शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
3
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
4
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
5
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
6
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
7
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
8
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
9
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
10
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
11
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
12
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
13
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
14
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
15
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
16
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
17
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
18
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
19
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
20
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न

Health : ​आला पावसाळा, आरोग्य सांभाळा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2017 17:09 IST

पावसाळ्यात आजारांपासून लांब राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.

-Ravindra Moreनुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाली असून बहुतांश लोक आंनद लुटत आहेत. मात्र पावसाचा आनंद घेताना आरोग्याचीही काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात बरेच आजार डोके वर काढतात. पावसाळ्यात तयार होणाऱ्या डबक्यांमुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे डेंग्यू, हिवताप, मलेरिया, टायफाईट आदी आजार होतात. शिवाय पावसात भिजल्याने अंगावरील ओले कपडे, वातावरणातील दमटपणा आणि गारवा यामुळेही आजारांना निमंत्रण मिळू शकते. पावसाळ्यात आजारांपासून लांब राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात होतात हे आजार अंगावर ओले कपडे, जास्त वेळ पावसात भिजणे यांमुळे सर्दी खोकल्यासारखे किरकोळ आजार उद्भवतात. यादिवसात प्रामुख्याने डास चावल्यामुळे हिवताप किंवा मलेरिया होतो. एनॉफिलीस जातीच्या मच्छराने दंश केल्यास हिवतापाची लागण लगेच होते. ढगाळ वातावरणामुळे पावसाळ्यात दमा असणाऱ्या रुग्णांना त्रास जास्त जाणवतो. दमट, गार हवा आणि मंद पचनशक्ती यामुळे दम्याचा त्रास वाढतो. पावसाळ्यात पाण्याची प्रदुषण जास्त होते. त्यामुळे जुलबा आजार उद्भवण्याची शक्यता असते. तसेच पावसात जास्त वेळ भिजल्यास किंवा ओली चप्पल पायात जास्त वेळ ठेवल्यास चिखल्या होतात.काय उपाय कराल?पावसात भिजल्यास तत्काळ कपडे बदलावे आणि अंग कोरडे करावे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घराच्या परिसरात पाण्याची डबके तयार होऊ देऊ नयेत. शिवाय स्वच्छता ठेवून डास प्रतिबंधक औषधे, जाळ्या यांचा वापर करणे. अशुद्ध पाण्यामुळे पोटाचे विकार होऊ नयेत म्हणून स्वच्छ किंवा उष्ण पाणी प्यावे. एवढे प्रयत्न करुनही आजाराची काही लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आहाराची काय काळजी घ्याल?पावसाळ्यात पचनसंस्था मंद होते म्हणून जड आहार शक्यतो टाळावा. या दिवसात पचन न होणारा आहार घेतल्यास शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. थंड पदार्थ, तेलकट पदार्थ, फास्ट फुड, उपवासासाठी शेंगदाणे किंवा भगर हे पचन बिघडविणारे पदार्थ खाणे टाळावे. त्याऐवजी बेसन लाडू, टोमॅटो सुप, वांगी, भेंडवळ, कैरी, लिंबु, चिंच, सुखे खोबरे आदी पचायला हलके आणि उष्ण पदार्थांचा वापर करावा. Also Read : ​​पावसाळ्यात घ्या सायकलिंगचा मनमुराद आनंद! ​                    मुंबईकरांनी पावसाळ्यात ‘या’ गोष्टींचा अनुभव अवश्य घ्यावाच !