शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

भातासहीत हे पदार्थ पुन्हा चुकूनही करू नका गरम, होऊ शकतात गंभीर समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 10:40 IST

Health Tips : भातासहीत 4 पदार्थ चुकूनही दुसऱ्या दिवशी  गरम करून खाऊ नये. कारण ते पुन्हा गरम केल्याने ते विष बनण्याची शक्यता जास्त असते. याने गंभीर आजारही होऊ शकतात.

Health Tips : आपल्याकडे अशी परंपरा आहे की, जेवण नेहमी ताजं वाढलं जातं. डॉक्टरही सांगतात की, ताजं जेवण केल्याने व्यक्ती नेहमी बॅक्टेरियापासून मुक्त राहतो. पण आजकाल सगळेच नोकरी करतात. अशात कुणाकडेही इतका वेळ नाही की, ते दोन्ही वेळचं जेवण तयार करू शकतील. जास्तीत जास्त लोक सकाळी तयार केलेलं जेवण सायंकाळी आणि सायंकाळी तयार केलेलं सकाळी गरम करून खातात. पण जर तुम्ही असं करत असाल तर वेळीच सावध व्हा. एक्सपर्टनुसार, भातासहीत 4 पदार्थ चुकूनही दुसऱ्या दिवशी  गरम करून खाऊ नये. कारण ते पुन्हा गरम केल्याने ते विष बनण्याची शक्यता जास्त असते. याने गंभीर आजारही होऊ शकतात.

डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, काही दिवसांआधी टिकटॉकवर बऱ्याच लोकांनी यावरून प्रश्न उपस्थित केला होता. काही लोक म्हणाले होते की, भात खातच त्यांना फूड पॉयजनिंग झालं. काही लोकांना साखर खाल्ल्यावर समस्या झाली. त्यानंतर एक्सपर्टसोबत बोलण्यात आलं. ऑस्‍ट्रेलियाची डायटीशिअन किम लिंडसेने सांगितलं की, 4 फूड चुकूनही गरम करू नये. हे पदार्थ दुसऱ्या दिवशी गरम करून खाणं म्हणजे धोक्याची घंटा आहे. 

अंड्यात वेगाने पसरतात बॅक्टेरिया 

किम लिंडसेने सांगितलं की, अंडी पुन्हा कधीच गरम करू नये. अंडी गरम केल्यावर त्यात साल्मोनेला बॅक्टेरिया तयार होऊ लागतात. हे फूड पॉयजनिंगचं सगळ्यात मोठं कारण असतं. 20 डिग्री ते 73 डिग्री सेल्‍स‍िअसच्या तापमानात हा बॅक्टेरिया वेगाने पसरतो. अंडी किंवा अंड्याचे पदार्थ 2 तासांपेक्षा जास्त किंवा उन्हाळ्यात 1 तासांपेक्षा जास्त वेळ फ्रिजच्या बाहेर ठेवू नये.

भाताला गरम करणं धोकादायक

भिजवलेल्या भातामध्येही बेलिलस सेरेस नावाचा बॅक्टेरिया असतो. सामान्यपणे हे बॅक्टेरिया माती आणि भाज्यांमध्ये असतात. बटाटे, मटर, बीन्स आणि काही मसाल्यांमध्ये हे बॅक्टेरिया असतात. किम लिंडसेनुसार, जसेही तुम्ही भात पुन्हा गरम करता तेव्हा हे बॅक्टेरिया वेगाने पसरतात आणि फूड पॉयजनिंग होऊ शकतं. तुम्ही तांदूळ धुता पण यात बॅक्टेरिया लपून राहतात. त्यामुळे भात पुन्हा कधीच गरम करून खाऊ नये.

पालक गरम केल्याने कॅन्सरचा धोका?

किम लिंडसेने सांगितलं की, पालक पुन्हा गरम केल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो असा दावा केला जातो. पालकसारख्या हिरव्या पालेभाजीमध्ये नाइट्रेट नावाचं तत्व असतं. जेव्हा नाइट्रेट्स गरम केलं जातं तेव्हा ते इतर तत्वांसोबत मिळतं. ज्याने कॅन्सरचा धोक वाढू शकतो. नाइट्रेट हानिकारक नाही पण जेव्हा हे तत्व आधी तोंडात असणाऱ्या बॅक्टेरिया आणि शरीरातील एंजाइमसोबत मिळतं तेव्हा ते तत्व नाइट्रोसामायनमध्ये बदलतं जे कॅन्सरचं मुख्य कारक आहे.

बटाटे 2 तासांपेक्षा जास्त रूमच्या तापमानात ठेवू नका

तसेच बटाटेही जास्त गरम करू नये. रूमच्या तापमानातही बटाटे 2 तासांपेक्षा जास्त वेळ ठेवले तर बटाट्यामध्ये क्लोस्ट्रीडियम बोटुलिनम नावाचा बॅक्टेरिया तयार होतो. हा बॅक्टेरिया थेट शरीरातील नसांवर हल्ला करतो. तुम्हाला याने श्वास घेण्यासही समस्या होऊ शकते. यामुळे उलटी, मळमळ, पोटदुखी होऊ शकते. काही केसेसमध्ये मृत्यूचाही धोका असतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य