शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पोटातील जळजळ आणि गॅस पळवा केवळ १० मिनिटात, वापरा हे घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 15:59 IST

छातीत आणि पोटात जळजळ होण्याचं मुख्य कारण अन्न पचण्यासाठी आवश्यक असलेला रस तयार होण्याची अनियमीतता. पण ही समस्या आपल्या किचनमध्ये असलेल्या कितीतरी पदार्थांच्या माध्यमातून सहज दूर केली जाऊ शकते.

अनेकदा काही खाल्लं की, काही लोकांच्या पोटात जळजळ सुरु होते. खासकरुन जास्त तिखट किंवा मसालेदार काही खाल्ल्यावर ही समस्या होते. तसेच ज्यांना अ‍ॅसिडिटी किंवा गॅसची समस्या असते, त्यांच्या पोटही नेहमी गरम राहतं. पोटात गरम वाटण्याची किंवा जळजळ होण्याची ही समस्या कधी कधी इतकी वाढते की, याने रुटीन लाइफ डिस्टर्ब होते. 

छातीत आणि पोटात जळजळ होण्याचं मुख्य कारण अन्न पचण्यासाठी आवश्यक असलेला रस तयार होण्याची अनियमीतता. पण ही समस्या आपल्या किचनमध्ये असलेल्या कितीतरी पदार्थांच्या माध्यमातून सहज दूर केली जाऊ शकते. यांनी पोटाचीची नाही तर इतरही समस्या दूर होतात. पोटात होणारी जळजळ केवळ १० मिनिटात दूर करण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.  

जेवण झाल्यावर गूळ खावा

जर तुम्हाला पोटात जळजळ होण्याची समस्या होत असेल तर रोज जेवण झाल्यावर थोडा गूळ चघळायला हवा. गूळ चाऊन खाऊ नका. जितका जास्त तुम्ही गूळ चघळाल तितका जास्त फायदा होईल. याने पचनक्रियेची क्षमता वाढते आणि पोटाची जळजळ होण्याची समस्याही दूर होते.

टोमॅटो आणि संत्री

पोटात होणारी जळजळ दूर करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर ठरतं. कच्चा टोमॅटोचा आहारात समावेश करा. याने अ‍ॅसिडिटी आणि पोटाची जळजळ लगेच दूर होईल. टोमॅटोमुळे शरीरातील क्षारचं प्रमाण वाढतं. ठिक असंच काम संत्री करतात. 

आल्याचा रस

आल्याचा रस सुद्धा पोटातील जळजळ आणि गरम वाटणं दूर करतो. लिंबाचा रस, मध आणि आल्याचा रस पाण्यात एकत्र करुन सेवन करा. याने पोट शांत होईल. आल्यामध्ये अ‍ॅंटी बॅक्टेरिअल गुणही असतात त्यामुळे पोटातील हानिकारक बॅक्टेरिया सुद्धा नष्ट होतात. 

बडीशेपेचं पाणी

१ कप उकळलेल्या पाण्यात एक चमचा बडीशेप मिश्रित करुन रात्रभर तसंच ठेवा. सकाळी हे मिश्रण गाळून त्यात एक चमचा मध टाकून सेवन करा. हे मिश्रण दिवसातून तीन वेळा घ्या. याने पोटाची जळजळ, अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होईल. तसेच पोट फुगणे आणि गॅसची समस्याही दूर होईल. 

ओवा

एका पॅनमध्ये ओवा भाजून त्याची पावडर तयार करा. यात थोडं काळं मीठ मिश्रित करा. हे जेवण केल्यावर कोमट पाण्यासोबत सेवन करा. याने पोटाची जळजळ आणि अ‍ॅसिडिटी दूर होईल. ओव्यात थायमॉल आणि काळ्या मिठात अल्केलाइड्स असतात. याने अ‍ॅसिडिटी दूर होते. 

(टिप - वरील सल्ले केवळ माहिती म्हणूण वाचकांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. यातील कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाला याचा फायदा होईलच असे नाही.)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य