शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

घराबाहेर पडताय? तापमानाचा पारा वाढतोय, पाणी सोबत ठेवा अन् खबरदारी घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 16:08 IST

Health Tips : योग्य प्रमाणात पाणी पिल्यास उन्हाळ्यातील तक्रारींवर मात करता येते. दररोज किमान तीन लिटर पाणी प्यायला हवे.

फेब्रुवारीच्या उत्तरार्धापासून थंडी कमी झाली असून, आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत शरीराचे निर्जलीकरण अर्थात डिहायड्रेशनचा धोका संभावतो. पातळी कमी झाल्याने शरीरावर गंभीर परिणाम होतो. योग्य प्रमाणात पाणी पिल्यास उन्हाळ्यातील तक्रारींवर मात करता येते. दररोज किमान तीन लिटर पाणी प्यायला हवे. फळांचा सर, लिंबूपाणी, नारळ पाण्याचे सेवन लाभदायी असते. तसेच घराबाहेर पडताना न विसरता पाण्याची बाटली सोबत ठेवावी.

पहाटे थंडी, दुपारी ऊनथंडी संपून उन्हाळा सुरू झाल्याने दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. असे असले तरी पहाटेच्या वेळी वातावरणात गारवा पसरत आहे.

यंदा पारा ५ अंशांपर्यंतयंदाच्या हिवाळ्यात जिल्ह्याचा किमान तापमानाचा पारा ५ अंशांपर्यंत घसरला होता. निफाडचे तापमान त्याहूनही खाली आले होते. मात्र, ते जास्त काळ टिकू शकले नाही. वातावरणातील बदलामुळे हिवाळाभर तापमानात चढ-उतार सुरू होती.

तापमान ३४ अंशांवरहिवाळ्यात ५ अंशांपर्यंत घसरलेल्या तापमानात फेब्रुवारी अखेरला ३४ अंशांपर्यंत वाढ झाली. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानात वाढ झाल्याने मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेचा सामना करावा लागू शकतो.

काय काळजी घ्याल?उन्हाळ्यातील उष्णतेपासून बचावासाठी सुती व फिकट रंगाच्या कपड्याचा वापर करावा. योग्य प्रमाणात पाणी पिणे हाच रामबाण उपाय आहे. सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत सूर्याच्या किरणांची प्रखरता सर्वाधिक असते. त्यामुळे या वेळात घराबाहेर पडणे टाळावे.

पाणी वारंवार प्याशरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी ठरावीक वेळेने थोडे पाणी प्यावे. त्याचबरोबर नारळाचे पाणी, सरबत, पन्हे, ताक, दूध, फळांचा रस घ्या. पुन्हा पुन्हा पाणी पिऊनही तहान भागत नसल्यास कलिंगडाचा रस, सब्जाचे पाणी घ्यावे. चहा, कॉफी, कोला, बीअर, मद्य, आदी उष्णता वाढविणाऱ्या पेयांपासून दूर राहावे.

उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी पडणे नुकसानदायक ठरते. पाणी कमी पडल्यास डिहायड्रेशन, थकवा, अशक्तपणा जाणवणे, आदींसह रक्तदाबाची समस्या, त्वचा कोरडी होणे, डोळे निस्तेज होणे अशा समस्या जाणवतात. त्यासाठी ठरावीक वेळेने थोडे पाणी प्यायला हवे.- डॉ. तुषार कुटे, फॅमिली फिजिशियन

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHeat Strokeउष्माघात