शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

तुमची पाण्याची बॉटल तर तुम्हाला आजारी करत नाहीये ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 11:53 IST

पाणी तुम्ही प्लॅस्टीकच्या बॉटलमधून, स्टेनलेस स्टील बॉटलमधून किंवा काचेच्या बॉटलमधून प्या त्या बॉटलच्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर तुम्हाला महागात पडू शकतं. 

(Image Credit: www.irishnews.com)

ऑफिस बॅग असो वा डेस्क पाण्याची बॉटल तुम्ही ठेवतच असाल. पण ही तहान भागवण्याच्या कामात येणारी ही बॉटल तुम्हाला आजारी करु शकते. हे तुम्हालाही माहीत असेल की, जास्तीत जास्त पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. कारण यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. पाणी तुम्ही प्लॅस्टीकच्या बॉटलमधून, स्टेनलेस स्टील बॉटलमधून किंवा काचेच्या बॉटलमधून प्या त्या बॉटलच्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर तुम्हाला महागात पडू शकतं. 

आजकाल प्रत्येक घरात प्लॅस्टीकचे रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या डिझाइनची भांडी बघायला मिळतात. यातून खाणे किंवा त्यात पदार्थ ठेवणे लोक फॅशन समजतात. पण हेच तुमची शान वाढवणारी भांडी तुम्हाला गंभीर आजाराच्या उंबरठ्यावर नेऊ शकते.  जर तुम्हीही प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पित असाल आणि प्लॅस्टिकच्या टिफिनमध्ये जेवण करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये नेहमी मॉइश्चर असतात, ज्यामुळे त्यात बॅक्टेरिया राहतो. आणि यामुळे तुम्हाला डायरिया होण्याची शक्यता अधिक असते. पाण्याच्या बॉटल या बराचवेळ बंद असतात त्यामुळे दमटपणा निर्माण होतो आणि याच कारणामुळे त्यात बॅक्टेरिया निर्माण होतात. 

असे करा स्वच्छ

तुम्ही बॉटल आतपर्यंत स्वच्छ करण्यासाठी ब्रशचा वापर करू शकता. जर तुम्ही बॉटल नेहमी स्वच्छ केली नाही तर त्यात व्हिटॅमिन इ बॅक्टेरिया वाढतो. यामुळे तुम्हाला फूड पॉयजनिंग आणि गॅस्ट्रोची समस्याही होऊ शकते. 

गरम पाण्याने करा स्वच्छ 

बॉटल नेहमी गरम पाण्याने स्वच्छ करायला हवी. बॉटलमध्ये गरम पाणी टाकून ब्रशच्या माध्यमातून बॉटल स्वच्छ करावी.

विनेगरनेही करा बॉटल स्वच्छ

बॉटलमध्ये विनेगर टाकूनही तुम्ही बॉटल स्वच्छ करु शकता. याने बॉटलमधील बॅक्टेरिया मरतात आणि तुम्हाला आजार होण्याची शक्यताही कमी होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सPlastic banप्लॅस्टिक बंदीwater pollutionजल प्रदूषण