शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी आयुष्यासाठी एक तरी उपवास हवाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 10:19 IST

काही जणांना उपवास करण्याची योग्य पद्धत माहीत नसल्याने त्यांना या उपवासाचा त्रास होतो. एका वेळेनंतर त्यांना हा उपवास नकोसा वाटतो.

- ओमकार गावंडमुंबई : निरोगी आयुष्य जगण्यासाठी उपवास करणे आवश्यक असल्याचे नेहमी आहार तज्ञ सांगतात. यासाठी भारतात अनेक जण विविध प्रकारे उपवास करतात. उपवास करण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी हे उपवास सर्वांना फलदायी ठरतात. बदललेला आहार आणि त्याच्या वेळा यामुळे अनेक आजार वाढतात. त्यामुळे अनेक जण आठवड्यातून एकतरी उपवास करतातच.मात्र काही जणांना उपवास करण्याची योग्य पद्धत माहीत नसल्याने त्यांना या उपवासाचा त्रास होतो. एका वेळेनंतर त्यांना हा उपवास नकोसा वाटतो. उपवासाच्यावेळी योग्य आहाराची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. यासाठी आहार तज्ञाचा योग्य सल्ला घेऊन उपवास केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो.एकादशी दुप्पट खाशी, असे नको !उद्या उपवास धरायचा आहे, म्हणून आदल्या दिवशी जास्त खाणे किंवा उशिरा खाणे योग्य नाही. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे उपवासाच्या दिवशी चहा, दूध, बटाट्याचे तळलेले पदार्थ यांचे जास्त सेवन करू नये. यामुळे पोटाचे विकार वाढू शकतात. तसेच रात्री उपवास सोडताना देखील समतोल आहार घेणे गरजेचे आहे. तरच उपवास सफल होऊ शकतो.उपवासाला काय खावे?शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी प्यावे. दर दोन ते तीन तासांनी फळे खावीत. उपवासाला चालणारी भाजी व दही हलक्या प्रमाणात खावे. दिवसभर उत्साह टिकून राहावा यासाठी लिंबू पाणी व ताक यांचे सेवन करत रहावे.काय खाऊ नयेउपवासाला चालते म्हणून खिचडी, तळलेले साबुदाणा वडे, शेंगदाणे, चहा यांचे सेवन जास्त प्रमाणात करू नये. बाहेरून आणलेले तळलेले वेफर्स, चिवडा तसेच उपवासाचे इतर पदार्थ खाणे टाळावे.निरोगी आयुष्यासाठी व्यायाम, चांगला आहार या गोष्टींसोबतच उपवास देखील महत्त्वाचा आहे. उपवासाच्या दिवशी शक्यतो पाणी व फळांचा रस यावरच भर दिला पाहिजे. हल्ली उपवासाच्या नावे लोक इतर दिवसांपेक्षा जास्त तेलकट व गोड पदार्थ खातात. ते टाळायला हवे.- डॉ. समीर नाईक, आहारतज्ञ मीही करतो आठवड्यातून एक उपवासउपवासामुळे शरीराला एक प्रकारचा आरामच दिला जातो. त्यामुळे मी आठवड्यातून एक उपवास धरतो. यामुळे आजारांपासून दूर राहण्यास देखील मदत होते. - शैलेश पाटीलअनेकदा लोकांना जिम ट्रेनर कडून अत्यंत कठोर डाएट सांगितला जातो. यामुळे सुरुवातीचे काही महिने तो डाएट व्यवस्थितरीत्या पाळला जातो. यानंतर कंटाळून तो डायरेक्ट सोडला जातो. त्यापेक्षा आठवड्यातून एकदा उपवास केल्यास त्यात सातत्य राहते.- विनिता केणी