शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
2
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
3
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
4
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
5
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
6
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
7
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
8
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
9
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
10
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
11
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
12
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
13
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
14
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
15
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
16
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
17
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
18
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
19
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
20
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप

Health Tips: वाढत्या वयाबरोबर आरोग्याच्या तक्रारी वाढू नये यासाठी 'ही' त्रिसूत्री वापरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 11:56 IST

Health Tips: दीर्घायुष्य हवं असेल तर आहार-विहाराची दिलेली त्रिसूत्री आजपासून सुरू करा!

आपण काय खावे आणि काय खाऊ नये, याबद्दल आपल्यापेक्षा लोकांनाच आपल्या स्वाथ्याची काळजी दिसून येते. जो उठतो, तो वेगवेगळे सल्ले देतो. इंटरनेटवर तर सगळाच भुलभुलैया आहे. कोणी दोन वेळेस जेवणाचा सल्ला देतो, तर कोणी दर दोन तासांनी! कोणी म्हणतो पोळी खाऊ नका, कोणी म्हणतो भात खाऊ नका! सकाळी उठल्यावर अंश पोटी खाण्याच्या पदार्थांची यादी काढली, तर ती एवढी मोठी निघेल, की ते खाल्यानंतर दिवसभर जेवायची वेळच येणार नाही. 

अशीच सगळी माहिती वाचून गोंधळलेल्या एक मावशी डॉक्टरांकडे गेल्या. 'काही केल्या माझे वजन कमी होत नाही, त्यावर काहीतरी उपाय सांगा डॉक्टर', असे म्हणाल्या.

डॉक्टरांनी त्यांना दहा बारा प्रकारच्या रंगीबेरंगी गोळ्या दिल्या. गोळ्यांची पुडी मावशींच्या हाती दिली. मावशींचा पुढचा प्रश्न तयार होता. त्या म्हणाल्या, 'डॉक्टर या गोळ्या जेवणाआधी घ्यायच्या, की जेवणानंतर?'डॉक्टर म्हणाले, `मावशी, या गोळ्या जेवणाआधी घ्यायच्या नाहीत, किंवा जेवणानंतरही घ्यायच्या नाहीत...'`मऽऽऽग?' मावशींनी आ वासला.'या गोळ्या जेवणा`ऐवजी' घ्या...!'

या प्रसंगातला गमतीचा भाग सोडा, परंतु खरोखरच, आहाराचे व्यवस्थापन उचित वेळी झाले नाही, तर अन्नापेक्षा जास्त गोळ्यांचा भडीमार शरीरावर होऊ लागतो. म्हणून शरीराची गरज ओळखून त्याला उचित वेळी अन्नपुरवठा केला पाहिजे. ज्यामुळे अन्नाचे रुपांतर आळसात किंवा मेदात न होता ऊर्जेत होईल. याबद्दल आयुर्वेद सांगते,

आयुष्यं भोजनं जीर्णे वेगानां चाविधारण्ब्रह्मचर्यमहिंसान च साहसानां च वर्जनम्

सुश्रुतसंहितेतीतल या श्लोकानुसार, आधी जेवलेले अन्न पूर्ण जिरल्यावरच पुन्हा जेवावे. केवळ जेवणाची वेळ झाली म्हणून किंवा वेळ जात नाही म्हणून खात राहणे योग्य नाही. शरीराची चयापचय प्रक्रीया पूर्ण होण्यासाठी त्याला पुरेसा अवधी दिला पाहिजे. तरच, शरीराचे यंत्र सुरळीत चालेल. शिवाय, अन्नाचे पचन नीट होण्यासाठी वाघ मागे लावल्यागत न जेवता सावकाश जेवावे. जेवणात रुची घ्यावी. जेवणाचा आनंद आणि समाधान पंचेंद्रियांपर्यंत पोहोचले पाहिजे. 

याचबरोबर मलमूत्र विसर्जनात दिरंगाई करता कामा नये. ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे. म्हणजेच कामवासनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. हिंसा आणि नको तिथे साहस टाळले पाहिजे. या सर्व गोष्टींमुळे शरीराचे चक्र नियंत्रित राहते. आपल्या षडविकारांवर नियंत्रण राहते आणि सुदृढ देह व प्रसन्न जीनवशैलीमुळे आयुष्य वृद्धिंगत होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स