ज्यामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असले पाहिजेत. यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटते. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे व्यक्तीला सुस्तपणा जाणवतो. यालाच डिहायड्रेशनला बळी पडणं म्हणतात. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास रक्त घट्ट होऊ लागतं. पोषक तत्व सेल्सपर्यंत पोहोचत नाहीत.

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे क्रॅम्प्स आणि स्नायू दुखणे या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळेच भरपूर पाणी प्या, असं म्हटलं जातं. झोप न मिळाल्याने अनेक आजारांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सकाळी उठल्यावर सुस्त वाटू शकतं. रात्री किमान सात ते आठ तास झोपणं फार गरजेचं आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स