शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Alert! प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं किडनीसाठी ठरू शकतं घातक, जाणून घ्या गंभीर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 14:21 IST

भरपूर पाणी पिणं हे शरीरासाठी आवश्यक आहेच. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने तुम्हाला वॉटर पॉयजनिंग, इन्टॉक्सिकेशन आणि मेंदूसंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

 पाणी आपल्या शरीरासाठी फार गरजेचं असतं. आपल्या शरीराचा जवळपास 70 टक्के भाग हा पाण्याने बनलेला असतो. पाण्यानेच आपलं शरीर हायड्रेटेड राहतं आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं. सोबतच शरीरातील सगळ्या अवयवांनी आपल्या क्रिया व्यवस्थित करण्यासाठी मदत करतं. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने शरीराला अनेक नुकसानांचा सामना करावा लागतो ज्याला ओवरहायड्रेशन नावाने ओळखलं जातं.

जास्त पाणी पिणं नुकसानकारक

भरपूर पाणी पिणं हे शरीरासाठी आवश्यक आहेच. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने तुम्हाला वॉटर पॉयजनिंग, इन्टॉक्सिकेशन आणि मेंदूसंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. फार जास्त पाणी प्यायल्याने मेंदू आणि शरीराच्या कोशिकांमध्ये सूज येते. जेव्हा मेंदूच्या कोशिकांमध्ये सूज येते तेव्हा मेंदूवर प्रेशर पडतं. ज्यामुळे तुम्हाला कन्फ्यूजन, झोप येणे आणि डोकेदुखी अशा समस्या होतात. मेंदूवर जेव्हा प्रेशर वाढतं तेव्हा याने हायपरटेंशन आणि लो हार्ट रेट अशा समस्या होतात.

फार जास्त पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात असलेल्या सोडिअमवर फार वाईट परिणाम होतो. सोडिअम आपल्या शरीरात असलेलं एक इलेक्ट्रोलाइट असतं जे कोशिकांच्या आत आणि बाहेर फ्लूइड बॅलन्स करतं. जास्त पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात सोडिअमचं प्रमाण कमी होऊ लागतं, ज्यामुळे शरीरातील फ्लूइड कोशिकांच्या आत जातं. यानेमुळे कोशिकांमध्ये सूज येते आणि व्यक्ती कोमात जाते. हे त्याच्या मृत्यूचं कारण ठरू शकतं.

किती पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर?

यासाठी ठोस अशी काही गाइडलाईन सेट करण्यात आलेली नाहीये की, एखाद्या व्यक्तीने दिवसातून किती पाणी प्यावं. तुमच्या शरीराला किती पाण्याची गरज आहे हे यावर अवलंबून असतं की, तुम्ही किती फिजिकल अॅक्टिविटी करता. तुमचं शरीराचं वजन किती आहे. सोबतच या वातावरणाचीही महत्वाची भूमिका असते. डॉक्टरांनी सांगितलं की, सामान्यपणे नॉर्मल दिवसांमध्ये दिवसातून 3 लीटर आणि उन्हाळ्यात 3.5 लीटर पाणी पिणं सेफ असतं.

प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने ओवरहायड्रेशनच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि  ओवरहायड्रेशनचा थेट प्रभाव किडनीवर पडतो. असे बरेच लोक आहेत ज्यांना वाटतं की, किडनी हेल्दी ठेवण्यासाठी जास्त पाणी पिणं गरजेचं असतं. पण असं नाहीये. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, जेव्हा तुम्ही फार जास्त प्रमाणात पाण्याचं सेवन करता तेव्हा याने तुमच्या किडनीला अपशिष्ट पदार्थ बाहेर काढण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. याने हार्मोन रिअॅक्शन होतं. ज्यामुळे तुम्हाला स्ट्रेस आणि अधिक थकवा जाणवू शकतो. जर खूप सारं पाणी पिऊनही तुम्हाला लघवी येत नसेल तर हा याचा संकेत आहे की, तुमची किडनी क्षमतेपेक्षा जास्त काम करत आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य