शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तुम्हाला माहीतही नसतील नारळ पाण्याचे  हे ७ दुष्परिणाम; डॉक्टरांनी सांगितली सेवनाची योग्य वेळ

By manali.bagul | Updated: February 5, 2021 15:48 IST

Disadvantages of coconut water : कमी कॅलरीज आणि कमी फॅट फूल आहार म्हणून नारळ पाण्याचे सेवन केलं जातं. कोणीही आजारी असल्यास या व्यक्तीला पाहण्यासाठी लोक नारळपाणी घेऊन जातात. पण नारळपाणी चुकीच्यावेळी प्यायल्यानं नुकसानाचाही सामना करावा लागू शकतो.

भारतात मोठ्या प्रमाणावर लोक नारळ पाण्याचे सेवन करतात. साधारणपणे नारळपाणी हे चवीला गोड लागतं. त्या ठिकाणच्या मातीप्रमाणे नारळ पाण्याची चव असते. समुद्राच्या आजूबाजूला नारळाची झाडं असतील तर याची चव काही प्रमाणात  खारट असते. नारळाचे उत्पादन तामिळनाडू, कर्नाटक, केरळ या राज्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कमी कॅलरीज आणि कमी फॅट फूल आहार म्हणून नारळ पाण्याचे सेवन केलं जातं. कोणीही आजारी असल्यास या व्यक्तीला पाहण्यासाठी लोक नारळपाणी घेऊन जातात.

पण नारळपाणी चुकीच्यावेळी प्यायल्यानं नुकसानाचाही सामना करावा लागू शकतो. त्यासाठी आम्ही आज पाणी कधी प्यायचं, कधी पिऊ नये याबाबत सांगणार आहोत. दिल्लीतील डायटीशियन शीला सहरावत यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे.

नारळपाण्याचे दुष्परिणाम

जर शरीरात नारळाच्या पाण्याचे प्रमाण जास्त वाढले तर पोटाच्या समस्येने ग्रस्त लोकांना अतिसाराची समस्या उद्भवू शकते अशा परिस्थितीत, कमी प्रमाणात सेवन करणे चांगले उत्तम ठरेल.

ज्या लोकांचे शरीर थंड असते. त्यांना नारळपाण्याच्या सेवनानं जास्त त्रास होऊ शकतो. कारण नारळ पाण्यामुळे शरीराला अधिक शीतलता मिळते. 

लक्षात घ्या की नारळ पाण्यात रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म आहेत. अशा परिस्थितीत, जे लोक उच्च रक्तदाबासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेतात, नारळपाण्याचे सेवन केल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे नारळपाण्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात घ्या की जे लोक नारळाच्या पाण्याचे जास्त प्रमाणात सेवन करतात त्यांना वारंवार लघवी करावी लागते.

ज्या लोकांना मूत्रपिंडाचा त्रास आहे किंवा ज्या लोकांना किडनीचा आजार आहे त्यांनी आहारात नारळपाणी घेण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही लोकांना नारळपाण्याच्या पाण्यामुळे पोटात गोळा येण्याची समस्या उद्भवू शकते.

 तंबाखू खात नसाल तरीही 'या' ५ कारणांमळे होऊ शकतो तोंडाचा कॅन्सर, वेळीच सावध व्हा

जर आपणास कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया  करायची असेल तर त्यापूर्वी कमीतकमी 2 आठवडे नारळाच्या पाण्याचे सेवन करणे थांबवा. अन्यथा, शस्त्रक्रिये दरम्यान किंवा नंतर रक्तदाब नियंत्रित करण्यात समस्या येऊ शकते.

काही लोकांना सवय असते की ते व्यायामानंतर नारळाच्या पाण्याचे सेवन करतात, परंतु त्यामध्ये सोडियम कमी आहे हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. अशा परिस्थितीत, व्यायामानंतर नारळ पाण्याने आपली तहान शांत करण्याऐवजी आपण साधे पाणी वापरावे. कारण नारळ पाण्यापेक्षा साध्या पाण्यात सोडियमचे प्रमाण जास्त असते.

सावधान! जेवल्यानंतर तुम्हीसुद्धा हीच चूक करत असाल; तर कितीही पौष्टीक खा, होणार नाही फायदा 

नारळपाणी कधी प्यावं?

एका वेळी खूप जास्त प्रमाणात नारळपाणी पिऊ नये, पचायला जड असणा-या पदार्थांबरोबर पिऊ नये, एका दिवशी एका नारळापेक्षा जास्त टाळा. वजन कमी करणं, शरीराची चयापचय गती वाढवणं यासाठी नारळपाणी सकाळी उपाशीपोटी प्यावं. गर्भवती स्त्रियांना सकाळी होणारी मळमळ, उलटी यात घोट घोट पिण्यासाठी द्यावं, पण प्रमाण कमी असावं.

नारळ आणून त्यातलं पाणी फ्रीजमध्ये ठेवून दोन-तीन दिवस पुरवून वापरू नये. शिळं नारळपाणी पचण्यास जड होतं. एकदम 250 मिली एका व्यक्तीनं न पिता किमान दोन जणांनी प्यावं म्हणजे जड होत नाही.  नारळपाणी प्यायल्यानं काहीजणांना जुलाबही होतात. त्यांनी मात्र नारळपाणी पिऊच नये.

(टिप : वरील सर्व उपाय आम्ही माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.) 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यfoodअन्न