शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासांपेक्षा जास्त वेळ ताप येणं धोकादायक; पावसाळ्यात करू नका दुर्लक्ष, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 15:52 IST

कधी पाऊस तर कधी ऊन असे हवामानात सतत बदल होत असतात, ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे.

पावसाळ्यात कधी पाऊस तर कधी ऊन असे हवामानात सतत बदल होत असतात, ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. अनेक आजार झपाट्याने पसरत आहेत. याच दरम्यान अनेकांना हमखास ताप येतो. मात्र हा ताप काही दिवसांनी जातो. तुम्ही त्यातून बरे होता. पण जर याकडे दुर्लक्ष केलं तर ते तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे ही चूक करू नका. 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या ऋतूत २४ तासांपेक्षा जास्त वेळ ताप येत असल्यास सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. कारण, हा ताप अनेक आजारांचं लक्षण असू शकतो. तापाद्वारे शरीर संसर्गाशी लढतं, परंतु जर ते दीर्घकाळ टिकत असेल तर याचा अर्थ संसर्ग गंभीर होऊ लागला आहे आणि इतर समस्यांचा धोका आहे. काही प्रकरणांमध्ये, दीर्घकाळ टिकणारा ताप शरीराच्या अनेक अवयवांना इजा करू शकतो.

पावसाळ्यात ताप येऊ नये म्हणून हे करा

1. नियमितपणे हात धुवा आणि स्वच्छता राखा.2. संक्रमित लोकांपासून स्वतःचं रक्षण करा.3. फक्त पौष्टिक अन्न खा आणि भरपूर पाणी प्या.4. व्यायाम आणि चांगली झोप घ्या.

पावसाळ्यात २४ तासांपेक्षा जास्त ताप राहिल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा. याशिवाय तापासोबत डोकेदुखी, उलट्या, जुलाब किंवा धाप लागणे, अंगावर लाल पुरळ उठणे, बेशुद्ध पडणे असा त्रास होत असेल तर रुग्णालयात जा. जेणेकरून आजारावर योग्य वेळी उपचार करता येतील. यामध्ये थोडासा निष्काळजीपणाही परिस्थिती गंभीर बनवू शकतो.

दरवर्षी या ऋतूत डेंग्यूने कहर केला आहे, मात्र यंदा डेंग्यूशिवाय इतरही अनेक व्हायरस लोकांमध्ये धुमाकूळ घालत आहेत. निपाह व्हायरस असो, चांदीपुरा व्हायरस असो, झिका व्हायरस असो किंवा व्हायरल फ्लू, प्रत्येकाचं पहिलं लक्षण म्हणजे ताप. अशा स्थितीत जर ताप २४ तासांपेक्षा जास्त काळ राहत असेल तर त्याला हलक्यात घेण्याची चूक करू नका. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि शक्य तितक्या लवकर रोगाचे निदान करणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून वेळेवर उपचार सुरू करता येतील.

कसं राहायचं सुरक्षित?

तापासह संसर्गाचे परिणाम कमी करणे सर्वात महत्वाचे आहे. यावेळी, डिहायड्रेशनपासून वाचण्याचा प्रयत्न करा आणि शक्य तितकं पाणी प्या. विशेषतः उष्णता असल्यास स्वतःला हायड्रेटेड ठेवणं महत्वाचं आहे. याशिवाय, जर तुम्हाला ताप, उलट्या, जुलाब असं काही होत असेल तर जास्तीत जास्त विश्रांती घ्या कारण विश्रांतीमुळे शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत होते. याशिवाय पावसाळ्यात भिजल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे ताप येत असेल तर थंड पाण्याने अंघोळ करू नका, गरम पाण्यानेच अंघोळ करा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य