शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

Alert! प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं किडनीसाठी ठरू शकतं घातक, जाणून घ्या गंभीर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 14:21 IST

भरपूर पाणी पिणं हे शरीरासाठी आवश्यक आहेच. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने तुम्हाला वॉटर पॉयजनिंग, इन्टॉक्सिकेशन आणि मेंदूसंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

 पाणी आपल्या शरीरासाठी फार गरजेचं असतं. आपल्या शरीराचा जवळपास 70 टक्के भाग हा पाण्याने बनलेला असतो. पाण्यानेच आपलं शरीर हायड्रेटेड राहतं आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं. सोबतच शरीरातील सगळ्या अवयवांनी आपल्या क्रिया व्यवस्थित करण्यासाठी मदत करतं. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने शरीराला अनेक नुकसानांचा सामना करावा लागतो ज्याला ओवरहायड्रेशन नावाने ओळखलं जातं.

जास्त पाणी पिणं नुकसानकारक

भरपूर पाणी पिणं हे शरीरासाठी आवश्यक आहेच. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने तुम्हाला वॉटर पॉयजनिंग, इन्टॉक्सिकेशन आणि मेंदूसंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. फार जास्त पाणी प्यायल्याने मेंदू आणि शरीराच्या कोशिकांमध्ये सूज येते. जेव्हा मेंदूच्या कोशिकांमध्ये सूज येते तेव्हा मेंदूवर प्रेशर पडतं. ज्यामुळे तुम्हाला कन्फ्यूजन, झोप येणे आणि डोकेदुखी अशा समस्या होतात. मेंदूवर जेव्हा प्रेशर वाढतं तेव्हा याने हायपरटेंशन आणि लो हार्ट रेट अशा समस्या होतात.

फार जास्त पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात असलेल्या सोडिअमवर फार वाईट परिणाम होतो. सोडिअम आपल्या शरीरात असलेलं एक इलेक्ट्रोलाइट असतं जे कोशिकांच्या आत आणि बाहेर फ्लूइड बॅलन्स करतं. जास्त पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात सोडिअमचं प्रमाण कमी होऊ लागतं, ज्यामुळे शरीरातील फ्लूइड कोशिकांच्या आत जातं. यानेमुळे कोशिकांमध्ये सूज येते आणि व्यक्ती कोमात जाते. हे त्याच्या मृत्यूचं कारण ठरू शकतं.

किती पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर?

यासाठी ठोस अशी काही गाइडलाईन सेट करण्यात आलेली नाहीये की, एखाद्या व्यक्तीने दिवसातून किती पाणी प्यावं. तुमच्या शरीराला किती पाण्याची गरज आहे हे यावर अवलंबून असतं की, तुम्ही किती फिजिकल अॅक्टिविटी करता. तुमचं शरीराचं वजन किती आहे. सोबतच या वातावरणाचीही महत्वाची भूमिका असते. डॉक्टरांनी सांगितलं की, सामान्यपणे नॉर्मल दिवसांमध्ये दिवसातून 3 लीटर आणि उन्हाळ्यात 3.5 लीटर पाणी पिणं सेफ असतं.

प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने ओवरहायड्रेशनच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि  ओवरहायड्रेशनचा थेट प्रभाव किडनीवर पडतो. असे बरेच लोक आहेत ज्यांना वाटतं की, किडनी हेल्दी ठेवण्यासाठी जास्त पाणी पिणं गरजेचं असतं. पण असं नाहीये. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, जेव्हा तुम्ही फार जास्त प्रमाणात पाण्याचं सेवन करता तेव्हा याने तुमच्या किडनीला अपशिष्ट पदार्थ बाहेर काढण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. याने हार्मोन रिअॅक्शन होतं. ज्यामुळे तुम्हाला स्ट्रेस आणि अधिक थकवा जाणवू शकतो. जर खूप सारं पाणी पिऊनही तुम्हाला लघवी येत नसेल तर हा याचा संकेत आहे की, तुमची किडनी क्षमतेपेक्षा जास्त काम करत आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य