शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

Health : ​आला पावसाळा, आरोग्य सांभाळा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2017 17:09 IST

पावसाळ्यात आजारांपासून लांब राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.

-Ravindra Moreनुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाली असून बहुतांश लोक आंनद लुटत आहेत. मात्र पावसाचा आनंद घेताना आरोग्याचीही काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात बरेच आजार डोके वर काढतात. पावसाळ्यात तयार होणाऱ्या डबक्यांमुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे डेंग्यू, हिवताप, मलेरिया, टायफाईट आदी आजार होतात. शिवाय पावसात भिजल्याने अंगावरील ओले कपडे, वातावरणातील दमटपणा आणि गारवा यामुळेही आजारांना निमंत्रण मिळू शकते. पावसाळ्यात आजारांपासून लांब राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात होतात हे आजार अंगावर ओले कपडे, जास्त वेळ पावसात भिजणे यांमुळे सर्दी खोकल्यासारखे किरकोळ आजार उद्भवतात. यादिवसात प्रामुख्याने डास चावल्यामुळे हिवताप किंवा मलेरिया होतो. एनॉफिलीस जातीच्या मच्छराने दंश केल्यास हिवतापाची लागण लगेच होते. ढगाळ वातावरणामुळे पावसाळ्यात दमा असणाऱ्या रुग्णांना त्रास जास्त जाणवतो. दमट, गार हवा आणि मंद पचनशक्ती यामुळे दम्याचा त्रास वाढतो. पावसाळ्यात पाण्याची प्रदुषण जास्त होते. त्यामुळे जुलबा आजार उद्भवण्याची शक्यता असते. तसेच पावसात जास्त वेळ भिजल्यास किंवा ओली चप्पल पायात जास्त वेळ ठेवल्यास चिखल्या होतात.काय उपाय कराल?पावसात भिजल्यास तत्काळ कपडे बदलावे आणि अंग कोरडे करावे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घराच्या परिसरात पाण्याची डबके तयार होऊ देऊ नयेत. शिवाय स्वच्छता ठेवून डास प्रतिबंधक औषधे, जाळ्या यांचा वापर करणे. अशुद्ध पाण्यामुळे पोटाचे विकार होऊ नयेत म्हणून स्वच्छ किंवा उष्ण पाणी प्यावे. एवढे प्रयत्न करुनही आजाराची काही लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आहाराची काय काळजी घ्याल?पावसाळ्यात पचनसंस्था मंद होते म्हणून जड आहार शक्यतो टाळावा. या दिवसात पचन न होणारा आहार घेतल्यास शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. थंड पदार्थ, तेलकट पदार्थ, फास्ट फुड, उपवासासाठी शेंगदाणे किंवा भगर हे पचन बिघडविणारे पदार्थ खाणे टाळावे. त्याऐवजी बेसन लाडू, टोमॅटो सुप, वांगी, भेंडवळ, कैरी, लिंबु, चिंच, सुखे खोबरे आदी पचायला हलके आणि उष्ण पदार्थांचा वापर करावा. Also Read : ​​पावसाळ्यात घ्या सायकलिंगचा मनमुराद आनंद! ​                    मुंबईकरांनी पावसाळ्यात ‘या’ गोष्टींचा अनुभव अवश्य घ्यावाच !