शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

रेबीज लसीकरणानंतर वर्षभर करू नका रक्तदान; तज्ज्ञांनी सांगितलं यामागचं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 13:23 IST

रक्तदान केल्यामुळे अनेक गरजू लोकांना जीवदान मिळते.

Health Tips For Blood Donor  : रक्तदान केल्यामुळे अनेक गरजू  लोकांना जीवदान मिळते. त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचे असे म्हटले जाते.  मात्र, वैद्यकीय शास्त्रात रक्तदान करताना काही निकषांचे पालन करणे आवश्यक असते. कुणालाही वाटले तर रक्तदान करता येत नाही. अनेकवेळा दुर्धर आजार, अपघातातील  गंभीर दुखापतीमध्ये रुग्णांना तातडीने रक्त देऊन त्यांचा जीव वाचविला जातो. त्यामुळे जे रक्त दिले जाते त्याची गुणवत्ता तपासणीचे काही निकष आखून देण्यात आले आहे. त्यानुसारच रक्तदान केले जाते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते जर कुत्रा चावल्यामुळे रेबीजचे इंजेक्शन घेतले असेल तर अशा व्यक्तीला रक्तदान करू दिले जात नाही.

रक्तदात्यांचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक-

रक्तदान करताना रक्तदात्यांचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. रक्तदान करते वेळी त्यांना कोणताही आजार झालेला नसावा याची खात्री रक्तदान करताना रक्तदान केंद्रवार डॉक्टर करून घेत असतात. कारण कुठलाही आजार असताना रक्तदान करणे धोक्याचे असते.  रक्तदान १८ वयाच्या पुढील व्यक्तीस करता येते. तर वयाच्या ६५ वयापर्यंत स्वैच्छिक पद्धतीने रक्तदान करता येऊ शकते. रक्तदात्याचे हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ च्या वरती असणे अपेक्षित असते.  रक्तदान करण्यापूर्वी रक्तदात्यांची हिमोग्लोबिन मोजण्याची छोटी रक्तचाचणी केली जाते. त्यासोबत त्याचे वजन हे किमान ४५ किलोंच्यावर असणे अपेक्षित आहे.  

विशेष करून गेल्या काही वर्षांत संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्यात सर्वात  मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले जाते. यामध्ये मोठ्या प्रमाणवर सामाजिक संस्थांचा सहभाग नोंदविला जातो. पुरुषांना दर तीन महिन्यांनी तर महिलांना दर चार महिन्यांनी रक्तदान करता येते.

...यांना करता नाही येत रक्तदान

कॅन्सर, एचआयव्ही, काविळ, एपिलेप्सी त्यासोबत दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींना रक्तदान करता येत नाही. रक्तदान केंद्रावर सुद्धा याबाबत समुपदेशन केले जाते.

रक्तदात्याकडून रक्तदान करून घेताना वैद्यकीय शास्त्रात काही निकष आखून दिले आहेत. कोणत्या व्यक्तीने रक्तदान करावे आणि करू नये. त्या नियमाचे पालन रक्तदान शिबिरात केले जाते. रक्तदानापूर्वी माहिती विचारली जाते. काही चाचण्या करून वजन मोजून जर रक्तदाता रक्तदान करण्यास पात्र असेल तरच त्याला रक्तदान करून दिले जाते. - डॉ. योगानंद पाटील, (पॅथॉलॉजिस्ट), अतिरिक्त मुख्य वैद्यकीय संचालक, जगजीवन राम हॉस्पिटल

गर्भवतींना रक्तदान करता येते का?

१) गर्भवतींना रक्तदान करता येत नाही. कारण त्या काळात त्यांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणे गरजेचे असते. 

२) पोटात बाळ असताना रक्तदान करता नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यासोबत ज्या स्तनदा माता आणि मासिक पाळीच्या काळात महिलांना रक्तदान करता येत नाही.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स