शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

Health Tips: 'एक तीळ सात जणांनी वाटून खावा' म्हणतात, एवढं काय त्याला महत्त्व? सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 11:13 IST

Health Tips: तीळ स्निग्ध पदार्थ म्हणून ओळखला जातो, पण या कणभर तिळाचे मणभर गुणधर्म आहेत, वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल!

>>मकरंद करंदीकर 

भारतभर मकरसंक्रांतीला खास महत्व आहे. हा सण साजरा करण्याची प्रत्येक राज्यामधील तऱ्हा वेगवेगळी आहे. महाराष्ट्रात सुगड पूजन, वाण देणे, लहान मुलांचे हलव्याचे दागिने घालून तिळवण, बोरन्हाण, नवविवाहितेचे हलव्याचे दागिने घालून साजरे केले जाणारे हळदीकुंकू अशा अनेक गोष्टी मोठ्या हौसेने केल्या जातात. या सर्वांमध्ये काळ्या वस्त्राला फार महत्व असते. स्वामी अय्यप्पाचे भक्त तर काळे कपडे परिधान करूनच ४० दिवसांचे व्रत करतात. काळ्या कपड्यांमध्ये सूर्यकिरण म्हणजेच पर्यायाने उष्णता सर्वाधिक शोषली जाते. या काळात सर्वत्र खूप थंडी पडत असल्याने या उष्णतेची शरीराला खूप गरज असते. आहारातही तीळ, गूळ, ऊस, भुईमुगाच्या शेंगा इ उष्ण आणि स्निग्ध पदार्थांचा उपयोग केला जातो. 

 तिळाच्या  छोट्याशा  दाण्यात काय काय सामावले आहे हे वाचले तर थक्क व्हायला होते. तांबे, मँगेनीज, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी १ आणि बी ६, थायामीन फॉलेट, नायासिन, झिंक, मॉलिब्डेनम, सेलेनियम तसेच  सिसॅमिन व  सिसॅमोलीन हे दोन अत्यंत महत्वाचे दुर्मीळ  पोषक घटक या तिळाच्या टीचभर दाण्यात असतात. सिसॅमिन व  सिसॅमोलीन हे लिग्नन्स म्हणून ओळखले जातात आणि ते रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी करणारे तसेच इ व्हिटॅमिन देणारे आहेत.

अत्यंत महत्वाच्या  घटकयुक्त अशा तिळांमुळे मधुमेहाला प्रतिबंध करायला आणि त्याचे  नियंत्रण करायला मदत होते. या शिवाय कॅन्सरचा धोका कमी करणे, हाडांची शक्ती वाढवणे, सूज प्रतिबंध, पचनक्रिया सुधारणे, पचनक्रियेत सर्व अवयवांची शक्ती वाढविणे इत्यादी गोष्टीदेखील हा इवलासा तीळ करतो. हृदयाची कार्यक्षमता वाढविणे, उच्च रक्तदाब कमी करणे, स्नायू आणि केसांची ताकत वाढविणे, अकाली वृद्धत्व टाळणे, इत्यादी गोष्टींसाठी तीळ फार उपयुक्त आहे.  एवढासा तीळ असा अत्यंत बहुगुणी असल्यामुळेच मराठीत ' १ तीळ ७ जणांनी वाटून खावा ' ही  वरकरणी विनोदी वाटावी अशी म्हण रुजली असावी. 

गूळ हा पदार्थही तसाच गुणी आहे. गुळामध्येदेखील व्हिटॅमिन बी ६, बी १२,आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस,प्रोटीन्स, फॉलेट, सेलेनियम असा खजिना भरलेला असतो. आपल्याकडील लोकांमध्ये विशेषत: स्त्रियांमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि पोषक द्रव्यांची कमतरता आढळते. म्हणूनच आपल्या अनेक धार्मिक कार्यांमध्ये, व्रतांमध्ये नैवेद्यासाठी चणे गूळ, पुरण, पुरणपोळी, गुळपोळी असे पदार्थ आवर्जून वापरले जातात. प्रसाद म्हणून नंतर ते खाल्ले जातात.

( तिळाची पोषणमूल्ये संदर्भ : प्रा. मीनाक्षी भट्टाचारजी, राईस युनिव्हर्सिटी, ह्यूस्टन,टेक्सास, यांचा लेख )

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य