शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

Alert! प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं किडनीसाठी ठरू शकतं घातक, जाणून घ्या गंभीर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 14:21 IST

भरपूर पाणी पिणं हे शरीरासाठी आवश्यक आहेच. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने तुम्हाला वॉटर पॉयजनिंग, इन्टॉक्सिकेशन आणि मेंदूसंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

 पाणी आपल्या शरीरासाठी फार गरजेचं असतं. आपल्या शरीराचा जवळपास 70 टक्के भाग हा पाण्याने बनलेला असतो. पाण्यानेच आपलं शरीर हायड्रेटेड राहतं आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं. सोबतच शरीरातील सगळ्या अवयवांनी आपल्या क्रिया व्यवस्थित करण्यासाठी मदत करतं. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने शरीराला अनेक नुकसानांचा सामना करावा लागतो ज्याला ओवरहायड्रेशन नावाने ओळखलं जातं.

जास्त पाणी पिणं नुकसानकारक

भरपूर पाणी पिणं हे शरीरासाठी आवश्यक आहेच. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने तुम्हाला वॉटर पॉयजनिंग, इन्टॉक्सिकेशन आणि मेंदूसंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. फार जास्त पाणी प्यायल्याने मेंदू आणि शरीराच्या कोशिकांमध्ये सूज येते. जेव्हा मेंदूच्या कोशिकांमध्ये सूज येते तेव्हा मेंदूवर प्रेशर पडतं. ज्यामुळे तुम्हाला कन्फ्यूजन, झोप येणे आणि डोकेदुखी अशा समस्या होतात. मेंदूवर जेव्हा प्रेशर वाढतं तेव्हा याने हायपरटेंशन आणि लो हार्ट रेट अशा समस्या होतात.

फार जास्त पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात असलेल्या सोडिअमवर फार वाईट परिणाम होतो. सोडिअम आपल्या शरीरात असलेलं एक इलेक्ट्रोलाइट असतं जे कोशिकांच्या आत आणि बाहेर फ्लूइड बॅलन्स करतं. जास्त पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात सोडिअमचं प्रमाण कमी होऊ लागतं, ज्यामुळे शरीरातील फ्लूइड कोशिकांच्या आत जातं. यानेमुळे कोशिकांमध्ये सूज येते आणि व्यक्ती कोमात जाते. हे त्याच्या मृत्यूचं कारण ठरू शकतं.

किती पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर?

यासाठी ठोस अशी काही गाइडलाईन सेट करण्यात आलेली नाहीये की, एखाद्या व्यक्तीने दिवसातून किती पाणी प्यावं. तुमच्या शरीराला किती पाण्याची गरज आहे हे यावर अवलंबून असतं की, तुम्ही किती फिजिकल अॅक्टिविटी करता. तुमचं शरीराचं वजन किती आहे. सोबतच या वातावरणाचीही महत्वाची भूमिका असते. डॉक्टरांनी सांगितलं की, सामान्यपणे नॉर्मल दिवसांमध्ये दिवसातून 3 लीटर आणि उन्हाळ्यात 3.5 लीटर पाणी पिणं सेफ असतं.

प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने ओवरहायड्रेशनच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि  ओवरहायड्रेशनचा थेट प्रभाव किडनीवर पडतो. असे बरेच लोक आहेत ज्यांना वाटतं की, किडनी हेल्दी ठेवण्यासाठी जास्त पाणी पिणं गरजेचं असतं. पण असं नाहीये. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, जेव्हा तुम्ही फार जास्त प्रमाणात पाण्याचं सेवन करता तेव्हा याने तुमच्या किडनीला अपशिष्ट पदार्थ बाहेर काढण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. याने हार्मोन रिअॅक्शन होतं. ज्यामुळे तुम्हाला स्ट्रेस आणि अधिक थकवा जाणवू शकतो. जर खूप सारं पाणी पिऊनही तुम्हाला लघवी येत नसेल तर हा याचा संकेत आहे की, तुमची किडनी क्षमतेपेक्षा जास्त काम करत आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य