शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

वजन कमी करण्यासाठी तुम्ही कधी आणि किती चालता? वाचा फिट राहण्याचा सोपा फंडा, रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2020 14:19 IST

Health Tips in Marathi : वजन कमी करण्यासाठी तसंच शरीरात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी चालण्याची एक वेळ निश्चित असणं गरजेचं आहे.

चालणं किंवा फिरणं शरीरासाठी, आरोग्यासाठी नेहमी फायदेशीर ठरतं. वजन कमी करण्यासाठी आजारांपासून दूर राहण्यासाठी चालणं नेहमी फायदेशीर ठरतं. जे लोक व्यायाम करत नाहीत, जिमला जात नाहीत. त्यांनी हेल्दी राहण्यासाठी नियमित चालायलाच हवं. अन्यथा जसजसं वय वाढत जातं तसतसे आजार उद्भवतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार जेवल्यानंतर चालल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. वजन कमी करण्यासाठी तसंच शरीरात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी चालण्याची एक वेळ निश्चित असणं गरजेचं आहे.

चालण्याची एक योग्य वेळ

दिवसभरात कोणत्याही वेळी चालल्यास शारीरिरक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. पण वजन कमी होण्यासाठी तसंच रक्तदाब, डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी चालणं हा सगळ्यात सोपा व्यायाम आहे. ज्या  तरूणांना आता कोणताही आजार नाही त्यांनी भविष्यातील आरोग्यविषयक गोष्टी लक्षात घेता चालण्याची सवय ठेवायला हवी. 

रोज व्यायाम केल्याने वजनासह तर शरीरातील साखरेचं प्रमाणही नियंत्रणात राहतं. २०१६ मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार  जेवणानंतर १० मिनिटं चालल्यानं टाईप२ डायबिटीसचा आजार असलेल्या लोकांच्या शरीरारील साखरेचं प्रमाण कमी होतं.  रोज जेवल्यानंतर १० मिनिटं चालणं फायदेशीर ठरतं. 

फायदे

दररोज चालल्यानं  हृद्यासंबंधी आजारांचा धोका टळतो. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.रोज चालायची सवय असेल तर मेंदूसाठी फायदेशीर ठरतं. चालण्यामुळे  ताणतणाव कमी होतो. मुडही फ्रेश राहतो. डिमेंशिया आणि अल्झायमर असे आजार चालण्यामुळे उद्भवत नाहीत. 

चालण्यामुळे फुफ्फुसांपर्यंत मोकळी हवा पोहोचते. परिमाणी ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो. फुफ्फुसांच्या आजारांपासून लांब राहता येतं. नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते. याशिवाय चालल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. तसेच, तुमच्या सृजनशीलतेला चालना मिळते. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो. पचनक्रिया चांगली राहते.

दररोज किती चालायला हवं?

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी दररोज कमीतकमी अर्धा तास चालायला हवं. १०००० पावलं म्हणजेच ६ ते ७ किलोमीटर चालणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. चालण्यामुळे शरीराला उर्जा प्राप्त होते. प्रमाणापेक्षा जास्त चालण्याची आवश्यकता नाही. कारण गरजेपेक्षा जास्त चालल्यानं थकवा जाणवू शकतो. संक्रमणानंतर ७ महिन्यांपर्यंत रुग्णांमध्ये असतात कोरोनाच्या एंटीबॉडी, तज्ज्ञांचा दावा 

कोणत्या वयोगटातील व्यक्तीनं किती चालायला हवं

६ ते १७ वर्ष वयोगटातील लोकांनी १५००० पावलं चालायला हवं. १२०० पावलंही चालू शकता. १८ ते ४० वर्ष वयोगटातील लोकांनी  १२००० पावलं चालणं उत्तम ठरेल. ५० वर्ष वय असलेल्या लोकांनी १०००० पावलं चालायला हवं. ६० वर्ष वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्यांनी ८००० पावलं चालायला हवं. पॉझिटिव्ह बातमी! कोरोनामुळे नष्ट होतोय 'हा' जीवघेणा आजार; रुग्णांमध्ये मोठी घट, तज्ज्ञांचा दावा

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स