शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल तर 'या' आजारांपासून चार हात लांब राहाल; वाचा फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 20:15 IST

Health Tips in Marathi : तांब्याच्या भांड्यात  नियमित  पाणी पिल्याने शरीराला उपयुक्त तत्त्व मिळत असतात, ज्याने आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त अजून काय फायदे आहेत याबाबत जाणून घेऊया.

तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील. जास्तीत जास्त लोक पाणी पिण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर करतात. उन्हाळ्यात वातावरणातील गरमी वाढते. अशा शरीराला थंडावा मिळण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर फायदेशीर ठरतो. प्राचीन काळापासून धातूच्या भांड्यात जेवण करणे किंवा पाणी पिणे आरोग्यदायी मानण्यात आले आहे. त्यात इतर धातूंपेक्षा तांब्याचं भांडं अतिशय शुद्ध समजले जाते. त्यामुळे तांब्याच्या भांड्यात  नियमित  पाणी पिल्याने शरीराला उपयुक्त तत्त्व मिळत असतात, ज्याने आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त अजून काय फायदे आहेत याबाबत जाणून घेऊया.

फायदे

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले जातात. याने शरीरातील तांब्याची कमतरता पूर्ण होते. याने रोग पसरवणाऱ्या जिवाणूंपासून शरीर सुरक्षित राहतं. तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी अधिक शुद्ध मानलं जातं. हे पाणी जुलाब, कावीळ, अतिसार यांसारखे अनेक आजार पसरवणाऱ्या जिवाणूंना नष्ट करतं.

अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, कॅन्सरची सुरुवात रोखण्यास तांबे फायदेशीर आहे. यामध्ये कॅन्सरविरोधी घटक असतात. तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी(विषाणूंशी लढण्याचे) गुण असतात. ज्यामुळे शरीराला वेदना, वात आणि सूज येत नाही. संधिवात असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने फायदा होतो.

पोटाच्या वेगवेगळे आजार पळवून लावण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे केल्यास तुमचा डॉक्टरकडे होणारा खर्च नक्कीच कमी होऊ शकतो. दररोज हे पाणी प्यायल्यास पोटदुखी, गॅस,अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर आराम मिळतो.

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने त्वचेवर कोणत्याही प्रकारची समस्या होत नाही. या पाण्यामुळे पिंपल्स तसेच त्वचेसंदर्भातील रोग होत नाहीत. तसंच त्वचा साफ आणि अधिक चमकदार होते. शरीराच्या अंतर्गत सफाईसाठी तांब्याचं पाणी फायदेशीर आहे. याशिवाय हे पाणी यकृत आणि किडनी निरोगी ठेवतो. कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचावासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणं लाभदायक असतं.

तांब्याची भांडी वापरल्यामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी हे करा

तांब्याच्या भांड्यांचा वापर करताना काही गोष्टींचा काळजी घेणं आवश्यक आहे. अनेक लोकांच्या घरात तांब्याच्या भांड्याचा वापर करताना ग्लास किंवा जग वापरला जातो जर तुम्ही पाणी  पिण्याआधी तांब्याची भांडी जमीनीवर ठेवायची चूक करत असाल तर त्या पाण्यातील पोषक तत्व तुम्हाला मिळणार नाहीत.

तांब्याच्या भांड्यांचा काही काळ वापर केल्यानंतर  त्याला काळपटपणा येतो. भांड्यांवर थर जमा झाल्यास त्याचा पाण्याशी थेट संपर्क येत नाही. त्यामुळे वापर करण्याआधी  तांब्याचं भांड स्वच्छ धुतलेलं असणं गरजेचं आहे. हिवाळ्यात जर तांब्याची भांडी व्यवस्थित न धुता त्याचा वापर कराल तर महागात पडू  शकतं. कारण त्यावर वेगळ्या प्रकारचा थर जमण्यास सुरूवात होते. हे शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे तर तुम्ही  तांब्याची भांडी वापरत असाल तर त्यांची स्वच्छता ठेवणं सुध्दा तितकचं महत्वाचं आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य