शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

रोजच्या जेवणात चिमुटभर जास्त मीठ करेल घात; जाणून घ्या जास्तीचं मीठ खाल्याने काय होतील परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 16:40 IST

मीठ हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.

Health Tips: मीठ हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. जेवणात मीठ नसेल तर कोणत्याही पदार्थाला चव येऊ शकत नाही. आपल्या समोर पंचवक्वानाचं ताट  वाढून ठेवलं आणि त्यात जर मीठच नसेल तर ताटातील पदार्थ मिठाशिवाय बेचव लागतो. यावरून रोजच्या आहारात मीठ किती महत्वाचा घटक आहे हे यावरुन कळतं. पण, एखाद्या पदार्थाची चव वाढवण्याकरिता मीठ जेवढं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आरोग्यासाठीही मीठ खाणे उपयुक्त असते. मात्र, रोजच्या जेवणामध्ये मिठाचा वापर किती प्रमाणात करावा यालाही काही मर्यादा आखलेल्या आहेत. रोजच्या आहारात मिठाच्या जास्तीच्या वापरामुळे आरोग्याचे बरेच प्रश्न निर्माण होऊ शकतात. असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. 

मीठ म्हणजेच 'सोडियम क्लोराईड' हा घटक शारिरिक प्रकियेमध्ये महत्वाची भूमिका निभावतो. शरीरात मिठाच्या कमतरतेमुळे गंभीर नुकसानही होऊ शकतात. त्याचबरोबर आहारामध्ये जास्त प्रमाणात मिठाचा समावेश केल्यास ते आरोग्यासाठी अपायकारक मानलं जातं.  शरीराला योग्य मीठ प्रमाणात मीठ मिळाले नाही तर तब्येत बिघडते. असं डॉक्टरांच म्हणणं आहे. 

ब्लड प्रेशरचा धोका -

दीर्घकाळ रोजच्या जेवणामध्ये मिठाचा गरजेपेक्षा जास्त वापर केल्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.शिवाय हाय बीपी म्हणजेच ( उच्च रक्तदाब) च्या समस्येला सायलेंट किलर म्हणूनही ओळखले जाते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, वेळेआधीच यावर नियंत्रण मिळवता आले नाही तर ह्रदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार डोकं वर काढतात. त्यामुळे वारंवार तुमचं ब्लड प्रेशर वाढत असेल तर अशा स्थितीत आहारात मिठाचा वापर कमी करावा किंवा न केलेलाच बरा. 

तहान लागणे-

जास्त मीठ खाल्ल्यामुळे सारखी तहान लागते. अशातच पाणी प्यायल्या नंतरही जर तुम्हाला पुन्हा पाणी प्यावेसे वाटत असेल तर मिठाचं सेवन कमी प्रमाणात करणं गरजेचं आहे. 

किडणी संबंधित समस्या उद्भवतात-

आहारात गरजेपेक्षा जास्त मीठाचा वापर करत असाल तर ही सवय बदलणं महत्वाचं ठरेल. किडणी रक्तातून अतिरिक्त प्रमाणात असलेलं सोडियम फिल्टर करण्याचं काम करते. ज्यावेळेस तुम्ही  जास्त प्रमाणात मीठाचं सेवन करता त्याच्या परिणाम थेट किडणीवर होतो. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सLifestyleलाइफस्टाइलHeart Diseaseहृदयरोग