शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

Health Tips: 'ऊन जरा जास्त आहे, दरवर्षीच वाढतं'; भर उन्हात ताक पिऊन गार गार वाटतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 12:44 IST

Summer Tips: जेवणाचा शेवट 'गोड' पदार्थाने नाही, तर 'ताक भातानेच' करा आणि सुदृढ आरोग्य मिळवा; वाचा ताक पिण्याचे असंख्य फायदे!

वाढत्या उन्हाळ्यात थंडगार ताक पिण्यासारखं दुसरं सुख नाही. कोल्डड्रिंकने भागणार नाही ती तहान ताक पिऊन नक्कीच भागेल शिवाय शरीराला अनेक फायदे मिळतील ते वेगळेच. म्हणूनच ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले जाते. रोज ताक पिण्याचे आणि जेवणाच्या शेवटी ताक भात खाण्याचे असंख्य फायदे आहेत, सविस्तर जाणून घेऊ. 

गोड पदार्थाने जेवणाचा शेवट करण्याची पद्धत पाश्चात्यांची, आपली नाही! पूर्वीचे लोक जेवणाच्या शेवटी ताक भात खात असत. याचे कारण म्हणजे याआधी खाल्लेले सगळे जिन्नस पोटात गेल्यावर त्याचे व्यवस्थित पचन व्हावे आणि पोट शांत राहावे. आता आपण जेवणाचे साधे सोपे नियम पाळत नाही आणि आयुष्यभर जेवणाच्या बरोबरीने वेगवेगळ्या गोळ्यांचे सेवन करत राहतो. यापेक्षा गरजेच्या गोष्टींना प्राधान्य दिले आणि त्यांचा आहारात समावेश केला तर निरोगी आणि दीर्घायुष्याचे वरदान आपल्याला मिळू शकते. म्हणून तर ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले आहे. 

समुद्र मंथनाच्या वेळी वासुकी नावाचा शेष गुंडाळून देव आणि दानवांकडून मंथन झाले, त्यातून अनेक हिरे, रत्न, कामधेनु, कल्पवृक्ष आणि अमृत निघाले. ते मिळवण्यासाठी देव दानवांमध्ये चढाओढ झाली. शेवटी मोहिनी रूपात येऊन भगवान विष्णू यांनी देवांना अमृत प्राशन घडवले. त्यानुसार आपल्या घरात दही घुसळले जाते, त्यातून लोण्याचा गोळा वर येतो आणि शिल्लक राहिलेलं लोणकढं ताजं ताक पानात वाढलं जातं, तेव्हा तृप्ततेची अनुभूती येते. ते केवळ जिभेला आनंद देत नाही, तर आरोग्याला अनेक फायदे देते. असे अमृत इंद्राला स्वर्गात मिळणार नाही. म्हणून एका सुभाषितात म्हटले आहे, 

भोजनांते च किं पेयम्‌। जयंत: कस्‍य वै सुत:।कथं विष्‍णुपदं प्रोक्‍तम्‌। तक्रं शक्रस्‍य दुर्लभम्‌

स्वर्गात कल्पवृक्षापासून कामधेनूपर्यंत सर्वकाही मिळेल, परंतु अमृततुल्य असे ताक मिळणार नाही. म्हणून मनुष्या हे अमृत तुला उपलब्ध होत आहे, तर जेवणानंतर रोज ताक पीत जा, कारण ते इंद्रालाही मिळत नाही. असा त्याचा अर्थ आहे. आता जाणून घेऊ ताक पिण्याचे मुख्य फायदे - 

  • ताक हे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक पेय आहे. ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फोरस, इत्यादी खनिजे, रायनॉप्लेरीन व्हि‍टॅमिन, फोलेट ‘‘अ’’, ‘‘ब समूह’’ ‘‘ड’’ व ‘‘क’’ ही जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.
  • ताक हे आंबट, तुरट, रसात्मक असून भूक वाढवणारे आहे. थोडक्यात नियमित ताक प्याल्याने मेद, चरबी, शरीराची जाडी कमी होते. ताकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे अजीर्णामुळे पोटात साठलेला आमदोष कमी होतो.
  • ताक बनविण्यासाठी वापरलेल्या विरजणात लॅक्टोबॅसिलस, स्ट्रेप्टोकोकस जीवाणू असतात. त्यामुळे ताक शरीरासाठी जास्त फायदेमंद असते. ताकाचा रोजच्या आहारात समावेश केला असता प्रकृती चांगली राहते. ताक शरीरातील उष्णता कमी करून शरीराचे तापमान समतोल राखण्यास मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात याचा वापर करतात. 
  • नियमितपणे ताकाचे सेवन केल्यास अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो. शरीरातील रक्तभिसरण क्रिया ताकामुळे व्यवस्थित होते. याशिवाय हृदयाचा धमन्या कठीण बनणे, हृदयाचा झटका, कर्करोग यासारख्या घातक जीवघेण्या आजारांपासून बचाव करण्यास मदत होते.
  • भाजलेल्या जिऱ्याची पूड, हिंग, सैंधव आणि काळे मीठ घालून तयार केलेले ताक सदैव हितकर आहे . असे ताक बाराही महिने पिता येते.
  • ताक हे सर्व वयोगटातील सर्व व्यक्तींना पिण्यास उत्तम मानले जाते. परंतु काही ठिकाणी पाच वर्षाखालील लहान मुलांना दही हे चांगले मानले जाते.
  • अपचन म्हणजे जेवणाची वेळ होऊनही भूक न लागणे, पोटात जडपणा वाटणे यांसारखी लक्षणे असल्यास अर्धा चमचा आल्याचा रस, पाव चमचा पुदिन्याचा रस व चवीनुसार सैंधव मीठ लोणी काढून घेतलेल्या वाटीभर ताकात टाकून घोट घोट घेण्याने बरे वाटते.
टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न