शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

Hair Fall : एक्सपर्टनुसार हा एक पदार्थ केसगळतीचं आहे मुख्य कारण, खाता-पिताना घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 13:14 IST

Hair Fall : एक्सपर्ट सांगतात की, यामागे केवळ वयाची भूमिका नाही तर खाण्यातील एक पदार्थही केसांवर प्रभाव टाकतो. या पदार्थामुळे केस पातळ होता. यामुळे तरूणांमध्ये केसगळती होत आहे. 

केसगळती (Hair Fall) ही एक सामान्य समस्या झाली आहे. ज्यामुळे लोक अलिकडे खूप जास्त वैतागले आहेत. महिला आणि पुरूष दोघांमध्येही केसगळतीची समस्या वेगवेगळ्या प्रकारे बघायला मिळते. केसगळतीचं सर्वात कॉमन कारण एंड्रोजेनेटिक एलोपेसिया असतं ज्यात महिला आणि पुरूषांचे केस एका पॅटर्नमध्ये गळतात. सामान्यपणे ५० पेक्षा जास्त वयाचे पुरूष आणि ६५ पेक्षा जास्त महिलांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते. पण एक्सपर्ट सांगतात की, यामागे केवळ वयाची भूमिका नाही तर खाण्यातील एक पदार्थही केसांवर प्रभाव टाकतो. या पदार्थामुळे केस पातळ होता. यामुळे तरूणांमध्ये केसगळती होत आहे. 

काय सांगतात एक्सपर्ट?

UK तील प्रसिद्ध ट्रायकोलॉजिस्ट केविन मूर म्हणाले की, आहारातून जास्त प्रमाणात मिठाचं सेवन केल्याने निश्चितपणे केसांच्या आरोग्याला नुकसान पोहोचतं आणि यामुळेच केस गळतात. British GQ ला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले की, 'खूप जास्त मीठ खाल्ल्याने सोडिअम तयार होतं जे केसांच्या रोमच्या म्हणजे मुळात जमा होऊ लागतं. ज्याने हेअर फॉलिकलच्या ब्लड सर्कुलेशनवर प्रभाव पडतो. यामुळे आवश्यक पोषक तत्व केसांच्या रोमपर्यंत पोहचू शकत नाही.

मूर म्हणाले की, 'सोडिअमच्या जास्त प्रमाणामुळे केस निर्जीव आणि कमजोर होतात आणि हेच केसगळतीचं कारण ठरतं. फार कमी सोडिअममुळेही केसांच्या विकासात समस्या येते. कमी मीठ खाल्ल्याने शरीरात आयोडिनची कमतरता होते.  जे गुड थायरॉइड फंक्शनसाठी गरजेचं आहे. ते म्हणाले की, जर थायरॉइड असंतुलित आहे, तर तुमचे केस प्रभावित होतील. याने केस निर्जीव आणि पातळ होतील.

कसे मजबूत होतात केस - एक्सपर्टनुसार, केस मजबूत असणं तुमच्या डाएटमध्ये सामिल व्हिटॅमिन आणि मिनरल्सवर अवलंबून आहे. आयर्न आणि व्हिटॅमिन B5 मुळे केस पातळ होण्यापासून वाचतात आणि डोक्याची त्वचा चांगली राहते. तर केसांच्या मजबूतीसाठी आणि चमकदार होण्यासाठी प्रोटीनची गरज असते. त्यासोबतच वातावरणामुळेही केसांची क्वालिटी खराब होते. जे सामान्य बाब आहे. काही लोकांमध्ये ही आनुवांशिकही असतं.

जास्त मीठ धोकादायक - तंत्रिका आणि मांसपेशींचं काम योग्यप्रकारे होण्यासाठी शरीर मिठावर निर्भर असतं. पण मिठाचं प्रमाण जास्त झालं तर याने ब्लड प्रेशर वाढतं. याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. NHS नुसार, वयस्कांनी एका दिवसात ६ ग्रॅमपेक्षा जास्त मिठ खाऊ नये. हे जवळपास एका चमचा इतकं असतं ज्यात २.४ ग्रॅम सोडिअम असतं. जेवण बनवताना किंवा खाताना लक्ष ठेवून तुम्ही तुमच्या मिठाचं प्रमाण ट्रॅक करू शकता.

कशात असतं जास्त मिठ - काही फूड आयटम्समध्ये आधीच मिठाचं प्रमाण जास्त असतं ज्यात टोमॅटो सॉस, पॅक्ड फूड्स, ब्रेड्स, रेडी टू इट फूड्स, सॅंडविच आणि सूप यांचा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही काय खरेदी करता यावर लक्ष देण्याची गरज असते. खरेदी करताना पॅकेटवरील माहिती तपासा. 

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य