शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

चुकूनही पेपरमध्ये पदार्थ खाऊ नका, होतो कॅन्सरचा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 10:11 IST

तुम्हीही रस्त्याचा कडेला असलेल्या ठेल्यावर अनेकदा पेपरच्या कोनमध्ये विकली जाणारी भेळ, चाट आणि चणे खाल्ले असतील.

अनेकांना स्ट्रीट फूड खाण्याची सवय असते. तुम्हीही रस्त्याच्या कडेला असलेल्या ठेल्यावर अनेकदा पेपरच्या कोनमध्ये विकली जाणारी भेळ, चाट आणि चणे खाल्ले असतील. वडापाव आणि भजीरी याच पेपरमध्ये दिले जातात. हे पदार्थ खाताना भलेही तुम्ही याचा विचार करत नसाल की, दुकानदार तुम्हाला कोणत्या आणि कशा पेपरमध्ये खायला देतात. पण आता तुम्हाला याची काळजी घेण्याची गरज आहे. 

FSSAI ने जारी केली सूचना

तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण अशाप्रकारे न्यूजपेपरमध्ये ठेवून पदार्थ खाल्ल्याने कॅन्सरचा धोका अनेक पटीने वाढतो. त्यामुळे फूड सेफ्टी अॅन्ड अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच FSSAI एका सूचना जाहीर केली आहे. आणि त्यानुसार न्यूजपेपर आणि प्लास्टिकवर पदार्थ देण्यावर मनाई केली आहे. 

कॅन्सरचा धोका

फूड अथॉरिटीनुसार, न्यूजपेपरमध्ये पदार्थ खाणे अनेकप्रकारे जीवघेणं ठरू शकतं. कारण न्यूजपेपरच्या शाईमध्ये मल्टिपल बायोअॅक्टिव मटेरिअल असतं. ज्याचा शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो. ही शाई शरीरात गेल्यावर कॅन्सरसहीत इतरही जीवघेणे आजार होऊ शकतात. 

तेल काढण्यासाठीही पेपरचा वापर नको

FSSAI नुसार भारतातील लोक कळत-नकळत स्लो पॉयझनचे शिकार होत आहेत. कारण देशात मोठ्या प्रमाणात छोट्या हॉटेल्ससहीत रस्त्यावरील ठेल्यांवर आणि घरांमध्येही पदार्थ ठेवण्यासाठी न्यूजपेपरचा वापर केला जातो. लोकांचा असा समज असतो की, पेपरचा वापर केल्याने पदार्थांमधील तेल शोषलं जातं. पण ही धारणा पूर्णपणे चुकीची आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य