शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

रोजच्या जेवणात चिमुटभर जास्त मीठ करेल घात; जाणून घ्या जास्तीचं मीठ खाल्याने काय होतील परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 16:40 IST

मीठ हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.

Health Tips: मीठ हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. जेवणात मीठ नसेल तर कोणत्याही पदार्थाला चव येऊ शकत नाही. आपल्या समोर पंचवक्वानाचं ताट  वाढून ठेवलं आणि त्यात जर मीठच नसेल तर ताटातील पदार्थ मिठाशिवाय बेचव लागतो. यावरून रोजच्या आहारात मीठ किती महत्वाचा घटक आहे हे यावरुन कळतं. पण, एखाद्या पदार्थाची चव वाढवण्याकरिता मीठ जेवढं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आरोग्यासाठीही मीठ खाणे उपयुक्त असते. मात्र, रोजच्या जेवणामध्ये मिठाचा वापर किती प्रमाणात करावा यालाही काही मर्यादा आखलेल्या आहेत. रोजच्या आहारात मिठाच्या जास्तीच्या वापरामुळे आरोग्याचे बरेच प्रश्न निर्माण होऊ शकतात. असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. 

मीठ म्हणजेच 'सोडियम क्लोराईड' हा घटक शारिरिक प्रकियेमध्ये महत्वाची भूमिका निभावतो. शरीरात मिठाच्या कमतरतेमुळे गंभीर नुकसानही होऊ शकतात. त्याचबरोबर आहारामध्ये जास्त प्रमाणात मिठाचा समावेश केल्यास ते आरोग्यासाठी अपायकारक मानलं जातं.  शरीराला योग्य मीठ प्रमाणात मीठ मिळाले नाही तर तब्येत बिघडते. असं डॉक्टरांच म्हणणं आहे. 

ब्लड प्रेशरचा धोका -

दीर्घकाळ रोजच्या जेवणामध्ये मिठाचा गरजेपेक्षा जास्त वापर केल्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.शिवाय हाय बीपी म्हणजेच ( उच्च रक्तदाब) च्या समस्येला सायलेंट किलर म्हणूनही ओळखले जाते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, वेळेआधीच यावर नियंत्रण मिळवता आले नाही तर ह्रदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार डोकं वर काढतात. त्यामुळे वारंवार तुमचं ब्लड प्रेशर वाढत असेल तर अशा स्थितीत आहारात मिठाचा वापर कमी करावा किंवा न केलेलाच बरा. 

तहान लागणे-

जास्त मीठ खाल्ल्यामुळे सारखी तहान लागते. अशातच पाणी प्यायल्या नंतरही जर तुम्हाला पुन्हा पाणी प्यावेसे वाटत असेल तर मिठाचं सेवन कमी प्रमाणात करणं गरजेचं आहे. 

किडणी संबंधित समस्या उद्भवतात-

आहारात गरजेपेक्षा जास्त मीठाचा वापर करत असाल तर ही सवय बदलणं महत्वाचं ठरेल. किडणी रक्तातून अतिरिक्त प्रमाणात असलेलं सोडियम फिल्टर करण्याचं काम करते. ज्यावेळेस तुम्ही  जास्त प्रमाणात मीठाचं सेवन करता त्याच्या परिणाम थेट किडणीवर होतो. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सLifestyleलाइफस्टाइलHeart Diseaseहृदयरोग