शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

निरोगी आयुष्यासाठी एक तरी उपवास हवाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 10:19 IST

काही जणांना उपवास करण्याची योग्य पद्धत माहीत नसल्याने त्यांना या उपवासाचा त्रास होतो. एका वेळेनंतर त्यांना हा उपवास नकोसा वाटतो.

- ओमकार गावंडमुंबई : निरोगी आयुष्य जगण्यासाठी उपवास करणे आवश्यक असल्याचे नेहमी आहार तज्ञ सांगतात. यासाठी भारतात अनेक जण विविध प्रकारे उपवास करतात. उपवास करण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी हे उपवास सर्वांना फलदायी ठरतात. बदललेला आहार आणि त्याच्या वेळा यामुळे अनेक आजार वाढतात. त्यामुळे अनेक जण आठवड्यातून एकतरी उपवास करतातच.मात्र काही जणांना उपवास करण्याची योग्य पद्धत माहीत नसल्याने त्यांना या उपवासाचा त्रास होतो. एका वेळेनंतर त्यांना हा उपवास नकोसा वाटतो. उपवासाच्यावेळी योग्य आहाराची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. यासाठी आहार तज्ञाचा योग्य सल्ला घेऊन उपवास केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो.एकादशी दुप्पट खाशी, असे नको !उद्या उपवास धरायचा आहे, म्हणून आदल्या दिवशी जास्त खाणे किंवा उशिरा खाणे योग्य नाही. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे उपवासाच्या दिवशी चहा, दूध, बटाट्याचे तळलेले पदार्थ यांचे जास्त सेवन करू नये. यामुळे पोटाचे विकार वाढू शकतात. तसेच रात्री उपवास सोडताना देखील समतोल आहार घेणे गरजेचे आहे. तरच उपवास सफल होऊ शकतो.उपवासाला काय खावे?शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी प्यावे. दर दोन ते तीन तासांनी फळे खावीत. उपवासाला चालणारी भाजी व दही हलक्या प्रमाणात खावे. दिवसभर उत्साह टिकून राहावा यासाठी लिंबू पाणी व ताक यांचे सेवन करत रहावे.काय खाऊ नयेउपवासाला चालते म्हणून खिचडी, तळलेले साबुदाणा वडे, शेंगदाणे, चहा यांचे सेवन जास्त प्रमाणात करू नये. बाहेरून आणलेले तळलेले वेफर्स, चिवडा तसेच उपवासाचे इतर पदार्थ खाणे टाळावे.निरोगी आयुष्यासाठी व्यायाम, चांगला आहार या गोष्टींसोबतच उपवास देखील महत्त्वाचा आहे. उपवासाच्या दिवशी शक्यतो पाणी व फळांचा रस यावरच भर दिला पाहिजे. हल्ली उपवासाच्या नावे लोक इतर दिवसांपेक्षा जास्त तेलकट व गोड पदार्थ खातात. ते टाळायला हवे.- डॉ. समीर नाईक, आहारतज्ञ मीही करतो आठवड्यातून एक उपवासउपवासामुळे शरीराला एक प्रकारचा आरामच दिला जातो. त्यामुळे मी आठवड्यातून एक उपवास धरतो. यामुळे आजारांपासून दूर राहण्यास देखील मदत होते. - शैलेश पाटीलअनेकदा लोकांना जिम ट्रेनर कडून अत्यंत कठोर डाएट सांगितला जातो. यामुळे सुरुवातीचे काही महिने तो डाएट व्यवस्थितरीत्या पाळला जातो. यानंतर कंटाळून तो डायरेक्ट सोडला जातो. त्यापेक्षा आठवड्यातून एकदा उपवास केल्यास त्यात सातत्य राहते.- विनिता केणी